शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रवादीकडून शेखर गोरेंचा अर्ज दाखल

By admin | Published: November 02, 2016 11:36 PM

दिग्गज नेत्यांसह शक्तिप्रदर्शन : सांगली, सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची गर्दी

 सांगली : विधानपरिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी राष्ट्रवादीतर्फे बुधवारी शेखर गोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आ. जयंत पाटील, आ. शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज दाखल केला. सांगलीच्या स्टेशन चौकातील वसंतदादा पाटील यांच्या पुतळ््यास पुष्पहार अर्पण करून गोरे यांच्यासह सर्व नेत्यांनी अभिवादन केले. त्यानंतर तिथून चालत ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले. याठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हाधिकारी परिसरात राष्ट्रवादी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, काँग्रेसच्या ठराविक नेत्यांच्या हट्टामुळे आघाडी झालेली नाही. अजूनही आम्ही आशावादी आहोत. उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत जुन्या फॉर्म्युल्याप्रमाणे कॉँग्रेसने आघाडी करावी. समविचारी पक्षांनी एकत्रित रहावे, या मताचे आम्ही आहोत. धनशक्तीच्या जोरावर उमेदवार रेटला जात असेल, तर त्याला जिल्ह्यातील थोर नेत्यांच्या विचाराने आम्ही उत्तर देऊ. राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त असतानाही काँग्रेस याठिकाणी कशासाठी हट्ट धरत आहे, हे कळायला मार्ग नाही. दोन्ही काँग्रेसच्या लढतीबद्दल भाजपच्या नेत्यांनी काय टीका केली, याकडे आम्ही लक्ष देणार नाही. त्यांचे संख्याबळ नसतानाही त्यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांना मतदारच उत्तर देतील. शेखर गोरे म्हणाले की, शरद पवार व अन्य नेत्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे. माण खटाव येथील दुष्काळी जनतेला यामाध्यमातून न्याय मिळाला आहे. या भागाचे प्रतिनिधीत्व करताना निश्चितच त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. (प्रतिनिधी) दिलीपतात्यांची अनुपस्थिती दिलीपतात्या पाटील यांनी उमेदवारीबद्दल केलेल्या टीकेविषयी आणि त्यांच्या अनुपस्थितीविषयी जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीत लोकशाही मार्गाने कोणालाही त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही कोणालाही त्याबद्दल जाब विचारत नाही. पक्षात उमेदवारी मागण्याचा हक्क सर्वांना आहे, मात्र पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यानंतर अशी मागणी करणारे सर्व लोक एकत्रितपणाने उमेदवाराच्या पाठीशी राहतात. पक्षाची ही परंपरा आहे. दिलीपतात्या पाटील यांच्याकडे सध्या जिल्हा मध्यवर्ती बँक तसेच आष्टा नगरपालिकेची जबाबदारी असल्याने ते आज उपस्थित राहू शकले नाहीत. अजित पवारांच्या गैरहजेरीबद्दल चर्चा गोरे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी नेते अजित पवार उपस्थित राहणार होते, मात्र ते गैरहजर राहिले. त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनली होती. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेसुद्धा गैरहजर राहिले. दोन्ही दिग्गज नेत्यांच्या अनुपस्थितीवरून तर्कवितर्क लढविले जात आहेत.