शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
2
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
3
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
4
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
5
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
6
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
8
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
9
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
10
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
11
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
12
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
13
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
14
“आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील”; तिसऱ्या आघाडीतील नेत्याचे मोठे विधान
15
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
16
"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...
17
'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा
18
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
19
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
20
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण

शेट्टी, खोतांची मंित्रपदासाठी नौटंकी!

By admin | Published: December 07, 2015 10:16 PM

पंजाबराव पाटील : ‘स्वाभिमानी’ला आंदोलनासाठी कार्यकर्तेच मिळणार नसल्याचा दावा

सातारा : ‘ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा गळा कापणाऱ्या मोदी सरकारशी खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी दोस्ती केली आहे. मंत्रिपद मिळण्याच्या आशेने या दोघांनीही भाजपचा हात धरला होता. आता मंत्रिपद मिळत नसल्याचे दिसल्यानंतर त्यांना ऊस उत्पादकांचा पुळका आला असून, आता ते आंदोलनाची भाषा वापरून नौटंकी करत आहेत,’ असा घणाघात बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या उसाला एक रकमी मिळाली पाहिजे, येत्या आठ दिवसांत शासनाने याबाबत निर्णय घ्यावा, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर पाटील यांनी पत्रकारांसमोर पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. पाटील म्हणाले, ‘स्वामिनाथन कमिटीच्या निर्णयाला केंद्रातील मोदी सरकारने विरोध केला होता. मंत्रिपद मिळेल, या आशेने शेट्टी यांनी त्यांचा हात धरला. आमच्या जीवावर त्यांनी आंदोलने उभी केली, मात्र त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. आता मंत्रिपद मिळेना असे वाटू लागल्याने ते आंदोलनाची भाषा वापरू लागले आहेत. शेट्टी यांच्यावरील शेतकऱ्यांचा विश्वास उडाला असल्याने आता लढणारी फौज त्यांच्यासोबत राहिलेली नाही,’ असा टोलाही पाटील यांनी लगावला.दरम्यान, सध्या रयत सहकारी साखर कारखाना शासनाचा गळीत परवाना नसताना व पाठीमागील गळीत हंगामातील गेलेल्या उसाचे बिल अद्याप दिले नसताना तसेच तोडणी व वाहतूकदारांचे बिल अद्याप दिले नसताना कारखाना सुरू झाला आहे. ‘एफआरपी’प्रमाणे दर देण्यासाठी ६ कोटी ११ लाख ९0 हजार इतके सॉफ्ट लोन शासनाने मंजूर करूनही नव्याने प्रशासक आलेल्या अथणी शुगर प्रा. लि. ने हे कर्ज नाकारले आहे. यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहू शकतो. येत्या आठवडाभरात यावर निर्णय घ्यावा. तसेच ‘एफआरपी’प्रमाणे एकरकमी दर न देणाऱ्या कारखान्यांच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी इस्लापूरचे डी. जी. पाटील, चंद्रकांत यादव, दीपक पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी) तर अधिकाऱ्यांचे अपहरणऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी रक्तरंजित क्रांती केली जाईल. एसी मध्ये बसून शेतीचे धोरण ठरविणाऱ्या अधिकाऱ्यांचे अपहरण करुन त्यांना डोंगरात नेऊन ठेवू, असा इशारा डी. जी. पाटील यांनी यावेळी दिला.