शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

समाजवादी विचारसरणी भारतात मागे पडत चाललीय

By admin | Published: November 05, 2016 11:12 PM

भाई वैद्य : साताऱ्यातील आठवणींना उजाळा

सातारा : ‘समाजवादी विचारसरणीत अनेक लोक घडले असून, आज जागतिकीकरणाच्या वादळामुळे समाजवादी विचारसरणी भारतात मागे पडत आहे,’ असे मत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत आणि माजी गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य पुण्यभूषण भाई वैद्य यांनी दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा आयोजित ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते अनंत शिकारखाने आणि साताऱ्याच्या हृदयआठवणी पुष्प तिसरे या कार्यक्रमात व्यक्त केले.या कार्यक्रमास प्रा. रमणलाल शहा, कवी उद्धव कानडे, प्रा. पुरुषोत्तम शेठ, संस्थापक अध्यक्ष शिरीष चिटणीस, सुरेश शिकारखाने, व्यवस्थापक विनायक भोसले आदी उपस्थित होते.भाई वैद्य म्हणाले, ‘दिवंगत अनंत शिकारखाने हे हरळीच्या मुळीचे कार्यकर्ते असून, ते समाजवादी पक्षाचे जिद्दीचे कार्यकर्ते होते. त्यांचे त्या काळातील मोती चौकातील दुकान म्हणजे राजकीय वैचारिक कट्टा होता. ते शेवटपर्यंत एस. एम. जोशींबरोबर समाजवादी पक्षात राहिले. १९४६ मध्ये जेव्हा मी साताऱ्यामध्ये आलो त्यावेळेस राष्ट्र सेवादलाचा बारा हजारचा ताफा कॉ. शहनवाज खान यांच्या अखत्यारित होता. यावेळी माझे डॉ. कटारिया, भाऊसाहेब, दाभोलकर, डॉ. खुटाळे, कॉ. किरण माने, प्रा. पुरुषोत्तम शेठ, प्रा. आ. ह. साळुंखे हे मित्र होते. जागतिकीकरणामुळे आज प्रचंड विषमता व बेरोजगारी वाढत चालली असून, जागतिकीकरण हे अहितकारी आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड आत्महत्या करीत असून, हे जागतिकीकरणाचेच देणे आहे.’प्रा. रमणलाल यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात दिनकर झिंबरे, मधुसुदन पत्की, आप्पासो शालगर, लालाशेठ बागवान, सुनील बल्लाळ, शिवाजी हंबीरे, भुजबळ, शिल्पा चिटणीस, ज्योती नलवडे, बाबर, प्रदीप लोहार, उदय जाधव, बाळकृष्ण इंगळे, सतीश पवार, हणमंत खुडे, बागल, रवींद्र कळसकर, यशवंत शिलवंत, सुनील बंबाडे, आग्नेश शिंदे, प्रशांत चोरगे, लक्ष्मण कदम, सागर पोगाडे आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे शिरीष चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. गुलाब पठाण यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश शिकारखाने यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)