शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

मोळाच्या ओढ्याजवळ मृत्यूचा चौक...

By admin | Published: February 06, 2017 12:55 AM

अपघातांना निमंत्रण : सातारा-पुणे, सातारा-महाबळेश्वर रस्त्यामुळे वर्दळ मोठी; परंतु उपाययोजनांच्या त्रुटी !

सातारा : जिल्हाभर गेल्या महिन्यात रस्ता सुरक्षा सप्ताह जोरात साजरा केला गेला. परंतु शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मोळाच्या ओढाजवळील सातारा-पुणे व सातारा-महाबळेश्वर या दोन मार्गांना जोडणाऱ्या चौकात कोणत्याही उपाययोजना नसल्याने तो अपघातांना निमंत्रण देत आहे. अनेकांच्या आयुष्याचा छेद घेतलेला हा चौक ओलांडताना वाहनचालकांचा थरकाप उडवत आहे. सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा पोलिस, राज्य परिवहन महामंडळातर्फे जिल्ह्यात रस्ता सुरक्षा सप्ताह दरवर्षी थाटात साजरा केला जातो. यानिमित्ताने शहरातून अनेक उपक्रम राबवून जनजागृती केली गेली. हे सर्व कौतुकास्पद आहेच; परंतु अनेक वर्षांपासून धोकादायक ठरलेल्या बाबींकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे समोर येत आहेत. सातारा-पुणे मार्गावरील मोळाचा ओढा येथे असलेला चौक हा त्यापैकीच एक आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण झाले आहे. त्यामुळे पुण्याकडून साताऱ्यात येणारी वाहने सरासरी ऐंशी किलोमीटर प्रतितास पेक्षा जास्त वेगाने येतात. आनेवाडी टोलनाक्याचा अपवाद वगळण्यानंतर साताऱ्यापर्यंत वाहनांना कसलाही अडथळा नाही. त्यामुळे साताऱ्यात प्रवेश केला तरी वाहने आहे त्याच वेगात येतात. लिंबखिंडपासून साताऱ्यात येणारा रस्ता मोळाचा ओढापर्यंत अरुंद आहे. बरेचशे अंतर जास्त वेगात वाहन चालविल्यामुळे वाहनांचा वेग कमी करण्याची वाहनचालकांची मानसिकता होत नाही. त्यामुळे अरुंद मार्गावरून समोरून आलेल्या वाहनांना कट मारत शहरात येतात. काही अंतरावर मोळाचा ओढा लागतो. त्याठिकाणी अचानक छेद रस्ता लागतो. महाबळेश्वरकडून येणारी वाहनेही या चौकात येताना वेग कमी करत नाहीत. साताऱ्याकडून पुण्याकडे निघालेली वाहने चौक ओलांडून पुण्याकडे जातात. त्यामुळे लहान-मोठे अपघात घडत आहेत. (प्रतिनिधी) रस्त्याकडेलाच भाजीमंडई सातारा-पुणे, सातारा-महाबळेश्वरला जाणारा रस्ता जेथे जोडला जातो. तेथेच रस्त्याच्या कडेलाच सायंकाळच्या वेळेस शेतकरी भाजी विकण्यासाठी बसतात. या परिसरातील ग्रामस्थांसाठी यामुळे सोय होत असली तरी रहदारीसाठी धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे भाजीविक्रेत्यांना पर्यायी जागा देऊन भविष्यातील संकट टाळण्याची गरज आहे. वाहतूक पोलिस अन् सिग्नलचा अभाव या चौकात वाहनांचा ताण असतो. त्यामुळे येथे चोवीस तास धोका दाखविणारे स्वयंचलित सिग्नल बसविण्याची गरज आहे. तसेच वाहतूक पोलिसाची नेमणूक करण्याची मागणी अनेक वर्षांपासून जोर धरत आहे. सायंकाळी दुचाकींची वर्दळ सातारा शहराचा विस्तार होत आहे. त्यामुळे बहुसंख्य लोक कण्हेर, साबळेवाडी, नुने, सारखळ, कोंडवे तसेच सैदापूर, वर्ये, नेले, किडगाव, धावडशी आदी गावांमधील तरुण-तरुणी महाविद्यालय तसेच नोकरीनिमित्ताने दुचाकीवरून साताऱ्यात येतात. सकाळी आठ ते अकरा व सायंकाळी पाच ते सात या वेळेत दुचाकींची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या काळात पोलिस देण्याची गरज आहे. )