शहरं
Join us  
Trending Stories
1
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
2
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
3
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
4
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
5
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
6
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
7
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
8
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
9
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
10
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
11
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
12
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
13
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
14
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
15
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
16
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
17
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
18
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
19
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
20
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना

खचलेल्या पुलाला दगडाचा भराव

By admin | Published: March 11, 2017 12:49 PM

साप-रहिमतपूर वाहतुकीला अडथळा : बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

खचलेल्या पुलाला दगडाचा भरावसाप-रहिमतपूर वाहतुकीला अडथळा : बांधकाम विभागाचे दुर्लक्ष रहिमतपूर : साप-रहिमतपूर मार्गावरील वेताळ माळ येथील ओढ्यावरी पूल गतवर्षी ओढ्याला आलेल्या पावसाच्या पाण्याचा पुरामुळे खचला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही कर्मचाऱ्यांनी या पुलाची पाहणी करून खचलेल्या ठिकाणी दगडे टाकून काम आटोपते घेतले. पुलाला ओबडधोबड दगडाच्या टाकलेल्या भरावामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. बांधकाम विभागाच्या दुलर्क्षामुळे संपूर्ण पुलालाच धोका निर्माण झाला आहे. गतवर्षी उन्हाळ्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे साप-रहिमतपूर दरम्यानच्या वेताळ माळ येथील ओढ्यावरील पुलाचा भराव वाहून गेला आहे. या पुलाची तत्काळ डागडुजी करावी, अशी मागणी साप ग्रामस्थांनी केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे काही अधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी केली. काही दिवसांनी बांधकाम विभागातून एक-दोन कर्मचारी येऊन बाजूचीच दगडे खचलेल्या ठिकाणी टाकून निघून गेले. खचलेल्या ठिकाणी योग्यपद्धतीने भरावाचे काम न केल्याने पुलालाच धोका निर्माण झाला आहे. पुलाचा बराचसा भाग वाहून गेल्याने वाहनांना ये-जा करताना अडचण येत आहे. त्यामुळे या मधल्या मार्गाने रहिमतपूरला होणारा वाहतूक थांबली आहे. सध्या उन्हाळा सुरू झाला असून, उन्हाळी पावसात ओढ्याला पावसाच्या पाण्याचा पूर येण्याची शक्यता असते. तत्काळ या पुलाची दर्जेदार पद्धतीने दुरुस्ती न केल्यास संपूर्ण पूलच वाहून जाण्याची शक्यता आहे. लाखो रुपये खर्च करून नव्याने बांधलेल्या पुलाची वाट केवळ डागडुजीअभावी लावू नये. अन्यथा याला बांधकाम विभाग जबाबदार असेल. तरी तत्काळ या पुलाची दुरुस्ी करावी, अशी मागणी साप ग्रामस्थांतून होत आहे.