शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

साठवलेला कांदा वातावरणातील बदलामुळे होतोय खराब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 4:26 AM

खटाव : नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उन्हाळी कांद्याला आगामी काळात चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने कांदा चाळीत ...

खटाव : नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उन्हाळी कांद्याला आगामी काळात चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने कांदा चाळीत साठवून ठेवलेला कांदा आता वातावरणातील बदलामुळे खराब होऊ लागल्यामुळे शेतकरी आता मिळेल त्या भावात कांदा विक्री करण्याच्या लगबगीत दिसून येत आहे.

शेतकऱ्यांनी बियाणे मिळवण्यासाठी धडपड करून बियाणे मिळवले, रोपे तयार करेपर्यंत त्यानंतर कांदा लागवडीपासून ते काढणीपर्यंत नैसर्गिक विविध संकटांना तोंड द्यावे लागले आहे. बहुतांश शेतकऱ्यांची रोपे उगवण्याअधीच खराब झाली. त्यामुळे त्यांना दुबार रोपे तयार करण्यासाठी हाती बिया नसल्यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या बियाण्याची मिळेल त्या भावात खरेदी करून पुन्हा रोपे तयार केली. परंतु, त्याचा उगवण क्षमतेवर परिणाम होऊन उत्पादन कमी आले. यातच अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा पाऊस यामुळे कांद्यावर करपा रोगाने थैमान घातले. त्यामुळे उत्पादनात घट आल्यामुळे उरलेल्या कांद्याला चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. परंतु, गारपीट व अवकाळी पावसामुळे नरम झालेला कांदा चाळीत टाकल्यानंतर एक ते दीड महिन्यात खराब होण्यास सुरुवात झाली. आता कांदा बाहेर काढून निवडून विक्रीसाठी देण्याच्या गडबडीत कांदा उत्पादक शेतकरी आहेत.

उन्हाळी कांदा लागवडीसाठी महागडे कांदा बी, तणनाशके, रासायनिक खते, रोपांची लागवड कांदा काढणी आदींसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च झाला आहे. त्यातच अगदी शेवटच्या टप्प्यात अवकाळी पाऊस व रोपांवर पडलेल्या करपा रोगामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. उरलेल्या कांद्याला चांगला दर मिळेल, या अपेक्षेपोटी बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा चाळीत भरला होता. बऱ्याच दिवसांपासून कांद्याचा भाव स्थिर आहे.

कोट..

सध्या १८ रुपयांनी कांदा मार्केटमध्ये खरेदी केला जात आहे. तर किरकोळ बाजारामध्ये २२ ते २५ रुपयांप्रमाणे विकला जात आहे. चाळीतील कांदा वास्तविक ऑगस्ट महिन्यापर्यंत चाळीत सुरक्षित राहतो; परंतु अवकाळी पावसामुळे कांदा पिकावरदेखील परिणाम झाल्यामुळे साठवून ठेवलेला चाळीतील कांदाही खराब होत आहे. कांदा भरणीवेळी खराब निघत आहेत.

- हणमंत यादव, कांदा व्यापारी

फोटो कॅप्शन : खटाव तालुक्यात शेतकरी कांदा चाळीतून निवडक कांदा भरून ठेवत आहेत. (छाया : नम्रता भोसले )