शहरं
Join us  
Trending Stories
1
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
2
"राज्याचं मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे..."; ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक लावण्याची खेळी?
3
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; राहुल गांधींना कोर्टाने काढले समन्स
4
“रोहित पवार मुख्यमंत्री झाले अन् शरद पवार...”; सुप्रिया सुळे यांनी केलेले विधान चर्चेत
5
घरी जेवला, कॉलवर बोलला, ऑर्डर देण्यासाठी गेला पण...; डिलिव्हरी बॉयसोबत 'त्या' दिवशी काय घडलं?
6
ऑलिम्पिक, पॅरालिम्पिकपटूंचा अंबानी कुटुंबीयांकडून गौरव; अँटिलियावर शाही सोहळा, PHOTOS
7
"भाषण बंद करेन अन् निघून जाईन", अजित पवारांचा चढला पारा, माजलगावात काय घडले?
8
काय सांगता!'या' कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न फक्त २ रुपये, तहसीलदारांनीच दिला दाखला
9
PC Jewellers Share Price : वर्षभरात ६००% नी वाढला 'हा' Multibagger; आता १० भागांमध्ये स्प्लिट होणार, शेअरमध्ये तुफान तेजी
10
मनसेची मागणी, CM शिंदेंनी घेतली दखल;  'नायर' रुग्णालय लैंगिक छळप्रकरणी तातडीचे आदेश
11
शोरूमचे कुलूप तोडले, दुचाकीसह ५० हजार रुपये लुटले; जाता-जाता शटरवर लिहिले, 'जीत चोर की' 
12
"शरद पवारांना हलक्यात घेणं म्हणजे आत्मघात", सुनील तटकरे विधानसभा निवडणुकीबद्दल काय बोलले?
13
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
14
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
15
'छोटा पॅकेट बडा धमाका', फक्त ९१ रुपयांत ९० दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा BSNLचा नवा प्लॅन
16
लेबनॉनमध्ये भारतीय अडकले? इस्त्रायलच्या कारवाईनंतर चिंता वाढली, पंतप्रधान मोदींनी नेतन्याहूंना केला फोन
17
आमदाराला आला हार्ट अटॅक, सुरक्षा अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवला जीव; नेमकं काय घडलं?
18
ग्रहांची वक्रदृष्टी, प्रतिकूल प्रभाव आहे? ‘हे’ स्तोत्र अवश्य म्हणा; नवग्रहांचा शुभ-लाभ मिळवा
19
IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट
20
अभिनेत्यांना रात्री भेटण्यासाठी नकार दिल्यामुळे या अभिनेत्रीला काम मिळणं झालं बंद, बॉलिवूडमधून झाली होती गायब

‘दुधेभावी-घोरपडी’ तलाव प्रकल्प यशस्वी

By admin | Published: November 14, 2016 9:34 PM

राज्यातील पहिला प्रकल्प : ढालगाव परिसराला वरदान; ढोलेवाडी, बेवनूर गावातील लाभक्षेत्र पाण्याखाली

ढालगाव : कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधेभावी तलावातून सायफन पध्दतीने घोरपडी तलावात पाणी सोडण्यात आले. राज्यातील हा पहिला तलाव जोड प्रकल्प यशस्वी करण्यात आला आहे. ढालगाव भागातील २ गावे दुष्काळी परिस्थितीशी सामना देत आहेत. सहा महिन्यांपूर्वी खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नामुळे टेंभूचे पाणी कवठेमहांकाळ तालुक्यात आले. नागजच्या ओढ्यात हे पाणी सोडून ते दुधेभावी तलावात सोडण्यात आले. त्यामुळे या तलावातून ढालगाव, चोरोची, कदमवाडी, दुधेभावी, ढोलेवाडी या गावांना पाणी मिळणार असल्याने, या गावांना हा तलाव आता वरदान ठरला आहे.दुधेभावीपासूनच पाच किलोमीटर अंतरावर घोरपडी तलाव आहे. या तलावात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जर काम केले, तर ते कमी खर्चात होईल, असा प्रस्ताव सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक चंद्रकांत हाक्के यांनी संजयकाका पाटील व जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्यासमोर मांडला व त्यांच्या उपस्थितीत दोन महिन्यापूर्वी भूमिपूजन करून हे काम सुरू करण्यात आले.खासदार संजयकाका पाटील, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, चंद्रकांत हाक्के, तहसीलदार शिल्पा ठोकडे, सांगोल्याचे भाजपचे श्रीकांत देशमुख यांच्या उपस्थितीत दुधेभावी तलावातून घोरपडी तलावात पाणी सोडण्यात आले. राज्यातील पहिलाच ‘कमी खर्चात तलाव जोड’ हा आदर्शवत प्रकल्प पूर्ण झाला आहे.दुधेभावी तलावातून घोरपडी तलावात पाणी सोडल्यामुळे दुधेभावीचा काही भाग, ढोलेवाडी, बेवनूर या गावातील लाभक्षेत्रास याचा चांगला फायदा होणार आहे. येथील शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची पेरणी केली आहे. पण पाण्याविना ही पिके वाळू लागली होती. जनावरांनाही पिण्यास पाणी मिळेना, अशी बिकट परिस्थिती असतानाच दुधेभावी तलावातून कालव्यात पाणी सोडल्याने या भागातील सर्वच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी दुधेभावी तलावातून घोरपडी तलावात पाणी सोडले. त्याचबरोबर या तलावावर असणाऱ्या कालव्यामधूनही शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे पाणी सोडण्यात आले. त्यामुळे या तलावाखालील असणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. या तलावातून पाणी सोडणार आहेत असे समजल्यानंतर, या तलावावर शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी राजाराम पाटील, कोंडीबा पाटील, खाजा खाटीक, भगवान फोंडे, अनिल बाबर आदी उपस्थित होते.घोरपडी तलावात पाणी सोडण्याच्या कार्यक्रमास हायूम सावनूरकर, अनिल शिंदे, दादासाहेब कोळेकर, तमाण्णा घागरे, विकास हाक्के, डॉ. दिलीप ठोंबरे, बाळासाहेब पाटील, शिवाजी खरात, संजय खरात, बंडू पाटील उपस्थित होते. जास्त क्षमतेने टेंभूचे पाणी जर जास्त दिवस असेच सुरू ठेवले, तरच या राज्यातील आदर्शवत प्रकल्पाचा फायदा जनतेस होणार आहे. जर पाणी लवकर बंद केले, तर या भागातील शेतकऱ्यांच्या ज्या आशा पल्लवित झाल्या आहेत, त्या परत कोमेजून जातील व पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येईल. त्यामुळे प्रशासनाने नियमित पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशीच मागणी या भागातील सर्वसामान्य जनतेतून होत आहे. (वार्ताहर)सायफन पध्दत : पाण्याचा मार्ग मोकळाखासदार व जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन महिन्यापासून सहाशे मीटर लांब, चार मीटर रूंद व खोल असा कालवा काढण्याचे काम सुरू होते. मात्र तलावात पुरेसे पाणी नव्हते. दुधेभावी तलावाची पाणी साठवण क्षमता १४०.६५ फुटाची आहे. मात्र तेवढे पाणी तलावात उपलब्ध नव्हते. त्यामुळे खासदार पाटील यांनी प्रयत्न करून या भागाची विदारक अवस्था अधिकाऱ्यांसमोर मांडून, जास्त क्षमतेने पाणी सोडण्याची मागणी केली व हा तलाव आता ७0 टक्के भरण्यात आला आहे. सहाशे मीटर लांबीच्या कालव्याचे काम पूर्ण झाल्याने पुढील पाणी सायफन पध्दतीने घोरपडी तलावात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.