शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

सातारकरांनो आरोग्य सांभाळा; जुलै वाढवू लागलाय ‘ताप’..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:27 AM

सातारा : पावसाळ्यात कमाल तापमान २५ अंशाच्या खाली येते. पण, मागील काही दिवसांत पावसाची दडी असल्याने जुलै महिन्यातच कमाल ...

सातारा : पावसाळ्यात कमाल तापमान २५ अंशाच्या खाली येते. पण, मागील काही दिवसांत पावसाची दडी असल्याने जुलै महिन्यातच कमाल तापमान ३२ अंशावर गेले. यामुळे पावसाळ्यात उन्हाचा चटका जाणवला. परिणामी बदलत्या हवामानामुळे आरोग्य सांभाळण्याची वेळ आली आहे.

जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात कमाल तापमान ४० अंशाच्या पुढे जाते. २०१९ आणि २०२० या दोन वर्षांचा विचार करता कमाल तापमान ४२ अंशावर पोहोचले होते. पण, यंदा उन्हाळा जाणवलाच नाही. कारण, कमाल तापमानाने एकदाही ४० अंशाचा टप्पा पार केला नाही. त्यातच यावर्षी वेळेवर मान्सूनचा पाऊस सुरू झाला. त्यामुळे कमाल पारा २५ अंशाच्याही खाली आला होता. पण, गेल्या काही दिवसांत पावसाने दडी मारली. त्यामुळे कमाल तापमान वाढत गेले. दुपारच्या सुमारास ऊन पडत होते. तसेच उकाडाही चांगलाच जाणवला. रात्रीच्या वेळी तर पंखे सुरू करुन झोपण्याची वेळ नागरिकांवर आली होती.

हवामान विषयक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पावसात अनेक दिवस खंड पडला. तर अशी स्थिती अनुभवास मिळते. त्यामुळे आताही जुलै महिन्यात कमाल तापमान वाढल्याचे दिसून आले. यामुळे पिकांवरही याचा परिणाम होतो. तसेच वैद्यकीय तज्ञ सांगतात या वातावरणामुळे किरकोळ आजार वाढतात.

चौकट :

सरासरी तापमान ५ अंशाची वाढ...

जुलै महिन्यात चांगला पाऊस होतो. त्यामुळे कमाल तापमान हे २५ अंशापेक्षा कमी राहते. यावर्षी मात्र; २० दिवस पावसाने दडी मारली. वातावरण कोरडे होते. त्यामुळे कमाल तापमान ३२ अंशावर गेले होते. सरासरी ५ अंशाची वाढ झाली.

साताºयातील कमाल तापमाने असे :

दि. २५ जून २७.०३, २६ जून ३०, २७ जून २६.०२, २८ जून ३१.०४, २९ जून ३१.०६, ३० जून ३०.०८, दि. १ जुलै २९.०९, २ जुलै २९.०८, ३ जुलै ३१.०५, ४ जुलै ३२.०४, ५ जुलै ३२.०४, ६ जुलै ३२.०१, दि. ७ जुलै ३२.०२, ८ जुलै ३०.०५ आणि ९ जुलै २७.०६

..................................................

१२ दिवस उनाची तीव्रता...

- जिल्ह्यात जून महिन्याच्या मध्यावर पाऊस पडला होता. त्यानंतर पावसाची उघडीप राहिली. जवळपास २० दिवस पावसात खंड होता. त्यामुळे २६ जूनपासून ८ जुलैपर्यंत उनाची तीव्रता जाणवली.

- या १२ दिवसांत सातारा शहरातील कमाल तापमान बहुतांशीवेळा ३० अंशाच्या पुढेच होते. त्यामुळे दुपारच्या सुमारास उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागला.

- मागील दोन दिवसांपासून मान्सूनचा पाऊस पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळे कमाल तापमान कमी होत चालले आहे. सध्या ३० अंशाच्या खाली पारा आहे.

..............................................................

असे नोंद झाले जुलैत तापमान

३२.०४- २०२१

३१.०८-२०२०

३२.०५-१९९९

३३.०५-१९९८

३३.०५-१९९५

३२.०५-१९९३

३२.०५-१९९२

...........................

प्रतिक्रिया...

जून महिन्यात पाऊस झाला. त्यानंतर काही दिवस ढगाळ वातावरण राहिल्यानंतर उन्हाचा चटका वाढला. त्यातच आता ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर पाऊसही पडतोय. त्यामुळे सततच्या हवामान बदलाने सर्दी, तापसारखे आजार होऊ शकतात. नागरिकांनी अशा काळात आरोग्याची काळजी घ्यावी, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.

.......................................

हवामानातील बदलामुळे जगातील बहुतेक देशात जुलै महिन्यात उष्णतेच्या लाटा येत आहेत. परंतु, ही स्थिती नेहमीच अशी राहत नाही. महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसाने दडी मारल्याने हवेतील उकाड्यात वाढ झाली. त्यामुळे जुलै महिन्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. ही वाढ खरीप पिकांसाठी धोक्याची घंटा आहे. बदलत्या हवामानाचे ते एक निर्देशक आहे.

- प्रा. डॉ. सुभाष कारंडे

..............................................................