शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

कोरडी झालेली कोयना आनंदाश्रूंनी भरून जाईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 12:31 IST

एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ सालचा. त्यांचे प्राथमिक चौथीपर्यंतचे शिक्षण गावाकडेच झाले. त्यानंतर पुढील शिक्षणाची सोय नसल्याने ते मुंबईला आले. वडील संभाजी शिंदे यांनी मुंबईमध्ये एक प्लायवूडचे दुकान सुरु केले होते.

दीपक शिंदे -

सातारा : महाराष्ट्र नवे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांचे मूळ गाव हे सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फे तांब. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले शिंदे लहानपणापासून गावाकडेच होते. त्यामुळे त्यांची गावाशी आणि गावकऱ्यांशी चांगल्या पद्धतीने नाळ जुळलेली आहे. सध्या कोयना नदी कोरडी आहे, पण गावकऱ्यांना एवढा आनंद झाला आहे की ही नदी आनंदाश्रूंनी भरून जाईल, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.  एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ सालचा. त्यांचे प्राथमिक चौथीपर्यंतचे शिक्षण गावाकडेच झाले. त्यानंतर पुढील शिक्षणाची सोय नसल्याने ते मुंबईला आले. वडील संभाजी शिंदे यांनी मुंबईमध्ये एक प्लायवूडचे दुकान सुरु केले होते. या भागातील सर्वच लोकांची अशीच परिस्थिती आहे. कोयना धरणामुळे गावे विस्थापित झाली होती. जमीन पाण्याखाली गेल्याने उपजीविकेची फारशी साधने उपलब्ध नव्हती. त्यामुळे घरातील कर्ता पुरुष मुंबईला जाऊन नोकरी करत असे आणि आपल्या पगारातील पैसे मुंबईहून गावाला पाठवायचे त्यावर कुटुंबाची गुजराण करायची. एकनाथ शिंदे यांचे वडील मुंबईत होते. त्यामुळे त्यांना शिक्षणासाठी मुंबईत आणण्यात आले. या ठिकाणी त्यांनी आपले पुढील अकरावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते कुटुंबाला हातभार म्हणून वागळे इस्टेट परिसरात रिक्षा चालविण्याचे काम करत होते. एकनाथ शिंदेंना दोन भाऊ प्रकाश आणि सुभाष तर सुनीता नावाची एक बहीण आहे.  ठाणे परिसरात सातारा कॅम्प म्हणून रिक्षाचालकांची मोठी संघटना आहे. हे लोक एकमेकांच्या मदतीने रिक्षाचा व्यवसाय करतात. रिक्षा चालवून कुटुंबाची गुजराण होते. त्यामुळे गावाकडून मुंबईत ठाणे, गोरेगाव या भागात गेलेले अनेक लोक रिक्षा चालवितात आणि ते सर्व शिवसेनेशी बांधिलकी ठेवून असतात. रिक्षाचालकाचा व्यवसाय करताना एकनाथ शिंदे यांची भेट आनंद दिघे यांच्याशी झाली आणि त्यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. ठाणे पालिकेचे नगरसेवक, सभागृह नेते, आमदार आणि आता मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. त्यांच्या या निवडीनंतर गावातही आनंदोत्सव साजरा केला जात आहे. 

गावकऱ्यांनी केला होता मुख्यमंत्रिपदासाठी नवसदरे तर्फे तांब या गावातील लोकांनी युतीचे सरकार आले त्या वेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे यासाठी ग्रामदैवत उत्तरेश्वर देवाला नवस केला होता. एकनाथ शिंदे यांचीही या देवावर खूप श्रद्धा आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी देवाच्या मंदिरात येऊन आनंदोत्सव साजरा केला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSatara areaसातारा परिसर