शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दूध दरात घट; खाद्याचे दर वाढले!, पशुपालक मेटाकुटीस 

By संजय पाटील | Updated: October 12, 2023 11:37 IST

संजय पाटील कऱ्हाड : पशुखाद्याचे दर सतत वाढत असल्याने पशुपालक शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आले आहेत. पशुखाद्याच्या दरात गत महिन्यातच ...

संजय पाटीलकऱ्हाड : पशुखाद्याचे दर सतत वाढत असल्याने पशुपालक शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आले आहेत. पशुखाद्याच्या दरात गत महिन्यातच तीस रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पन्नास किलोच्या खाद्याचा दर १ हजार ४०० ते १ हजार ७५० रुपयांपर्यंत गेला आहे. एकीकडे खाद्याचे दर वाढलेले असताना दुसरीकडे दूध दरात मात्र कपात झाली असून, दुधाचा दर तीन ते चार रुपयांनी कमी झाला आहे.

पशुखाद्यामध्ये सरकी, गोळी पेंड, आटा, हरभरा असे प्रकार आहेत. सरकी व गोळी पेंडीला शेतकरी पसंती देतात. सध्या विविध कंपन्यांचे पशुखाद्य बाजारात उपलब्ध आहे. त्यामध्ये कंपनीनुसार शंभर, दोनशे रुपयांचा कमी-जास्त फरक आहे. मात्र, बहुतेक खाद्याचे दर हे १ हजार ४०० रुपयांपेक्षा जास्त आहेत.ज्या शेतकऱ्यांकडे पाच किंवा त्याहून अधिक जनावरे आहेत त्यांना दुभत्या जनावरांना खाद्य घालणे परवडते; पण, ज्या शेतकऱ्याकडे एक किंवा दोन दुधाळ म्हैशी आहेत त्यांना खाद्य घालणे परवडत नाही. एक म्हैस चार लिटर दूध देत असेल तर तिच्या खाद्यापोटी शेतकऱ्याला महिन्याकाठी चाडेचार ते पाच हजार रुपये मोजावे लागत आहेत. पन्नास किलो खाद्याचे पोते जेमतेम दहा ते बारा दिवस पुरते. त्यामुळे एक म्हैस असणाऱ्या शेतकऱ्याला म्हैशीला खाद्य घालणे परवडत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

दुधाचे दर फारसे वाढत नाहीत. तसेच दुधाचे दर वाढण्याची चर्चा झाली तरी पशुखाद्याचे दर पन्नास ते शंभर रुपयांनी वाढतात. त्यामुळे दूध उत्पादनातून मिळणारे पैसे आणि जनावरांच्या खाद्यासाठीचा खर्च यांचा मेळ घालताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहेत.

पशुखाद्याचे दर (प्रति ५० किलो)

  • गोळी पेंड : १,६०० ते १,७२० रु.
  • सरकी पेंड : १,७०० ते १,७८० रु.
  • हरभरा : १,४०० ते १,४६० रु.

चाऱ्याचा प्रश्न गंभीरदुधाळ जनावरांना खाद्यासह सुका व ओला चारा गरजेचा असतो. मात्र, यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे चाऱ्याचा गंभीर प्रश्न पशुपालक शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांना ओला चारा मिळणे कठीण झाले आहे. त्यातच चाऱ्याचेही दर वाढले आहेत. त्यामुळे जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

फॅटनुसार दूध दरम्हैस :६०/९० : ४८ रु.६५/९० : ५२ रु.

गाय :३५/८५ : ३२ रु.४०/८५ : ३३.५० रु.

पशुखाद्याचे दर वाढले असल्याने जनावरांना खाद्य घालणे शेतकऱ्यांना परवडत नाही. तरीही चांगल्या प्रतीचे दूध मिळावे म्हणून आर्थिक झळ सोसून शेतकरी जनावरांना खाद्य घालत आहेत. सरकारने पशुखाद्याचे दर कमी करावेत अथवा त्यावर अनुदान द्यावे. - प्रशांत पाटील, शेतकरी, तांबवे 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmilkदूध