शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

नवरात्रोत्सवाच्या तोंडावरच नारळाने खाल्ला भाव!, शेकड्यामागे किती रुपयांची झाली वाढ.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 1:03 PM

सातारा : सणासुदीच्या काळात डाळी अन् खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली असतानाच आता नारळानेदेखील चांगलाच भाव खाल्ला आहे. नारळाच्या दरात ...

सातारा : सणासुदीच्या काळात डाळी अन् खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली असतानाच आता नारळानेदेखील चांगलाच भाव खाल्ला आहे. नारळाच्या दरात शेकड्यामागे तब्बल ८०० रुपयांची वाढ झाली असून, दिवाळीपर्यंत आणखी २०० रुपयांची दरवाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तविली जात आहे. सध्या किरकोळ बाजारात एका नाराळासाठी ३५ ते ४० रुपये मोजावे लागत आहेत.सातारा जिल्ह्यात तामिळनाडू, कर्नाटक राज्यांतून नारळांची आवक होते. यंदा पावसामुळे नारळ उतरविण्याचे काम ठप्प आहे. उत्पादन कमी व वाढलेली मागणी हे दरवाढीचे प्राथमिक कारण असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. गणेशोत्सवात दर स्थिर होते. मात्र, अवघ्या पंधरा दिवसांतच शेकड्यामागे ६०० ते ८०० रुपयांची वाढ झाली आहे.

पावसाचा मोठा फटका नारळ उत्पादकांना बसला आहे. शेकड्यामागे ६०० ते ८०० रुपयांची वाढ झाली असून, दिवाळीपर्यंत आणखी २०० रुपयांची वाढ होईल असे सध्याचे चित्र आहे. - संजय मोरे, नारळ व्यावसायिक

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNavratriनवरात्री