शहरं
Join us  
Trending Stories
1
पात्रतेच्या आधारे नोकऱ्या मिळतात, उपकार करत नाही; मनसेच्या आंदोलनाचा विषय संसदेत गाजला
2
ओलाने फेब्रुवारीत असा आकडा फुगविला; रोडस्टर अद्याप रस्त्यावर आली नाही ती विकल्याचे दाखविले...
3
"...तर उद्या मराठी माणसाला कोण वाचवणार?; RSS, बजरंग दलमध्ये ९० टक्के उत्तर भारतीय"
4
Hanuman Jayanti 2025: हनुमान जयंती की जन्मोत्सव? दरवर्षीचा वाद; त्यावर दाते पंचांगाचा खुलासा!
5
सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात हायकोर्टाने याचिका स्वीकारली; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
6
झुनझुनवालांचा फेव्हरिट स्टॉक बनला रॉकेट, बिजनेस अपडेटनंतर आली तुफान तेजी; तुमच्याकडे आहे का हा शेअर
7
मिठाईवरून तृणमूल काँग्रेसच्या दोन खासदारांमध्ये वादावादी, नेमकं घडलं काय?
8
हिंदू प्रियकरासोबत लग्न करत शबनमची बनली शिवानी; २ पती, ३ पोटच्या मुलांनाही सोडलं
9
पंतप्रधान मोदी सामान्य माणूस नसून अवतार, मी स्वतः रामसेतू बांधणीच्या खारूताईसारखी : कंगना
10
एक महिना मैदा न खाल्ल्याने शरीरात होतात सकारात्मक बदल; आजच करा सुरुवात
11
मुंबईतील सर्वात मोठे जमीनदार कुटुंब; ५०००० कोटींच्या भूमिचे मालक; तुमच्या घरातही मिळतील यांच्या वस्तू
12
Hanuman Jayanti 2025: मंदिर रामाचे, हनुमानाचे, पण लक्ष्मण, भरत, शत्रूघ्नाचे नाही, असे का? वाचा!
13
पत्नीच्या कॅन्सरबाबत कळताच अशी झालेली आयुषमान खुराणाची अवस्था, म्हणाला- "मी हॉस्पिटलमध्ये खांबाच्या मागे बसून..."
14
Sonu Sood : "जर सीट बेल्ट नसेल तर..."; पत्नीच्या अपघातानंतर १२ दिवसांनी सोनू सूदने जनतेला केलं 'हे' आवाहन
15
सिंगापूरमध्ये शाळेला आग, पवन कल्याण यांचा मुलगा जखमी; लवकरच रवाना होणार आंध्रचे उपमुख्यमंत्री
16
"तू एक काम कर..."; मरणाच्या दारातून परतलेल्या रिषभ पंतला आशिष नेहराने दिलेला मोलाचा सल्ला
17
जयपूरमध्ये व्यावसायिकाने ९ जणांना चिरडले; दारू पिऊन पळवली ७ किमी गाडी, पोलिसांच्या गाड्याही सोडल्या नाही
18
Hanuman Jayanti 2025: हनुमान जयंतीनिमित्त महाराष्ट्राच्या 'या' मंदिरांमध्ये घ्या मिशीवाल्या मारुतीचे दर्शन!
19
जगाला मंदीच्या गर्तेत अडकवणार ट्रम्प यांचा हट्ट? काय आहे ९५ वर्षे जुनी स्मूट-हॉले टॅरिफची भयाण कहाणी
20
धक्कादायक! आणखी १५ वर्षं खेळायचं होतं पण..., क्रिकेटपटूने २७ व्या वर्षीच स्वीकारली निवृत्ती

घडतंय बिघडतंय : सह्याद्री कारखाना निवडणुकीत दोघांच्या भांडणात, सत्ताधाऱ्यांचाच लाभ!

By प्रमोद सुकरे | Updated: April 7, 2025 13:32 IST

म्हणे, बाळासाहेब शत्रू, पण विरोधकांची परस्परांवरच टीका

प्रमोद सुकरेकऱ्हाड : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतो, असे म्हटले जाते. त्याचा प्रत्यय सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक निकालातून समोर आला आहे. भाजपचे आमदार मनोज घोरपडे व भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यातील अंतर्गत वाद या निवडणुकीत चव्हाट्यावर आला. त्यांनी कारखाना निवडणुकीत सत्ताधारी अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात स्वतंत्र २ पॅनल उभी केली. साहजिकच त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना झाला किंवा त्यांनी उचलला. सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांचे पॅनल या निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कऱ्हाड उत्तरमध्ये ऐतिहासिक सत्तांतर झाले. भाजपचे मनोज घोरपडे यांनी 'कमळ' फुलवले. यामुळे मतदारसंघात वेगळाच माहोल होता. सह्याद्री कारखान्याची पहिलीच निवडणूक अन् कार्यक्षेत्रातील सुमारे ७५ टक्के मतदार याच कराड उत्तरमधील असल्याने परिवर्तन करण्याचा चंग विरोधकांनी बांधला होता.

सत्ताधारी अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात विरोधक एकच तगडे पॅनल उभे करतील, अशी व्यूहरचना होताना दिसत होती. पण, त्याला दृष्ट लागली. शेवटच्या क्षणी जागा वाटपावरून मतभेद झाले. विरोधकांच्यात फूट पडून तिरंगी लढतीचे चित्र समोर आले. अगदी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत पुन्हा ही लढाई एकास एक व्हावी म्हणून प्रयत्न झाले खरे, पण त्यात विरोधकांना यश आले नाही.

वास्तविक जेव्हा विरोधकांच्यात फूट पडून त्यांचीच दोन पॅनल रिंगणात उतरली. तेव्हाच त्यांचे कार्यकर्ते मनात हरलेले दिसले. आता या तिरंगी लढतीचा फायदा सत्ताधाऱ्यांनाच होणार असे ते खासगीत बोलू लागले आणि मनात हरलेले सैनिक रणांगणात जिंकू शकत नाही, त्याचे प्रत्यंतर रविवारी निकालातून दिसून आले.

तिरंगी लढतीची तीच चूकआजवर कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात जेव्हा जेव्हा तिरंगी लढत झाली. तेव्हा त्याचा फायदा बाळासाहेब पाटील यांनाच झाल्याचा इतिहास आहे. पण, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकास एक लढत झाली. अन् उत्तरेत परिवर्तन झाले. खरंतर हा अनुभव ताजा असतानाच पुन्हा विरोधकांनी तिरंगी लढतीची चूक केली. त्याचा फायदा पुन्हा एकदा बाळासाहेब पाटील यांनाच झाला, हे समोर आले आहे.

विमानाचे ‘उड्डाण’ झालेच नाहीया निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास थोरात यांनी तिसरे पॅनेल रिंगणात उतरवले. जाहीर सभा अन् प्रत्यक्ष मतदार भेटीगाठीसाठी त्यांनी धडाका लावला. पण, त्यांना प्रत्यक्ष मिळालेली अत्यल्प मते पाहता त्यांच्या विमानाने या निवडणुकीत ‘उड्डाण’च केलेच नाही असे म्हटले जात आहे.

म्हणे, बाळासाहेब शत्रू पण परस्परांवरच टीकाया निवडणुकीत विरोधकांचीच दोन पॅनल रिंगणात उतरली. त्यांनी पत्रकार परिषदांमध्ये बोलताना आमचा मुख्य शत्रू सत्ताधारी बाळासाहेब पाटील असल्याचे सांगितले. पण, प्रत्यक्ष प्रचार सभा, बैठकांमध्ये परस्परांवरच टीका केली. त्यांच्यातील टोकाचा संघर्ष चव्हाट्यावर आला. साहजिकच काठावरच्या मतदारांनी ‘कपबशी’'तूनच चहा पिणे पसंत केले.

‘मनो-धैर्य’ विस्कटले, गणित फिस्कटले!कऱ्हाड उत्तरमधून भाजपच्या माध्यमातून आमदारकीसाठी मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम हे दोघेही इच्छुक होते. घोरपडेंना उमेदवारी मिळाली. सगळे एकवटले अन् परिवर्तन झाले. पण, 'सह्याद्री'च्या या निवडणुकीत 'मनो-धैर्य' विस्कटलेले दिसले अन गणित फिस्कटले. 'आता म्हणा ''रामकृष्ण'' हरी, पुन्हा बसले तेच सत्तेवरी!' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

तिरंगी लढत झाली की घडविली?सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात तिरंगी लढत झाली, हे खरे आहे. पण, ही तिरंगी लढत नक्की अंतर्गत वादामुळे घडली की कोणी घडवून आणली, याबाबत कार्यक्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

..पण ‘छत्री’ उघडलीच नाहीया निवडणुकीत सभासद परिवर्तनाच्या बाजूने मतांचा पाऊस पाडतील, असे सुरुवातीला बोलले जात होते. निवडणुकीदरम्यान वळवाच्या पावसाचे संकटही आले. पण, सभासदांनी 'छत्री' उघडीच नाही. त्यांनी जुन्याच आडोशाला जाणे पसंत केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक 2024Balasaheb Patilबाळासाहेब पाटीलdhairyashil kadamधैर्यशील कदम