शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

सत्ता गेल्याच्या नैराश्येतून आघाडीचे राज्यात अशांतता निर्माणचे काम, केशव उपाध्ये यांचा आरोप 

By नितीन काळेल | Published: September 02, 2024 7:22 PM

विधानसभा निवडणूक ठरलेल्या वेळेतच होणार

सातारा : सत्ता गेल्याच्या नैराश्यातून महाविकास आघाडी महाराष्ट्रात दुही आणि अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण, राज्यातील जनताच त्यांना विधानसभा निवडणुकीत उत्तर देईल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील त्यांचे प्रेमही बेगडी आहे, असा आरोप भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला, तसेच राज्यातील विधानसभा निवडणूक ठरलेल्या वेळेतच होईल, अशी पुष्टीही त्यांनी दिली.सातारा येथे भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग साेशल मीडिया बैठकीस आल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उपाध्ये बोलत होते. यावेळी भाजपचे महाराष्ट्र माध्यम प्रमुख नवनाथ बन, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार आदी उपस्थित होते.भाजप प्रवक्ते उपाध्ये म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणे दुर्दैवी बाब आहे. याचे कोणीच समर्थन करणार नाही. पण, महाविकास आघाडीने जोडे मारो आंदोलन केले. सध्या आघाडीतील तिन्ही पक्षांकडूनच गलिच्छ राजकारण सुरू आहे. उद्धवसेनेचे संजय राऊत म्हणतात महाराष्ट्र का पेटत नाही. चंद्रकांत खैरे यांनीही वादग्रस्त वक्तव्य केले, तर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाडही आता इतिहास शिकवू लागलेत, हे हास्यास्पद आहे. आघाडीला राज्यात अशांतताच निर्माण करायची आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केल्याचे चुकीचे सांगितले जाते. आमच्या दृष्टीने शिवाजी महाराजांची ती स्वराज्य विजयाची मोहीम होती, असे सांगून उपाध्ये पुढे म्हणाले, शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली. पण, विरोधक आंदोलन करतात. पंडित जवहरलाल नेहरू यांनीही शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे शब्द वापरले होते. शीख समाजातील व्यक्तींच्या हत्या करण्यात आलेल्या होत्या. याबद्दल सोनीया गांधी यांनी माफी मागितली होती. राहुल गांधी यांनीही न्यायालयात माफी मागितलेली. माफी मागणे पुरेसे नसेल, तर राहुल गांधींविरोधात कोणते आंदोलन करणार ते महाविकास आघाडीने स्पष्ट करावे.

आम्हाला शहाणपणा शिकवू नये..राज्यात कायदा आणि सुव्यवस्था चांगली आहे. विरोधकांनी शहाणपणा शिकवू नये, असा इशारा उपाध्ये यांनी दिला. तसेच उद्धव ठाकरे यांच्या टीकेविषयी पत्रकारांनी प्रश्न केल्यावर उपाध्ये यांनी जे स्वत:चा पक्ष, कार्यकर्ते, आमदार सांभाळू शकत नाहीत. जे वडिलांच्या वारसापासून गेट आऊट झालेत. त्यांनी आम्हाला ‘गेट आऊट’ म्हणणे हास्यास्पद आहे, असा टोलाही लगावला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahavikas Aghadiमहाविकास आघाडी