शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

तरडगावातील बसस्थानक येथील पुलाचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 1:05 PM

 पुढील महिन्यात २९ जून  रोजी आळंदी येथून माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होत असून फलटण तालुक्यातील तरडगाव येथे ८ जुलै रोजी सोहळा एक दिवसाच्या मुक्कामासाठी येत आहे.

तरडगाव- पुढील महिन्यात २९ जून  रोजी आळंदी येथून माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होत असून फलटण तालुक्यातील तरडगाव येथे ८ जुलै रोजी सोहळा एक दिवसाच्या मुक्कामासाठी येत आहे. मात्र बसस्थानक येथील पुलाचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे.तसेच काही दिवसांनी पावसाळा सुरू होणार आहे. अशात हे काम पूर्ण होणार की नाही?  याबाबत प्रश्न निर्माण होत आहे. पालखी तळ लगत पुलाचे काम पूर्ण होवून तो वाहतुकीसाठी खुला झाल्याने सर्वाँना येथील दुसऱ्या पुलाच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा लागली आहे. 

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा व त्यामधील चांदोबाचा लिंब येथील उभे रिंगण यामुळे अवघ्या राज्याला परिचित असणार  सांप्रदायिक गाव म्हणजे तरडगाव होय. आषाढी वारीतील पालखी सोहळ्याचा येथे एक दिवस मुक्काम असतो. वारीत सहभागी वारकऱ्यांची गैरसोय होवू नये यासाठी दरवर्षी तात्पुरत्या योजना केल्या जातात. मात्र वर्षानुवर्षे बसस्थानक परिसरात रखडलेल्या कामामुळे  आजवर नागरिक व प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.

आळंदी - पंढरपूर - मोहोळ या पालखी मार्गाच्या सहापदरीकरण कामात तरडगाव मधील पालखी तळ लगत व बसस्थानक परिसर या दोन ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले.सुरुवाती पासून संथ गतीने सुरू राहिलेल्या या कामातील पालखी तळ येथील पुलाचे काम पूर्ण होवून त्यावरून सध्या वाहतूक सुरू झाल्याचे दिसत आहे. मात्र बसस्थानक येथील पुलाचे काम अजूनही पूर्णावस्थेत न आल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत.

सध्या अपूर्णवस्थेतील पुला शेजारून एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. काम संथगतीने सुरू राहिल्याने व्यवसायिकांना देखील मोठा फटका बसला आहे. तर धुळीचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडी अन् सुरू असलेल्या कामामुळे परिसर पूर्णतः बदलून गेल्याने बाहेरून एखादा प्रवाशी येथे आला तर बसस्थानक कुठे आहे? असा प्रश्न विचारताना तो दिसतो. 

काम पूर्णत्वास झाल्यावर समस्या दूर होतील मात्र सध्याची परिस्थिती पाहता नागरिक,प्रवाशी वर्ग ,व्यवसायिक यांचा विचार करता त्यांना भेडसावणाऱ्या इतर  अडचणी दूर करण्यासाठी व  वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. तसेच पालखी आगमनापूर्वी या पुलाचे काम पूर्ण न झाल्यास पालखी सोहळ्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल अशी चर्चा होताना दिसत आहे.  

ते 'वळण ' होणार का सरळ?

२०१० पासून चौपदरीकरण रस्त्याच्या कामात रखडलेले  तरडगाव ओढया जवळील  अपघाती वळण अजून जैसे थे आहे. आजवर रात्रीच्या सुमारास रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात घडून यामध्ये अनेक जखमी झाले आहेत.तर काहीना जीवास मुकावे लागले आहे.अपघात झाल्यावरच यावर केवळ तात्पुरत्या उपाय योजना झाल्या आहेत.

'सबंधित विभागाने पालखी सोहळा व पावसाळा या गोष्टी लक्षात घेवून यापूर्वीच योग्य नियोजन करून पुलाच्या कामाची पूर्तता करणे आवश्यक होते.नैसर्गिक आपत्तीत अशी कामे सुरू ठेवणे शक्य नसते.काम पूर्ण न झाल्यास याचा फटका वारकऱ्यांसह सर्वांना बसेल.तो बसू नये याची दक्षता घेण्यात यावी.                                       सतीश गायकवाड                                       संस्थापक अध्यक्ष                              माऊली सेवा दल,तरडगाव

टॅग्स :satara-acसातारा