शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

जिल्ह्यात यंदा कडक उन्हाळा नाहीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:41 AM

सातारा : जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात कमाल तापमान ४३ अंशापर्यंत पोहोचते. यंदा मात्र, पारा ४० अंशापुढे गेलाच नाही. त्यामुळे सातारा ...

सातारा : जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात कमाल तापमान ४३ अंशापर्यंत पोहोचते. यंदा मात्र, पारा ४० अंशापुढे गेलाच नाही. त्यामुळे सातारा जिल्हावासीयांनी कडक उन्हाळा अनुभवलाच नाही. तसेच यावर्षी उकाड्याची तीव्रताही कमीच जाणवली.

सातारा जिल्ह्याचे दोन भाग प्रामुख्याने समजले जातात. पूर्व भाग दुष्काळी. या भागात माण, खटाव, फलटणसारखे तालुके, तर पश्चिम भाग समृध्द समजला जातो. पाण्याची उपलब्धता चांगली असते. दरवर्षी मार्च महिना उजाडताच जिल्ह्यात उन्हाळा सुरू होतो. हळू-हळू पारा वाढतो. त्यानंतर एप्रिल आणि मे महिन्यात कमाल तापमान अनेकवेळा ४० अंशावर जाते. कधी कधी तर ४३ अंशांचा टप्पाही पार होतो. यामध्ये सातारा शहरात आणि पूर्व भागातील तापमानात एक ते दोन अंशाचा फरक पडतो. पूर्व भागातील तापमान नेहमीच अधिक असते. असे असले तरी जिल्ह्यात यावर्षी तापमान कमीच राहिले. त्यामुळे कडक उन्हाळा पडलाच नाही.

जिल्ह्यात मार्च महिन्यापासून उन्हाळ्याची तीव्रता सुरू झाली. पण, तापमान कमीच राहिले. याला कारण म्हणजे यावर्षी उन्हाळ्यात वळवाचे अनेक पाऊस पडले. त्यातच सतत चार-पाच दिवस पाऊस होत होता. यामुळे ढगाळ वातावरण तसेच पावसामुळे पारा कमीच राहिला. आता तर पावसाळा तोंडावर आला आहे. वारे वाहत आहेत. यामुळे उन्हाळ्याची तीव्रता कमी होऊ लागली आहे. यापुढेही पारा ४० अंशाच्या पुढे जाईल, अशी स्थिती नाही. त्यामुळे सातारा जिल्हावासीयांना यंदा एकप्रकारे सुखद उन्हाळाच अनुभवास मिळाला, असेच म्हणावे लागेल.

चौकट :

पारा एकदाच ३९ अंशावर...

जिल्ह्यात मार्च महिन्यात कमाल तापमान वाढत होते. त्यावेळी अनेक दिवस ३६ अंशाच्या वर पारा होता. तसेच सातारा शहरात दि. २६ मार्चला ३८.०१ तापमान होते. त्यानंतर २८ मार्च रोजी ३८.०५, २९ मार्चला ३८.०९ आणि ५ एप्रिलला ३९.०२ तापमानाची नोंद झाली. ३९.०२ हेच या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान राहिले. मे महिन्यात तर बहुतांशी वेळा ३६ अंशाखालीच पारा राहिला. एक दिवस तर तापमान २६ अंशापर्यंत खाली आले होते. यामुळे यावर्षी कडक उन्हाळा जाणवलाच नाही.

.............................................................