शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
2
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
3
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
4
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
5
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
6
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
7
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
8
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
9
धक्कादायक! गणवेश परिधान करून न आल्याने शिक्षकाकडून विद्यार्थ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण
10
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
11
रिया चक्रवर्ती हाजिर हो... ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीला पोलिसांचे समन्स
12
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
13
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
14
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
15
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
16
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
17
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
18
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
19
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
20
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच

लोकइच्छेविरोधात शंभर फुटी रस्ता नाही

By admin | Published: December 26, 2014 11:24 PM

पृथ्वीराज चव्हाण : कऱ्हाडकरांना संघर्ष करावा लागणार नाही

कऱ्हाड : ‘शहरातील मार्केट यार्ड ते दत्त चौक दरम्यानचा प्रस्तावित शंभर फुटी रस्ता लोकइच्छेविरोधात होणार नाही. पालिकेने त्याच्या विरोधात ठराव केला असेल, तर ते चांगलेच आहे; परंतु कऱ्हाडकरांना त्याबाबत संघर्ष करावा लागणार नाही. त्यांना अपेक्षित असेल तेवढाच रस्ता रुंदीकरण होईल,’ असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. कऱ्हाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे बोलत होते. यावेळी आमदार आनंदराव पाटील, ‘एनएसयूआय’चे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘आघाडी सरकार राज्यात सत्तेत असताना मंजूर केलेल्या कामात चाळीस टक्के कपात करण्याचा निर्णय आताच्या नव्या सरकारने घेतला आहे. त्यामुळे ज्याच्या वर्क आॅर्डर निघाल्या नाहीत, त्या कामांना अडचणी येऊ शकतात; पण कऱ्हाडसाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा मी प्रयत्न केला होता आणि कऱ्हाड दक्षिण मतदारसंघाच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहेच.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासात्मक बोलतात. आंतरराष्ट्रीय दौरे करतात. ही बाब चांगलीच आहे; पण त्यांचेच सहकारी धर्माधर्मात तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये करतात, हे देशाला परवडणारे आहे का, याचा विचार करणे गरजेचे आहे. हिंदुत्ववाद हेच भाजपचे मूळ तत्त्वज्ञान असल्याने मुस्लीम आरक्षण मंजूर झालेले नाही,’ असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची मागणीच मुळात चुकीची आहे. उत्साहाच्या भरात फडणवीसांनी ती केली खरी; पण त्याला मोंदींची मान्यता असल्याचा संदेश त्यातून गेला. मात्र, पंतप्रधानांची त्याला मान्यता नसल्याने तो विषय आता संपला आहे. परंतु मुंबईला स्वतंत्र दर्जा देण्याबाबतच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या की काय, अशी भीती मात्र निर्माण झाली आहे, असेही यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.या पत्रकार परिषदेला विविध मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी) अशी फाईल माझ्याकडे आलीच नव्हती !अजित पवार व सुनील तटकरे यांच्या सिंचन घोटाळ्याची चौकशी नवे सरकार तरी करणार का? याबाबत छेडले असता चव्हाण म्हणाले, ‘हा त्यांचा निर्णय आहे; पण त्याबाबतची कोणतीही फाईल मी मुख्यमंत्री असताना माझ्याकडे आली नव्हती,’ असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.उत्तरे द्यायला पाच वर्षे वेळनिवडणुकीदरम्यान आणि त्यानंतरही स्थानिक विरोधक तुमच्यावर टीका व आरोप करीत सुटले आहेत, त्याला उत्तरे कधी देणार? असे छेडले असता, ‘घाई कशाला करता उत्तरे द्यायला आता पाच वर्षे वेळ आहे. योग्यवेळी योग्य उत्तरे देईन,’ असे मिश्किल उत्तर त्यांनी दिले.