शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

‘मातोश्री’त बसून गप्पा मारणाऱ्यांनी मोदींवर टीका करू नये, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 12:51 PM

मोदींच्या धोरणामुळेच साखर कारखाने जिवंत!

कऱ्हाड (जि. सातारा) : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारे कधी मातोश्रीपासून वरळीपर्यंत तरी गेले होते का? की कधी ते मंत्रालयात गेले? मातोश्रीत बसूनच ज्यांनी कारभार केला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करू नये,’ असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.येथील कल्याणी मैदानावर गुरुवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार प्रवीण दरेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, डॉ. अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला गेल्यावर काहींनी मणिपूर सांभाळता येत नाही, ते अमेरिकेला गेलेत, अशी टीका केली होती. मात्र, मणिपूर सांभाळायला गृहमंत्री अमित शाह सक्षम आहेत. मातोश्रीवर बसून गप्पा मारणाऱ्यांनी मणिपूरची काळजी करू नये. मोदींनी लस तयार केली, असे मी म्हणालो होतो. आणि मी त्याचे समर्थन करतोय. लसीचा कच्चा माल काही ठरावीक देशांमध्येच उपलब्ध होता. मात्र, मोदींच्या संबंधामुळे तो कच्चा माल भारताला मिळाला. त्यानंतरच शास्त्रज्ञांनी लस तयार केली. १४० कोटी लोकांना मोफत लस मोदींमुळेच मिळाली आहे.’

मोदींच्या धोरणामुळेच साखर कारखाने जिवंत!अडचणीत असलेल्या साखर कारखानदारीला वाचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे धोरण आखले आणि जे निर्णय घेतले, त्या धोरणांमुळेच आता साखर कारखाने आज जिवंत आहेत. साखर कारखानदारी, ऊस उत्पादक यामुळेच वाचली आहे. शेतकऱ्यांच्या विविध विकासासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. केंद्राप्रमाणेच राज्यातील सरकारही आता सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे