शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

पालखी सोहळा रद्द तरी दर्शनाची हुरहूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 4:24 AM

फलटण : फलटणकरांना आस लागलेला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा कोरोनामुळे यंदाही रद्द झाला आहे. सलग दुसऱ्या वर्षी ...

फलटण : फलटणकरांना आस लागलेला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा कोरोनामुळे यंदाही रद्द झाला आहे. सलग दुसऱ्या वर्षी फलटणकर पालखी सोहळ्याला मुकले असले तरी येथील भाविकांच्या मनात माऊलींच्या दर्शनाची हुरहूर मात्र कायम आहे.

ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या फलटणला महानुभाव आणि जैन समाजाची दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला येथे विशेष महत्त्व आहे. ज्येष्ठ महिन्यातील पेरण्या उरकल्यानंतर वारकऱ्यांना वेध लागतात विठुरायाच्या दर्शनाचे. विठुरायाच्या चरणावर माथा टेकवण्याची वाट हा वारकरी वर्षभर पाहत असतो. ध्यानी मनी विठ्ठल वसलेल्या वारकऱ्यांच्या वाटेत यंदा कोरोना उभा आहे. जगावर कोरोनाचं सावट आहे. आपला देश, आपला महाराष्ट्र या कोरोनाच्या सावटातून सुटला नाही. रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतेय. गर्दीमुळे अनेक सोहळे रद्द करण्यात आले. तसाच वारीचा पालखी सोहळाही रद्द करण्यात आला आहे.

पांडुरंगाच्या दर्शनाची लागलेली ओढ, ज्ञानोबा माऊली तुकाराम व विठुरायाचा जयघोष आणि टाळ-मृदुंगाच्या गजरात पंढरीकडे निघालेला लाखो वैष्णवांचा मेळा तिथीप्रमाणे सोमवारी ऐतिहासिक फलटण नगरीत मुक्कामासाठी येणार होता. यावेळी फलटणकरांनी भक्तिमय वातावरणात लाडक्या ज्ञानेश्वर माऊलींचे स्वागत करण्याचे ठरवले होते. मात्र, सर्वांचा भ्रमनिरास झाला आहे. यावर्षी माऊलींचे आगमन न झाल्याने फलटणची रामनगरी सुनीसुनी वाटत आहे. फलटण नगरीत दुसऱ्यांदा वैष्णवांचा महासागर नसणार आहे. पुढच्या वर्षी तरी कोरोनाचे सावट दूर होऊन सोहळा व्हावा, अशी मनोमन प्रार्थना भाविक करत आहेत.