शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
3
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
4
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
5
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
6
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
7
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
8
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
9
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
10
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
11
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
12
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
13
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
14
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
15
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
16
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
17
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
18
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
19
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
20
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?

खूनप्रकरणी तिघांना जन्मठेप

By admin | Published: March 02, 2017 11:34 PM

खूनप्रकरणी तिघांना जन्मठेप

सातारा : जमिनीच्या वादातून खंडू बबन चव्हाण (रा. पाडळी, ता. कोरेगाव) यांचा खून केल्याप्रकरणी येथील तिसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. ए. चव्हाण यांनी तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.नितीन जयसिंग फाळके, दिलीप संपत फाळके व दत्तू ऊर्फ अशोक श्रीरंग फाळके (सर्व रा. पाडळी, सातारारोड, ता. कोरेगाव) अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, फिर्यादी रणजित बबन चव्हाण (रा. पाडळी, ता. कोरेगाव) यांचे भाऊ खंडू चव्हाण यांचा वरील तिघांसोबत जमिनीच्या कारणावरून किरकोळ वाद झाला होता. याचा राग मनात धरून दि. ६ आॅगस्ट २०१४ रोजी तिघांनी संगनमत करून पाडळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर खंडू चव्हाण यांना जातीवाचक शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती. यात खंडू चव्हाण यांच्या पोटातील आतडी तुटल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन उपविभागीय पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने या तिघांना जन्मठेप तसेच प्रत्येकी तीन हजार रुपये दंड आणि मयताच्या कुटुंबीयांना १५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.सहायक सरकारी वकील मिलिंद ओक यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. त्यांना पोलिस प्रॉसिक्युशन स्कॉडचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश पवार, हवालदार अजित शिंदे, शमसुद्दीन शेख, नंदा झांझुर्णे, कांचन बेंद्रे, स्नेहल गुरव, राजेंद्र कुंभार यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)