शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
3
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
4
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
5
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
6
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
7
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
8
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
9
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
10
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
11
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
12
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
13
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
14
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
15
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
16
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
17
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
18
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
19
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
20
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 

आबांचा झंझावात; काँग्रेसला सुरुंग

By admin | Published: February 24, 2017 11:42 PM

भुर्इंज गट : भाजपाच्या मतविभागणीने राष्ट्रवादी सुसाट; उमेदवारीपासून निकालापर्यंतचे ‘लोकमत’चे अचूक अंदाज

महेंद्र गायकवाड ल्ल पाचवडभुर्इंज गटातील विजयी उमेदवारीची माळ अखेर राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश चव्हाण यांच्या गळ्यात पडली अन् मकरंद आबांच्या करिष्म्याने मागील निवडणुकीत काँग्रेसच्या ताब्यात गेलेला भुर्इंज गट पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या ताब्यात आला. काँग्रेस व राष्ट्रवादीची उमेदवारी गुलदस्त्यात राहिलेल्या या गटाची कमान आमदार मकरंद आबांनी अखेरच्या क्षणी चिंधवलीचा क्रिकेटर व सर्व प्रकारच्या पीचवर विजय मिळवणाऱ्या शिलेदाराकडे दिली अन् नंतर चिंधवलीच्या ज्येष्ठ फळीने व तरुण कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जो धुरळा उडवला त्याचा अखेर गुलाल अंगावर घेऊनच झाला. दरम्यान, काँग्रेसच्या गटातील उमेदवारीचा शेवटपर्यंत न मिटलेला घोळ, पक्षातील कार्यकर्त्यांच्या अंतर्गत गटबाजीचा फटका व भुर्इंज गट व गणात भाजपाच्या उमेदवारांकडून झालेली मतविभागणी काँग्रेसच्या उमेदवारांना मतपेटीतून उमजली असून, या सर्व बाबींवर मोठे मंथन करण्याची वेळ येथील काँग्रेस नेतृत्वावर आज आलेली आहे. ‘लोकमत’ने निवडणुकीपासूनच भुर्इंज गटाचे व भुर्इंज आणि पाचवड गणाचे अचूक वार्तांकन वाचकांसमोर मांडले. ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेली संभाव्य उमेदवारांची वर्णी त्या-त्या पक्षाकडून झाली आणि प्रथमच भुर्इंज गटात मोठ्या ताकदीने उतरलेला भाजपाचा उमेदवार गटातील काँग्रेस व राष्ट्रवादीचा विजयी उमेदवार ठरवणार हा अंदाजही अचूक ठरला. भाजपाकडून लढणारे शशिकांत दगडे यांनी भुर्इंजमधील काँग्रेसचे हक्काचे मतदान हिसकावून घेतल्याने काँग्रेसकडून करण्यात आलेली मतांची गोळाबेरीज पूर्णपणे फोल ठरली. काँग्रेसच्या प्रकाश धुरगुडे यांनी या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांसह स्वत:ला झोकून दिले होते. मात्र, संपूर्ण गटाची भिंगरी करणाऱ्या प्रकाश धुरगुडे यांना अंतिम क्षणी महत्त्वाचे गड आपल्या ताब्यात राखता न आल्याने काँग्रेसच्या हक्काच्या व निर्णायक मतांना सुरुंग लागला अन् गटातील निकालाचे चित्रच बदलून गेले. भुर्इंज गटाबरोबरच वाई तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या भुर्इंज गणामधील जबरदस्त लढतीत रजनी भोसले-पाटील यांच्यासाठी सुधीर भोसले-पाटील यांनी युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना एकत्र करून गड सर केला. त्यामुळे भुर्इंज गणातही अखेर राष्ट्रवादीने बाजी मारली. चिंधवलीने दाखवले एकीचे बळ भुर्इंज गटातील यावेळच्या निवडणुकीत चिंधवली गावाने राजकारणात सुद्धा एकी होऊ शकते हे दाखवून दिले. ऐनवेळी चिंधवलीतील काही नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला असतानाही आपल्या गावचा उमेदवार जिल्हा परिषदेत जाणार म्हणून लहान-थोरापासून सर्वचजण आपापसातील गट-तट, हेवे-दावे विसरून एकत्र आले. ‘एकीचे बळ मिळते फळ’ या उक्तीला साजेशे काम यावेळी चिंधवलीकरांकडून झाले आहे. यावेळी झालेली एकी लवकरच होणाऱ्या चिंधवली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपर्यंत राहिली तर ग्रामपंचायतही राष्ट्रवादीकडे म्हणजेच आमदार मकरंद आबांच्या विचारांची झाल्यास नवल वाटणार नाही.