शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
2
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
3
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
4
Zerodha नं गुंतवणूकदारांना दिली आनंदाची बातमी, ब्रोकरेज चार्जवर केली मोठी घोषणा
5
“गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला १५०० रुपये मिळाले असते का?”: शहाजीबापू पाटील
6
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? काही क्षणात तुम्हाला करतात कंगाल!
7
महाराष्ट्रातून धावणारी वंदे भारत बंद होणार? ८० टक्के जाते रिकामी, अलीकडेच झाली होती सुरु
8
दुधाचा चहा ठरू शकतो 'या' जीवघेण्या आजारांसाठी कारणीभूत?; ICMR चा धक्कादायक रिपोर्ट
9
धक्कादायक! शाळेच्या बसने अचानक घेतला पेट; 25 विद्यार्थी-शिक्षकांचा होरपळून मृत्यू
10
"द्वेषाच्या राजकारणाला बळी पडल्यामुळं माझ्या पत्नीनं जमीन परत करण्याचा निर्णय घेतला", मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा दावा 
11
Loan घेण्यासाठी महत्त्वाचा असतो CIBIL Score आणि Credit Score; तुम्हाला दोघांतला फरक माहितीये का?
12
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित MUDA घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू, लोकायुक्त पथक वादग्रस्त जमिनीवर पोहोचले
13
मूर्ती लहान पण कीर्ती महान! यशस्वीनं मोडला ५० वर्षांहून अधिक काळ अबाधित असणारा गावसकरांचा विक्रम
14
शिंदेंच्या जिल्हाप्रमुखांवर झाडल्या गोळ्या, पोलीस आले म्हणून वाचला जीव; काय घडला थरार?
15
'मंदिर असो वा दर्गा, बेकायदेशीर बांधकाम पाडणार', सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका
16
"दिघेंच्या शेवटच्या क्षणी शिंदे, शिरसाट तिथे होते..."; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा
17
"सिडकोच्या धरणात महायुतीचा १४०० कोटींचा घोटाळा; 'मेघा इंजिनिअरिंग' महालाभार्थी"; काँग्रेसचा आरोप
18
आत्मसंरक्षणासाठी बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रिटीकडे आहे शस्त्र परवाना, बाळगतात बंदूक
19
PKL 2024 : संघानं खूप 'भाव' दिला, आता करुन दाखवायचंय; यू मुंबाचा कर्णधार म्हणतो 'है तय्यार हम'
20
बापरे! ५८ किलो चांदी घेऊन नोकर फरार, मालकाला कल्पनाच नाही; पोलिसांनी केला पर्दाफाश

विनाअनुदानित शिक्षकांवर उपासमारीची वेळ

By admin | Published: December 07, 2015 10:17 PM

अच्छे दिन केव्हा? : शाळांचे मूल्यांकन होऊनही शासनाकडे फाईली धूळखात

सातारा : राज्यातील विनाअनुदान शाळा व तुकड्या अनुदानावर आणण्यासाठी त्यांचे मूल्यांकन होऊन दोन वर्षे झाली, तरी अद्याप याद्या जाहीर झालेल्या नाहीत. या फायलींवर हेही सरकार सह्या करत नसल्यामळे अशा शाळांमध्ये वर्षानुवर्षे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. फायलींवर सह्या करताना मागच्या मुख्यमंत्र्यांचा हात थरथरतो असा हल्ला वारंवार चढवणारेच ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्तेत आले, तेव्हा या शिक्षकांना ‘अच्छे दिन’ची भुरळ पडली होती. पण ते अच्छे दिन आपल्या जीवनात येणार तरी केव्हा असा प्रश्न त्यांना सतावतो आहे.शिक्षणामुळे समाज सुधारतो, सुसंस्कृत होतो. त्याला घडवण्याचे काम शिक्षक करतात. त्यामुळे समाजात शिक्षकांप्रती आदराची भावना असते. शासनाच्या उदासिनतेमुळे अशा शिक्षकांचीच प्रचंड कुचंबना गेल्या काही वर्षांत झाली आहे. जनतेला शिक्षणाच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, मराठी माणूस शिकून मोठा झाला पाहिजे. त्यासाठी शासनाची भूमिका सकारात्मक असली पाहिजे, अशी अपेक्षा आहे. परंतु या मुलभूत गोष्टीकडे शासन गांभीर्याने पाहताना दिसत नाही. विनामोबदला वर्षानुवर्षे शिक्षकांना काम करावे लागणे हा त्याचाच परिपाक आहे. आज असे असंख्य शिक्षक घर चालवण्यासाठी अन्य छोटी मोठी कामे करत आहेत. कुटुंबाची उपजीविका, वाढत्या मुलांचे शिक्षण, त्यांच्या गरजा, कपडेलत्ते, घरातील वडिलधाऱ्यांचे औषधपाणी असा खर्चाचा भार पेलताना त्यांचा जीव मेटाकुटीला येत आहे. त्यात वाढत्या महागाईने तर त्यांचे जगणे मुश्किल होऊन बसले आहे. आज ना उद्या अनुदान मिळेल व संसाराची गाडी रूळावर येईल, या आशेवर किती दिवस रेटायचे या काळजीने त्यांची झोप हराम झाली आहे. आयुष्यातील उमेदीची दहा-पंधरा वर्षे अशा प्रकारे खर्ची घालुनही सरकारला पाझर फुटत नसल्याबद्दल ते संताप व्यक्त करत आहेत.शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या म्हणजेच १४ वर्षे वयापर्यंतच्या बालकांना सक्तीचे व मोफत शिक्षण मिळालेच पाहिजे, असा आग्रह आहे. या कायद्यानुसार पहिली ते आठवीपर्यंतचा एकही वर्ग विनाअनुदान ठेवता येणार नाही, असे स्पष्ट केले गेले होते. तथापि, अनुदान नसलेल्या असंख्य शाळांमध्ये शिक्षकांचे पगार भागवण्यासाठी विद्यार्थ्यांकडून फी वसूल केली जाते. हे या कायद्याचे उल्लंघन नाही काय याचे भान सरकारला नाही, असाही सवाल विचारला जात आहे. (प्रतिनिधी)आज विधानभवनावर मोर्चाविनाअनुदान शाळा व तुकड्या अनुदानावर आणण्यासाठी त्यांचे मूल्यांकन होऊन दोन वर्षे झाली, तरी अद्याप याद्या जाहीर झालेल्या नाहीत. याद्या तयार असूनदेखील सरकार काहीच करत नसल्याने शैक्षणिक क्षेत्रात कमालीचा असंतोष आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यासंदर्भात कृती करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु अंमलबजावणी नाही. त्यामुळे या प्रमुख मागणीसह शिक्षण क्षेत्राशी संबंधित अन्य कळीच्या प्रश्नांसाठी आता नागपूरला हिवाळी अधिवेशनावेळी लाँग मार्च काढण्याचा व विधानभवनावर प्रचंड मोर्चा काढण्याचा पवित्रा शिक्षक संघटनांनी घेतला आहे. त्या आंदोलनात शिक्षकांच्या प्रश्नांसाठी झटणाऱ्या राज्यातील तमाम शिक्षक संघटनाही सहभागी होणार आहेत.