शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

गुन्हेगारी संपविण्यासाठी एकत्र या...

By admin | Published: December 17, 2015 10:22 PM

फलटण शहर : नागरिकांच्या अपेक्षा; ‘लोकमत’च्या धाडसी भूमिकेचे स्वागत

फलटण : फलटण तालुक्यातील वाढती गुन्हेगारी, दहशत याविरोधात ‘लोकमत’ने उचललेल्या धाडसी भूमिकेचे स्वागत होत असतानाच गुन्हेगारी संपविण्यासाठी पोलिसांबरोबरच विविध घटकांनीही एकत्र येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. वारंवार होणारा बंद व दवाखाने, बसेसची मोडतोड थांबवण्याची गरज व्यक्त होत आहे. फलटण तालुक्यात वाढत्या चोऱ्या, गुंडगिरी, दहशत, वारंवार बंद याला जनता कंटाळली आहे. पोलिसांकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त होत असताना त्या पूर्ण होताना दिसत नाहीत. त्यामुळे जनतेमध्ये अस्वस्थता आहे. राजकीय नेतेमंडळी स्वार्थासाठी काही गुंडाना हाताशी धरताना राजकारण करीत असल्याचे प्रकार आढळून येत आहेत. यालाही आळा घालण्याची गरज व्यक्त होत आहे. काही समाजकंटकांनी फलटणमधील हॉटेल, एटीएम, दवाखाने, दुकाने बसेस यांची मोडतोड केल्याने हे प्रकार थांबविण्याची गरज आहे.तालुक्यात किंवा तालुक्याबाहेर एखादी घटना घडली की त्याचे पडसाद तालुक्यात सर्वत्र उमटतात. वारंवार फलटण शहर बंद ठेवले जाते. याला व्यापारी, लहानमोठे विक्रेते वैतागले आहेत. बंद पाळतानाही दहशत निर्माण केली जात असल्याने याला कोठेतरी आळा बसण्याची अपेक्षा जनता करीत आहे. सध्या फलटण शहरात रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून मोठ्या प्रमाणात विक्रेते आले आहेत. मागील चार, पाच वर्षांपासून रामरथोत्सवाचा बाजार वारंवारचा बंद व दहशत यामुळे कमी कमी होत चालला आहे. पूर्वी महिना-महिना थांबणारे व मोठ्या संख्येने येणारे विक्रेते फलटणला खूपच कमी प्रमाणात येत आहेत. हातावर पोट असलेल्या या विक्रेत्यांनाहीदोन दिवसांपूर्वीच्या बंदचा व तोडफोडीचा फटका बसल्याने काहींनी आपला गाशा गुंडाळा आहे. पुढच्यावर्षी रथोत्सवाला अशा वातावरणात किती विक्रेते येतील याची आता चिंता व्यक्त होऊ लागली आहे. फलटणची दहशत, वारंवारचे बंद, एकटे पोलीस संपवू शकत नाहीत. त्यासाठी राजकीय नेतेमंडळी, सर्व समाजातील व्यक्तिंनी एकत्र येऊन प्रतिकार करण्याची गरज आहे. फलटण बंद राहणार नाही याची काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या तोडफोडीबाबत अनेकांनी गुन्हे दाखल करण्यात असमर्थता व्यक्त केली. या मागची कारणे वेगवेगळी असली तरी गुन्हे दाखल करण्याची मानसिकता दिसून येत नाही. (प्रतिनिधी)दहशतीला कोणी थारा देऊ नयेफलटण तालुक्यात वाढत चाललेल्या दहशतीला, गुंडगिरीला कोणी थारा देऊ नये. या पार्श्वभूमीवर राजकीय कार्यकर्ते, पोलीस, पत्रकार, समाजातील सर्व घटकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. काही मुठभर लोक वैयक्तिक कारणासाठी सातत्याने फलटण बंद करीत आहेत. त्याला आमचा विरोध आहे. फलटण यापुढे बंद होऊ नये, असे आवाहन रघूनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.