शहरं
Join us  
Trending Stories
1
Agniveer: "शहीदाच्या कुटुंबाला पैसे मिळत नाहीत"! राहुल गांधींच्या दाव्यावर काय म्हणाले अग्निवीर अक्षय गवते यांचे वडील?
2
'पंतप्रधान नरेद्र मोदी यांना अयोध्येतून निवडणूक लढवायची होती, पण...'; राहुल गांधींचा लोकसभेत मोठा गौप्यस्फोट?
3
VIDEO : राहुल गांधी यांनी भगवान शिव शंकरांचा फोटो दाखवताच कॅमेरा फिरला! काँग्रेस म्हणाली, बघा 'जादू'!
4
UPSC प्रीलिम्स 2024 परीक्षेचा निकाल जाहीर; मेन्सची तारीख पाहा...
5
पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
मेधा पाटकरांना 5 महिने कारावास अन् 10 लाखांचा दंड, 23 वर्षे जुन्या प्रकरणात शिक्षा
7
विधानपरिषदेत शिवीगाळ! अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात हमरीतुमरी; माझ्यावर बोट केलं, तर....
8
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी 
9
पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी; मनोज जरांगेंची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...
10
'सिंचन घोटाळ्यातील आरोपी भाजपसोबत', AAP खासदाराच्या टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
11
राजस्थानमध्ये भीषण अपघात! बोलेरो-ट्रकची धडक; ९ जणांचा मृत्यू
12
“गर्व है कि हम हिंदू हैं!”; राहुल गांधी यांच्या विधानावरुन योगी आदित्यनाथ यांचे प्रत्युत्तर
13
“उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला, २ वर्षांत FDIमध्ये अव्वल”: उदय सामंत 
14
"मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या ६३ खासदारांना जनतेने कायमस्वरुपी बसवलं", महुआ मोईत्रांचा हल्लाबोल
15
"माझा भाऊ कधीच हिंदूंचा अपमान करू शकत नाही’’, राहुल गांधींच्या बचावासाठी प्रियंका गांधी सरसावल्या  
16
'लिहून देतो, तुमचा गुजरातमध्ये पराभव करणार...', लोकसभेतून राहुल गांधींचे BJP ला थेट आव्हान
17
“खऱ्या अर्थाने वंचित, दलितांना न्याय देण्याचे काम भाजपा करते”; अमित गोरखेंची प्रतिक्रिया
18
Maharashtra Vidhan Parishad Election 2024 विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवार जाहीर, पंकजा मुंडेंसह या पाच जणांना संधी
19
शेकडो कर्मचाऱ्यांसाठी रतन टाटा बनले संकटमोचक; नोकरीवरुन काढण्याची नोटीस घेतली मागे
20
आफ्रिकन 'सफाई'!! टीम इंडियाच्या पोरींची कमाल, वनडे पाठोपाठ कसोटी मालिकाही जिंकली!

आघाडीत साथ; सत्तेत द्या ‘हात’ काँग्रेस रोखठोक : राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 11:11 PM

राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असली तरी जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादीने कधीच ही भूमिका बजावली नाही. त्यामुळे काँग्रेसला गेल्या १७ वर्षांत जिल्हा परिषदेतील सत्तेत वाटा मिळाला नाही.

ठळक मुद्दे१७ वर्षांपासून झेडपीतील सत्तेपासून दूर

नितीन काळेल ।सातारा : राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असली तरी जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादीने कधीच ही भूमिका बजावली नाही. त्यामुळे काँग्रेसला गेल्या १७ वर्षांत जिल्हा परिषदेतील सत्तेत वाटा मिळाला नाही. आता पुन्हा एकदा काँग्रेसकडून जिल्हा परिषदेतील सत्तेत सन्मान द्या, अशी भाषा सुरू झाली आहे. त्यामुळे काँग्रेसची ही आक्रमक भूमिका येणाऱ्या काळात राष्ट्रवादीसाठी नक्कीच डोकेदुखी ठरू शकते.ग्रामीण भागाचा कणा म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते.

याच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेकांनी सदस्य होत विधानसभेची पायरीही चढली आहे. त्यामुळे नवे नेतृत्व घडविणारी कार्यशाळा म्हणूनही जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते. अशाचप्रकारे सातारा जिल्हा परिषदेनेही काही आमदारांना घडविले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने विधानसभाही दणाणून सोडली. याच जिल्हा परिषदेत गेल्या १७ वर्षांपासून सत्तेचा लंबक हा राष्ट्रवादीच्या बाजूनेच राहिला. त्या तुलनेत विरोधी पक्ष असणारे शिवसेना आणि भाजप हे दूरच राहिले. असे असलेतरी राज्यात आघाडीत असणाऱ्या काँग्रेसलाही राष्ट्रवादीने कधीच स्थान दिले नाही. सतत मागच्या बाकावर बसविण्याचा विडाच राष्ट्रवादीने उचलला. तर वारंवार सत्तेत वाटा देण्याची मागणी करूनही राष्ट्रवादीने काँग्रेसला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्यामुळे १७ वर्षांत काँग्रेसचा एकही सदस्य सभापतिपदापर्यंतही गेला नाही; पण आता काँग्रेसने पुन्हा जिल्हा परिषदेतील सत्तेत सन्मानाने वाटा देण्याची भाषा सुरू केली आहे.

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दीड महिन्यापूर्वी घेतली. तेव्हापासून काँग्रेसने आक्रमक रूप धारण केले आहे. साताºयात काँग्रेस कमिटीत झालेल्या पहिल्याच मेळाव्यात आमदार जयकुमार गोरे यांनी विधानसभेला जिल्ह्यातील चार जागा मिळविण्याची भाषा सुरू केली. तर आता जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे जिल्ह्यात बैठका घेत आहेत. या बैठकांमधून काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते जिल्हा परिषदेतील सत्तेत वाटा घ्या, अशी भाषा करू लागले आहेत. त्यामुळे निंबाळकर यांनीही सत्तेत वाटा मिळवायचा, असा निर्धार केला आहे.ताणून धरणार की गळ्यात गळे...सत्तेत तुम्हीच राहायचे, आघाडी धर्म आम्ही पाळायचा, हे आता चालणार नाही. त्यासाठी आता जिल्हा परिषदेतही आम्ही वाटा मागतो. नाहीतर येणाºया निवडणुकीत पक्षाची भूमिका वेगळी असेल, असे सांगण्यासही काँग्रेसचे पदाधिकारी कचरत नाहीत. त्यामुळे काँग्रेसच्या या आक्रमकतेपुढे राष्ट्रवादी किती ताणून धरणार का गळ्यात गळे घालणार, हे येणारा काळच ठरविणार आहे.गायत्रीदेवी राष्ट्रवादीच्या पहिल्या अध्यक्षा...गेल्या १७ वर्षांत जिल्हा परिषदेचे ८ अध्यक्ष झाले. हे सर्व राष्ट्रवादीचे होते. नारायणराव पवार हे काँग्रेसचे शेवटचे अध्यक्ष ठरले. पवार यांच्यानंतर गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी या अध्यक्षा झाल्या. तर आता संजीवराजे नाईक-निंबाळकर हे अध्यक्ष आहेत. 

राज्यात, देशात आघाडी चालते; पण साताºयात नाही. वरिष्ठांनी कधीतरी याकडे लक्ष द्यावे. कारण, गेल्या १७ वर्षांत काँग्रेस जिल्हा परिषदेत सत्तेत नाही. आघाडी धर्मासाठी राष्ट्रवादीने सन्मानाने सभापतीचे एक पद तरी द्यावे.- भीमराव पाटील, सदस्य जिल्हा परिषदकाँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे; पण सातारा जिल्ह्यात आघाडी धर्म कोठे आहे.? प्रत्येकवेळी आम्हीच पालखीचे भोई व्हायचे, हे बंद झाले पाहिजे. त्यासाठी आता विधानसभेला जिल्ह्यातील चार जागा आणि जिल्हा परिषदेतील सत्तेत वाटा द्या, हीच आमची भूमिका राहणार आहे.- रणजितसिंह नाईक-निंबाळकर, जिल्हाध्यक्ष काँग्रेस

टॅग्स :zpजिल्हा परिषदSatara areaसातारा परिसर