शहरं
Join us  
Trending Stories
1
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
2
"राज्याचं मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे..."; ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक लावण्याची खेळी?
3
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; राहुल गांधींना कोर्टाने काढले समन्स
4
“रोहित पवार मुख्यमंत्री झाले अन् शरद पवार...”; सुप्रिया सुळे यांनी केलेले विधान चर्चेत
5
घरी जेवला, कॉलवर बोलला, ऑर्डर देण्यासाठी गेला पण...; डिलिव्हरी बॉयसोबत 'त्या' दिवशी काय घडलं?
6
ऑलिम्पिक, पॅरालिम्पिकपटूंचा अंबानी कुटुंबीयांकडून गौरव; अँटिलियावर शाही सोहळा, PHOTOS
7
"भाषण बंद करेन अन् निघून जाईन", अजित पवारांचा चढला पारा, माजलगावात काय घडले?
8
काय सांगता!'या' कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न फक्त २ रुपये, तहसीलदारांनीच दिला दाखला
9
PC Jewellers Share Price : वर्षभरात ६००% नी वाढला 'हा' Multibagger; आता १० भागांमध्ये स्प्लिट होणार, शेअरमध्ये तुफान तेजी
10
मनसेची मागणी, CM शिंदेंनी घेतली दखल;  'नायर' रुग्णालय लैंगिक छळप्रकरणी तातडीचे आदेश
11
शोरूमचे कुलूप तोडले, दुचाकीसह ५० हजार रुपये लुटले; जाता-जाता शटरवर लिहिले, 'जीत चोर की' 
12
"शरद पवारांना हलक्यात घेणं म्हणजे आत्मघात", सुनील तटकरे विधानसभा निवडणुकीबद्दल काय बोलले?
13
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
14
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
15
'छोटा पॅकेट बडा धमाका', फक्त ९१ रुपयांत ९० दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा BSNLचा नवा प्लॅन
16
लेबनॉनमध्ये भारतीय अडकले? इस्त्रायलच्या कारवाईनंतर चिंता वाढली, पंतप्रधान मोदींनी नेतन्याहूंना केला फोन
17
आमदाराला आला हार्ट अटॅक, सुरक्षा अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवला जीव; नेमकं काय घडलं?
18
ग्रहांची वक्रदृष्टी, प्रतिकूल प्रभाव आहे? ‘हे’ स्तोत्र अवश्य म्हणा; नवग्रहांचा शुभ-लाभ मिळवा
19
IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट
20
अभिनेत्यांना रात्री भेटण्यासाठी नकार दिल्यामुळे या अभिनेत्रीला काम मिळणं झालं बंद, बॉलिवूडमधून झाली होती गायब

आदर्की परिसरात दराअभावी टोमॅटो बागेतच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 4:26 AM

आदर्की : कोरोना महामारी, लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने टोमॅटो पिकाला कवडीमोल दरामुळे आदर्की परिसरातील शेतकऱ्याचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले ...

आदर्की : कोरोना महामारी, लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने टोमॅटो पिकाला कवडीमोल दरामुळे आदर्की परिसरातील शेतकऱ्याचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले आहे. आदर्की परिसरातील टोमॅटोच्या बागा झाल्या लालेलाल. मात्र, शेतकरी कंगाल झाल्याने शासनाने भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

फलटण तालुक्याच्या पश्चिम भागातील आदर्की परिसरात वीस वर्षांपासून टोमॅटो रोपांची लागवड करत आहेत, परंतु आठ वर्षांपूर्वी धोम-बलकवडी उजव्या कालव्यातून आदर्की परिसरात पाणी आल्याने बागायती शेत्रात वाढ झाली. त्या प्रमाणात टोमॅटो लागवड क्षेत्रात वाढ झाली, पण गुढीपाडव्याला लागण केलेल्या टोमॅटोला चांगला भाव मिळत होता. गतवर्षी कडक लॉकडाऊन असूनही भाव बऱ्यापैकी मिळाल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागला नाही.

लॉकडाऊनमुळे नोकरी गमावलेले चाकरमानी व शेतकऱ्यांनी मार्च महिन्यात टोमॅटोसाठी नांगरणी करून शेणखते टाकली व सरी काढून टोमॅटोची लागवड केली. या वर्षी पाणी उपलब्ध असल्याने आदर्की खुर्द, आदर्की बुद्रुक, आळजापूर, कापशी, हिंगणगाव आदी गावांत वीस ते पंचवीस लाख रोपांची लागवड केली. त्यावेळी रोपवाटिकेतून एक ते दीड रुपयाला रोप शेतकऱ्यांनी विकत घेऊन लागवड केली. त्यानंतर, सेंद्रिय व रासायनिक खते टाकून रोपांना भर लावणे, रोपांना आधार देण्यासाठी काठी, तारा, सुतळ्यांचा वापर करावा लागतो.

या वर्षी वातावरणातील बदलामुळे विविध औषधांवर जादा खर्च झाला. यासाठी चाळीस गुठ्यांसाठी एक ते दीड लाख रुपये खर्च झाला, पण लॉकडाऊनमुळे विवाह सोहळे, राजकीय मेळावे, पालखी सोहळे व बाजारपेठा बंद राहिल्याने टोमॅटोचा प्रति किलो दोन ते सात रुपये दर राहिल्याने, शेतकऱ्याच्या हातात खर्च वजा जाता काही न मिळाल्याने शेतकऱ्यांनी तोडणी बंद केली. टोमॅटोच्या बागा लालेलाल दिसत आहेत, तर हातात काही न मिळत असल्याने शेतकरी कंगाल झाल्याने टॉमेटो पिकांचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे.

(चौकट)

४० गुंठ्यासाठी सव्वा लाख खर्च...

टोमॅटो पिकासाठी खर्च एक रोप १ रुपया ३० पैसे, तार १४० रुपये किलो, सुतळी १३० रुपये किलो, काठी ७ ते १२ रुपये एक नग, मशागत, खते, औषधे मिळून ४० गुंठ्यासाठी एक ते सव्वा लाख खर्च येत असतो.

(कोट...)

आदर्की परिसरात टोमॅटोची लागवड दराच्या आशेवर केल्यास हमखास दर मिळत असल्याने कष्टाचे चीज होत होते, परंतु गेल्या वर्षापासून शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. कोरोनामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकासाठी लाखो रुपये खर्च करूनही दर मिळत नाही, तरी शासनाने पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी.

- उदय निंबाळकर, शेतकरी, आदर्की खुर्द.

10आदर्की

फोटो - आदर्की परिसरात दराअभावी शेतकरी टोमॅटो फेकून देत आहेत. (छाया: सूर्यकांत निंबाळकर)