शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

सातारा जिल्ह्यातील अडीच हजार कृषी दुकाने बंद; ७० कोटींची खरेदी-विक्री थांबली

By नितीन काळेल | Published: November 04, 2023 7:10 PM

पेरणीतच शेतकऱ्यांना त्रास 

सातारा : खते, बियाणे आणि कीटकनाशके विक्रेत्यांविरोधात कडक कारवाई करण्यासाठी शासनाकडून नवीन कायदे आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कायद्यातील तरतुदीविरोधात तसेच फेरविचार करण्यासाठी राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी तीन दिवसांचा बंद केला आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील अडीच हजार दुकाने बंद असल्याने पेरणीतच शेतकऱ्यांना त्रास झाला. तर ७० ते ८० कोटींची खरेदी-विक्रीही थांबली.जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामाची पेरणी सुरू झाली आहे. जिल्ह्यात दोन लाख हेक्टरवर क्षेत्र असून शेतकरी खते आणि बियाणे खरेदी करु लागले आहेत. यामध्येच कृषी निविष्ठा दुकानदारांनी तीन दिवसांचा बंद केला. शनिवारी याला तीन दिवस झाले. तर कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी राज्य शासनाने नवीन काही कायदे प्रस्तावित केले आहेत. हे कायदे जाचक असल्याचे सांगून त्याला विरोध केलेला आहे. यामध्ये कृषी दुकानदार हे निविष्ठांचे उत्पादन करत नाहीत. कृषी विभागाच्या मान्यतेनेच सीलबंद निविष्ठा खरेदी करुन ती शेतकऱ्यांनी विकली जाते.त्यामुळे पॅकिंगमधील निविष्ठांच्या दर्जाबाबत कृषी विक्रेत्यांना दोषी समजण्यात येऊ नये असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर नवीन जाचक कायदे हे विक्रेत्यांवर लादू नयेत, प्रस्तावित कायद्याचा फेरविचारही करावा, अशी मागणीही या विक्रेत्यांची आहे. यासाठी राज्य संघटनेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांकडे कायदे रद्द करण्याची मागणीही केली आहे. यासाठी राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी तीन दिवसांचा बंद केला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील विक्रेते सहभागी झाले आहेत.

जिल्ह्यात आज सुमारे अडीच हजार कृषी निविष्ठा विक्रीधारक आहेत. गुरुवारपासून त्यांनी दुकाने बंद ठेवली आहेत. यामुळे याचा शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे. कारण, सध्या रब्बी हंगामाची पेरणी सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांना खते आणि बियाणे लागत आहेत. एेन पेरणी हंगामाच्या सुरुवातीलच कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी दुकाने बंद केल्याने शेतकऱ्यांना खरेदीच करता येत नाही. यामुळे पेरणीवर परिणाम झालेला आहे. तसेच फळबागांवर फवारणीसाठीही रासायनिक आैषधे मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची तडफड वाढली आहे. त्यातच तीन दिवसांच्या बंदनंतर रविवारपासून दुकाने सुरू होण्याचे संकेत आहे. याबाबत शनिवारी रात्री उशिरा राज्य संघटनेची बैठक होणार आहे. त्यामध्ये दुकाने उघडायची की नाही हे ठरणार आहे.जिल्ह्यातील कृषी निविष्ठा दुकाने तीन दिवस बंद असल्याने जवळपास ७० ते ८० कोटी रुपयांची खते, आैषधे आणि बियाणे खरेदी-विक्री थांबल्याचे सांगण्यात येत आहे. यातून शासनाला जाणारा जीएसटीही थांबला आहे. तर हा बंद वाढला तर शेतकऱ्यांना फटका अधिक बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAgriculture Sectorशेती क्षेत्र