शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

झाड मारल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल; ॲसिड प्रयोग केल्याची घटना

By प्रगती पाटील | Updated: March 26, 2024 21:12 IST

पालिकेची सर्तकता : हरित साताराच्या लढ्याला यश : झाडांना इजा पोहोचविणाऱ्यांवर कारवाइचा बडगा

सातारा : शहर व परिसरात सार्वजनिक ठिकाणी असलेल्या झाडांच्या जीवावर उठणाऱ्या प्रवृत्तीला आळा बसविण्यासाठी सातारा पालिका आक्रमक झाली आहे. पालिकेच्यावतीने सायन्स काॅलेजसमोर झाडावर अॅसिड प्रयोग करणाऱ्या विरोधात आणि देवी काॅलनीत परवानगी शिवाय झाड तोडणाऱ्या तिघांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स महाविद्यालयासमोर अज्ञाताने झाडावर अॅसिड प्रयोग केल्याची घटना समोर आली. ही बाब हरित सातारा या पर्यावरणीय ग्रुपच्यावतीने पालिकेला सांगण्यात आली. १८ मार्च रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याचा पंचनामा करण्यात आला.  कोणत्याही परवानगीशिवाय वृक्ष नष्ट केल्याचा गुन्हा अज्ञातावर दाखल करण्यात आला आहे. याबरोबरच सदरबझार येथील देवी काॅलनीत ८ जानेवारी रोजी सायंकाळी रस्त्याच्या कडेला असलेल्या चाफ्याचे सुमारे सात फुट वाढलेले झाड, त्याच्या शेजारी असणारा बहावा आणि सप्तपर्णीचे झाड कोणत्याही परवानगीशिवाय नष्ट केल्याचा ठपका ठेऊन देवी काॅलनीतील अमर लक्ष्मण जाधव आणि दिग्विजय अमर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पालिका वृक्ष विभाग प्रमुख सुधीर चव्हाण यांनी दिली. 

१. पालिकेच्या धडक कारवाइचे पर्यावरण प्रेमींकडून काैतुक

सार्वजनिक जागेवर असलेल्या वृक्षांची होणारी कत्तल साताऱ्यात गंभीर रूप धारण करत आहे. शहरात दोन आठवड्यात तब्बल चार घटना उघडकीस आल्याने पालिकाही अॅक्शन मोडवर आली. जागेचा पंचनामा करून योग्य त्या कार्यवाहीसाठी प्रस्ताव मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याकडे सादर केल्यानंतर त्यावर तातडीने कारवाइ करण्याचे आदेश त्यांनी दिले. वृक्ष विभाग प्रमुख सुधीर चव्हाण यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेत गुन्हा दाखल करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. झाड मारल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करून पर्यावरण रक्षणासाठी पालिकेने घेतलेल्या भूमिकेचे विविध स्तरांतून काैतुक होत आहे.

पर्यावरणीय दृष्ट्या वृक्ष लागवड आणि संवर्धन या दोन्ही गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी वृक्षांची अडचण वाटून त्यांना संपविण्याची वृत्ती साताऱ्यात वाढत आहे. यावर आळा बसविण्यासाठी हरित सातारा जागल्याची भूमिका बजावत आहे. त्याला प्रशासनाचे बळ मिळाल्याने झाडांची कत्तल होणे निश्चितच थांबेल असा विश्वास आहे.- कन्हैय्यालाल राजपुरोहित, हरित सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी