शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
2
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
3
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
4
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
5
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
6
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
7
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
8
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
9
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
10
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
11
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
12
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
13
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
14
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
15
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
16
जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?
17
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
18
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
19
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
20
Ranji Rrophy: रिंकूची चौकार-षटकारांची 'बरसात'; बॅटिंगमध्ये Yuzvendra Chahal ही ठरला 'फर्स्ट क्लास'

दोन मिनिटांचे अंतर.. २५ किलोमीटरचा प्रवास

By admin | Published: September 26, 2016 12:03 AM

वडूथ-आरळे पूल : ग्रामस्थांना करावी लागते पायपीट; वेळेसह आर्थिक नुकसान; वाहनधारकांना प्रतीक्षा काम पूर्ण होण्याची

शिवथर : वडूथ-आरळे येथील कृष्णा नदीवरील पुलाला भगदाड पडल्याने वडूथ गावाचा आरळे गावाबरोबर संपर्क तुटला आहे. गाव दिसतंय; पण चारचाकी घेऊन जाता येईना. अगदी आरळे आणि वडूथ गावाच्या मध्यातून कृष्णानदी वाहत आहे. चारचाकी घेऊन जायचं म्हटलं तर अवघ्या दोनच मिनिटांमध्ये जाता येत होतं; परंतु कृष्णा नदीवरील पुलाला भगदाड पडल्याने दोन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या गावात अत्यावश्यक असेल तर कमीत कमी पंचवीस किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय. यामुळे वाहनचालक आणि ग्रामस्थ पुलाकडे टक लावून बसले आहेत. पुलाचे काम चालू कधी होणार आणि संपणार कधी, असे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. वडूथ- आरळे येथील कृष्णा नदीवरील पुलावरून शाळेसाठी मुलं बसाप्पाचीवाडी, पाटखळ माथा, वाढे येथून येत असतात; परंतु या मुलांना वडूथच्या अलीकडे एक किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. या पुलावरून वाहन जात नसल्याने मोठी चालण्याची कसरत करावी लागत आहे. गाव दिसतंय; पण चारचाकी घेऊन जाता येईना. नदीच्या अलीकडून पलीकडे फक्त बघायची भूमिका चारचाकी वाहनचालक करत आहेत. जायचं म्हटलं तर पंचवीस किलोमीटरचे अंतर म्हणजे सातारापर्यंत येथून माहुली, सोनगाव, बोखरळ, वडूथ असा प्रवास चारचाकी वाहनाकरिता करावा लागत आहे. साताऱ्याकडे जाण्यासाठी फलटणवरून येणाऱ्या वाहनांची फसगत होत आहे. वडूथ येथे गाडी आल्यावर वाहनचालकांना अवघा वडूथपासून सातारा आठ किलोमीटर आहे. परंतु त्यासाठी देखील पंचवीस किलोमीटरचे अंतर तोडावे लागत आहे. आठ दिवसांमध्येच वाहनचालक व ग्रामस्थ या पडलेल्या पुलाला वैतागले आहेत. कृष्णानदीवर पडलेल्या भगदाडामुळे वाहनचालक व ग्रामस्थांमधून बोललं जातंय की, आम्ही काही दिवस त्रास सहन करू; परंतु कामच चालू नाही तर संपणार कधी, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर) काम चांगल्या प्रकारे व्हावे पुलाला भगदाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. पुलाचे काम सुरू आहे. आमचा जीव आम्हाला प्यारा आहे. पुलाचं काम चांगल्या स्वरुपाचं व्हावं आता आम्ही त्रास सहन करत आहे. परंतु या पुलाचं काम त्वरित मार्गी लागावं, अशी आमची भूमिका आहे. - राहुल कदम, वडाप व्यावसायिक, आरळे