शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
2
अक्षय शिंदेला गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
3
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
4
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
5
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
6
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
7
सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
8
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
9
"माझ्या पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच...": बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा
10
दिवसाची कमाई ४५ लाख; कोण आहेत अरविंद कृष्णा? IIT च्या स्कॉलरनं कमावलं मोठं नाव
11
Pushpa 2 : फक्त ७५ दिवस आणखी... नवीन पोस्टरमध्ये दिसली 'पुष्पाराज'ची झलक
12
नकळतच सारे घडलं; "मला माफ करा!" १२ वर्षांपूर्वीच्या फोटोमुळं अशी फसली इंग्लंडची कॅप्टन
13
Video - २ लाख देऊन IPS झालेल्या मिथिलेशचं नवं स्वप्न; आता व्हायचंय डॉक्टर, 'हे' आहे कारण
14
जबरदस्त! अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा मिळणार; BSNL'चा 'हा' स्वस्त रिचार्ज प्लॅन ५२ चालणार
15
अक्षय शिंदे एन्काउंटर : ज्या बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन तिथेच आनंद साजरा
16
Pitru Paksha 2024: गजलक्ष्मी व्रताला द्या स्तोत्राची जोड; सुख, वैभवाशी करावी लागणार नाही तडजोड!
17
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
18
Northern Arc Capital IPO Listing: दमदार लिस्टिंगनं पैशांचा पाऊस, प्रत्येक शेअरवर किती झाला गुंतवणूकदारांना फायदा?
19
Exclusive: "शो ७० दिवसातच संपणार म्हणूनच मला...", Bigg Bossच्या ट्विस्टवर अरबाजची प्रतिक्रिया
20
तिरुपती मंदिरात ४ तास हवन, सर्वकाही शुद्ध-पवित्र; नेमके कोणते विधी केले? पाहा, महत्त्व

जिल्ह्यात दोन हजार उमेदवारी अर्ज दाखल

By admin | Published: October 30, 2016 12:33 AM

शेवटच्या दिवशी झुंबड : नगरपालिकांसाठी १२६०, तर नगरपंचायतींसाठी ७४६ अर्ज

सातारा : जिल्ह्यातील आठ नगरपालिकांमध्ये एकूण १८२ जागांसाठी १२६०, तर सहा नगरपंचायतींच्या १०२ जागांसाठी ७४६ एवढे अर्ज शेवटच्या दिवसांपर्यंत दाखल झाले आहेत. सातारा पालिकेसाठी २५३ अर्ज दाखल झाले असून, याठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. कऱ्हाड पालिकेसाठी २४१ अर्ज दाखल झाले आहेत, तर फलटण पालिकेतही तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. जिल्ह्यातील आठ नगरपालिका आणि सहा नगरपंचायतींची निवडणूक सुरू आहे. शनिवार हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. म्हसवड पालिका निवडणुकीत रंगत येणार असून, नगरसेवकांच्या १७ जागांसाठी १११, तर नगराध्यक्षपदासाठी विक्रमी असे २४ अर्ज दाखल झाले आहेत. रहिमतपूरला १७ जागांसाठी ५९ अर्ज दाखल झाले आहेत. महाबळेश्वरात १७ जागांसाठी ९२ उमेदवारांचे १२० अर्ज दाखल झाले आहेत. वाईमध्ये २० जागांसाठी १२४ अर्ज दाखल आहेत. जिल्ह्यात कोरेगाव, खंडाळा, वडूज, दहिवडी, पाटण आणि मेढा नगरपंचायतींसाठी पहिल्यांदाच मतदान होत आहे. या निवडणुकीत मोठी चुरस असल्याचे दिसत आहे. कोरेगावमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, मनसेही रिंगणात उतरली आहे. दहिवडीत काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना-भाजप निवडणूक लढवित आहेत. दहिवडीत १७ जागांसाठी ११५ अर्ज दाखल झाले आहेत. वडूजला १७ जागांसाठी तब्बल २०८ अर्ज दाखल आहेत. पाटणला १७ जागांसाठी १४९ अर्ज तर मेढ्यात १७ जागांसाठी ६८ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी) दाखल झालेलेउमेदवारी अर्ज असेपालिका जागाअर्जसातारा ४०२५३कऱ्हाड २९२४१फलटण२५२०१वाई२०१२४रहिमतपूर१७५९महाबळेश्वर१७१२०पाचगणी १७१५१म्हसवड १७१११नगराध्यक्षपदासाठी १०३ अर्जथेट नगराध्यक्ष निवडणूक होत असल्याने नगराध्यक्षपदासाठीही जिल्ह्यातील आठ नगरपालिकांसाठी १०३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे, ते असे...नगर पंचायतजागाअर्जकोरेगाव१७१०२खंडाळा१७१०४वडूज१७२०८दहिवडी१७११५मेढा१७६८पाटण१७१४९उदयनराजे उवाच पालिकेत ४०-० केलं नाही तर खासदारकीचा राजीनामा देईन. मी आडमुठेपणा केला असता तर मी २२ महिने जेलमध्ये नसतो. मला त्यावेळी कोणी जेलमध्ये घातलं, हे सगळ्यांना माहीत आहे.त्यांच्या सगळ्या मतांची बेरीज पण माझ्याएवढी होणार नाही. माझे काका शिवाजीराजे त्यांच्यासोबत आहेत. त्यांना डावलून मी फॉर्म भरायला आलो नसतो; पण तत्त्वं महत्त्वाची. शिवेंद्रसिंहराजे उवाच जिल्हा बँक निवडणूक झाली तेव्हापासूनच उदयनराजेंच्या डोक्यात मनोमिलन तोडायचं होतं.मराठ्यांचे हे मूळ घर पालिका निवडणुकीच्या निमित्ताने दुभंगलंय, याची खंत माझ्या मनामध्ये कायम राहील.आमदार म्हणून तुम्ही काय केलं, असं त्यांनी विचारणं चुकीचं आहे, असं मला वाटतं.आम्ही खासदारकीला प्रचार केलेला चालतो. जिल्हा बँकेला आम्ही तुम्हाला मदत केलेली चालते. बाकी मात्र तुम्हाला आमचं काहीच चालत नाही, याला काय अर्थ ?