शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या उमेदवारांना भाजप पाठिंबा देणार? बाळा नांदगावकरांचे महत्वाचे वक्तव्य
2
माहिममध्ये रंगणार तिरंगी लढत, ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर
3
प्रियंका गांधी यांनी वायनाड येथून भरला उमेदवारी अर्ज, काँग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शन
4
एकाच घरात आमदार, खासदार पदे; राज्याच्या राजकारणात फक्त 'या' घराण्यांचं वर्चस्व?
5
दिवाळीत Cash मध्ये केवळ 'इतकं'च खरेदी करू शकता Gold; जास्त घेतल्यास द्यावी लागेल 'ही' माहिती
6
जाहीर सभेत प्रवीण माने हुंदके देऊन ढसाढसा रडले, वडिलांच्याही डोळ्यांत पाणी; नेमकं काय घडलं?
7
'अचानक सर्वकाही ठीक होईल, या भ्रमात राहू नका', भारत-चीन करारावर व्हीके सिंह स्पष्ट बोलले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राधानगरीच्या के.पी. पाटलांनी ठाकरे गटात केला प्रवेश; शिंदे गटाच्या आबिटकरांविरोधात रिंगणात उतरणार
9
महायुतीचे आतापर्यंत एकूण किती उमेदवार जाहीर? किती जागांवर निर्णय बाकी? कधी होणार अंतिम?
10
सर्व विक्रम उद्ध्वस्त करत सोनं 81000 हजार पार; GST सह चांदी 102125 रुपयांवर, पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
अजित पवारांनी पहिल्या यादीत नवाब मलिकांचे नाव टाळले? भाजपचा विरोध की अन्य कारण...
12
Corona Virus : कोरोनातून बरं झालेल्या लोकांना हार्ट अटॅक, स्ट्रोकचा दुप्पट धोका?; शास्त्रज्ञांचा धक्कादायक खुलासा
13
NCP Vidhan Sabha Candidate List : काँग्रेसनं नाकारलं, अजित पवारांनी स्वीकारलं! ते दोन विद्ममान आमदार कोण?
14
कागलचा 'श्रावणबाळ' पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, हसन मुश्रीफ यांना उमेदवारी
15
Ajit Pawar: राष्ट्रवादीची पहिली उमेदवार यादी जाहीर; अजित पवार बारामतीतूनच लढणार, ३८ नावांची घोषणा!
16
Airtel Sunil Mittal Birthday : एकेकाळी बनवायचे सायकलचे पार्ट्स, अशी उभी केली Airtel; कसा होत सुनील मित्तल यांचा प्रवास
17
PAK vs ENG FINAL : रावळपिंडी कसोटीसाठी पाकिस्तानने अवलंबवला भारताचा फॉर्म्युला; इंग्लंडची कोंडी!
18
उमेदवारी यादी आली, CM शिंदेंची मोठी खेळी! खास माणूस जरांगेंना भेटला? पाठिंब्यासाठी हालचाली?
19
“अंतरवाली सराटी श्रद्धास्थान, बीडमधील सर्व जागा निवडून आणू”; बजरंग सोनावणे जरांगेंना भेटले
20
"आपलं काम केलं नाही तर आपणही त्यांचं काम करायचं नाही’’, शिंदेंच्या उमेदवाराचा भाजपाला इशारा

दोन वर्षांपासून लाखोंचा भविष्यनिर्वाह निधी रखडला

By admin | Published: September 22, 2016 11:33 PM

आंदोलनाचा इशारा : आनेवाडी टोलनाक्यावरील माजी कर्मचारी हवालदिल

भुर्इंज : आनेवाडी टोलनाक्यावर काम करत असणाऱ्या ८० हून अधिक कर्मचाऱ्यांची नोकरी गेल्यानंतर गेली दोन वर्षे त्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कमच त्यांना देण्यात आली नाही. याबाबत वारंवार हेलपाटे घालून वैतागलेले हे कर्मचारी आता पुरते हवालदिल झाले असून, सर्वांचा मिळून असणारा लाखो रुपयांचा निधी दसऱ्यापर्यंत न मिळाल्यास आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.याबाबत अधिक माहिती देताना किरण जाधव म्हणाले, ‘टोलनाक्यावर काम करणाऱ्यांना अनेक कर्मचाऱ्यांना काम करतानाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आणि आता राजीनामा घेतल्यानंतरही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसत आहे. काम करत असताना पगाराच्या पावत्या न देणे, मन मानेल त्या पद्धतीने कामगारांना वागणूक देणे, विनाकारण पगार कपात करणे, अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, घरापासून जवळ काम आहे म्हणून अनेकांनी त्याही परिस्थितीत काम केले. अनेकांना प्रदूषणाचा गंभीर त्रास सहन करावा लागला. टोलनाक्याचे व्यवस्थापन बदलले की कायदा बदलतो त्याचाही फटका कामगारांना प्रत्येकवेळी बसत आला आहे. या सर्व कामगारांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम लाखो रुपये असून, यातील ९५ टक्के कामगार सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. आनेवाडी टोलनाक्यावर काम केलेल्या कामगारांवर हा प्रचंड मोठा अन्याय होत आहे. गेली अनेक महिने तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करणारे हे संबंधित सर्वच कर्मचारी एकत्रितपणे याबाबत लवकरच खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे तक्रार करणार आहेत. कारण आता त्यांच्याकडूनच आम्हाला खऱ्या अर्थाने न्यायाची अपेक्षा करावी लागेल, असेही जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)८० जणांवर संक्रांत : कामगार झालेत हताशअनेक कामगारांना कोणतेही कारण न देता घरी घालवण्यात आले आहे. त्यामुळे वैतागून अनेकांनी भविष्य निर्वाह निधी मिळेल म्हणून राजीनामा दिला आहे. मात्र, ८० हून अधिक कामगारांना त्यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम मिळाली नाही. ठराविक जणांना ठराविक कारणाची पूर्तता केल्यानंतर ही रक्कम दिली असून, काम नसल्यामुळे बेकार झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे कोणत्याही अपेक्षेविना दिले पाहिजेत.