शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
2
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
3
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
4
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
5
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
6
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
7
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
8
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
9
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
10
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
11
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
12
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
13
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
14
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
15
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
16
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
17
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

स्वराज्याचे प्रवेशद्वार वर्धनगड गाव दत्तक

By admin | Published: December 18, 2014 9:39 PM

नितीन बानगुडे-पाटील : गडावर भुयारी मार्ग, दारूगोळा भांडाराची शक्यता व्यक्त

पुसेगाव : ‘सातारच्या महादेव डोंगररांगात वसलेला वर्धनगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याचे प्रवेशद्वार होता. प्राचीन काळात या किल्ल्यावर असणारे; पण काळाच्या ओघात गडावर जमिनीखाली गेलेले मोठ-मोठे महाल, कक्ष, भुयारी मार्ग, चोरट्या वाटा, अन्नधान्य कोठार व दारूगोळा साठ्याचे भांडार असण्याची शक्यता आहे. म्हणूनच या गडाच्या संवर्धन व उत्खननासाठी रात्रीचा दिवस करणार असून, ३५० वर्षांपूर्वीच्या गडावरील इतिहासाच्या पुसत चाललेल्या खुणा पुन्हा जागा करण्यासाठीच वर्धनगड गाव दत्तक घेतले आहे. वर्धनगड हे भविष्यात मोठे पर्यटनस्थळ होईल,’ असा विश्वास शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केला.वर्धनगड, ता. खटाव आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सरपंच अर्जुन मोहिते, विठ्ठल सावंत, अर्जुन कुंभार, रहेमान भालदार, पांडुरंग फडतरे, किशोर घोरपडे, संभाजी जाधव, मनीष कदम, संतोष कदम, विकास जाधव, वसंत फडतरे, रमेश कुंभार, तुकाराम चव्हाण, सचिन सावंत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.प्रा. बानगुडे-पाटील म्हणाले, ‘वर्धनगड येथे दहाव्या शतकात राजा भोज यांनी बांधलेला अभेद्य किल्ला. दुष्काळी पट्ट्यात हा किल्ला असून, हिंंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी विश्रांती घेतल्याची नोंद इतिहासातात आजही सापडते. स्वराज्याचा रखवालदार असणारा हा किल्ला आजही दुर्लक्षित आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याचे प्रवेशद्वार होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांचा साक्षीदार असलेल्या या किल्ल्याच्या तटबंदी अधिक भक्कम करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. तटबंदीत उगवलेली झाडे तोडण्याचे काम लवकरच सुरू करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सातारा-पंढरपूर रस्त्यालगत गावाच्या प्रवेशद्वाराजवळ छ. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. (वार्ताहर)शिव संग्रहालय उभारणार...उत्खननादरम्यान सापडलेला जुना ठेवा व ऐतिहासिक वस्तू जतन करण्यासाठी शिवसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. शिवकालीन पाणीपुरवठ्याची साक्ष देणाऱ्या गडावरील पाण्याच्या टाक्या साफ करून गावाच्या नागरिकांना त्या पाण्याचा उपयोग करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणार आहे. तसेच गाव दत्तक योजनेअंतर्गत या गावातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यासाठी शेतीपूरक उद्योगधंदे या गावात सुरू करण्यावर भर देण्यात येणार आहे. यावेळी गडावर जाण्यासाठी रस्ता करण्याची विनंती सरपंच अर्जुन मोहिते यांनी केली.