शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वसंतदादा कारखाना दरात भारी ठरेल : दिलीपतात्या पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 17:28 IST

कारखान्यावर मोठे अर्थचक्र अवलंबून असल्याने तो सुरू करण्यासाठी जिल्हा बॅँकेने शर्थीचे प्रयत्न केले. त्यात यश मिळाले. आता हा कारखाना दराच्या स्पर्धेत भारी ठरेल, असे मत सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देदत्त इंडियाच्या व्यवस्थापनाखाली पहिल्याच गळीत हंगामास प्रारंभदररोज सात हजार टन गाळपाचे उद्दिष्टउसाचे बिल दर बुधवारी खात्यावर जमा होणारएफआरपीपेक्षा जास्तच दर

सांगली : कारखान्यावर मोठे अर्थचक्र अवलंबून असल्याने तो सुरू करण्यासाठी जिल्हा बॅँकेने शर्थीचे प्रयत्न केले. त्यात यश मिळाले. आता हा कारखाना दराच्या स्पर्धेत भारी ठरेल, असे मत सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.दत्त इंडिया कंपनीच्या व्यवस्थापनाखाली वसंतदादा कारखान्याच्या पहिल्याच गळीत हंगामास सोमवारी प्रारंभ झाला. पाटील यांच्यासह वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, दत्त इंडिया कंपनीचे प्रमुख प्रेमजी रुपारेल, अध्यक्षा प्रीती रुपारेल, संचालक जितेंद्र धारू, महानुभव पंथाचे श्यामसुंदर महाराज, विजयराज महाराज यांच्याहस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकण्यात आली.

यावेळी दिलीपतात्या पाटील म्हणाले, हा कारखाना सुरू करण्यासाठी मी पुढाकार घेतल्यानंतर राजकीय क्षेत्रात अनेकांना आश्चर्य वाटले. यामध्ये जयंत पाटील यांचा एखादा डाव आहे का, असा संशय व्यक्त होऊ लागला. सहकार आणि कारखानदारीत मी कधीही राजकारण केलेले नाही. वास्तविक जयंत पाटील यांनीच हा कारखाना सुरू करण्यासाठी आम्हाला पाठिंबा दिला.

कारखान्यावर या परिसरातील अर्थचक्र अवलंबून आहे. हा कारखाना चालला तर बाजारपेठ कशी फुलते, हे याठिकाणच्या नागरिकांनी, व्यावसायिकांनी पाहिलेले आहे. त्यामुळेच निविदा काढून हा कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय झाला. कारखाना आता चालू झाला असून, दत्त इंडिया कंपनीच्या व्यवस्थापनाखाली दराच्या स्पर्धेतही तो शेतकºयांना न्याय देईल, याची खात्री आहे. शेतकºयांची व निवृत्त कामगारांची देणीही दिली जातील.

विशाल पाटील म्हणाले, कारखाना भाड्याने देण्यासाठी खूप प्रयत्न केले. चांगले भाडे देण्याची तयारी दत्त इंडियाने दर्शविली. हे व्यवस्थापन कमी दराची परंपरा मोडून जादा दराची परंपरा निर्माण करेल. कारखान्याचा काटा चांगला आहे. श्यामसुंदर महाराज म्हणाले, भडकाविणाऱ्या लोकांपासून कामगार व शेतकऱ्यानी सावध रहावे.

यावेळी कार्यक्रमास चेतन धारू, जितेंद्र पारेख, परीक्षित धारू, डी. के. पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते. कारखान्याचे प्रमुख अधिकारी मृत्युंजय शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. जिनेश्वर पाटील यांनी आभार मानले.

उसाचे बिल : दर बुधवारी खात्यावर जमा होणारवसंतदादा कारखान्याने शेतकऱ्याच्या खात्यावर दर बुधवारी पैसे जमा करण्याचे नियोजन केले आहे. आठ दिवसातील गाळपाची बिले तातडीने दिली जातील, अशी माहिती दत्त इंडिया कंपनीच्या अध्यक्षा प्रीती रुपारेल, संचालक जितेंद्र धारू यांनी पत्रकार परिषदेत दिली. रुपारेल म्हणाल्या की, वसंतदादा साखर कारखान्याचा वजन काटा हा जिल्ह्यात चांगला आहे.

कारखान्याच्या वजन काट्याची खात्री करून घेण्यासाठी बाहेरून वजन करून ऊस पाठविला तरी चालेल. कारखान्यात आलेल्या उसाचे वजन पाहण्याची सोय केली आहे. काही मिनिटातच संबंधित वाहतूकदार आणि शेतकऱ्याला त्याबाबतचा मेसेज मोबाईलद्वारे दिला जाईल.

दररोज सात हजार टन गाळपाचे उद्दिष्टधारू म्हणाले की, कारखान्याने यंदाच्या हंगामासाठी ४० हजार एकरवरील उसाची नोंद घेतली आहे. ७ ते ८ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. तोडणी-वाहतूक यंत्रणा सज्ज आहे. टोळ्या भागात दाखल झाल्या आहेत. पहिले दोन दिवस दोन ते तीन हजार गाळप केले जाईल. त्यानंतर स्टीम ज्याप्रमाणात वाढेल, त्यानुसार गाळप वाढविले जाणार आहे.

दररोज ६ ते ७ हजार टन उसाचे गाळप केले जाणार आहे. या कारखान्याचा योग्य वजनासाठी जिल्ह्यात लौकिक आहे, तो कायम ठेवला जाईल. कारखान्याच्या वजन काट्याविषयी शंका असल्यास बाहेरून वजन करून आले, तरी हरकत घेतली जाणार नाही. यावर्षी जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने दर दिला जाईल.

एफआरपीपेक्षा जास्तच दरकारखान्याची एफआरपी कमी असली तरी, एफआरपीचा विचार न करता शेतकऱ्याना जादा दर दिला जाईल. यावर्षी सहकार्य करणाऱ्या शेतकऱ्याना पुढील वर्षी प्राधान्याने त्यांच्या उसाचा चांगला मोबदला आम्ही देऊ. त्यामुळे शेतकऱ्यानी जास्तीत-जास्त ऊस कारखान्याला द्यावा. संघटना व शेतकºयांनी हा कारखाना नव्याने उभारण्यासाठी कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण