शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

चक्क छतावर पिकतोय सेंद्रिय भाजीपाला

By admin | Published: December 14, 2015 8:34 PM

ही रानवाट वेगळी...यशवंतनगरच्या गुरुजींची घरावर शेती

रोजच्या पालेभाज्या पिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक घटकांचा वापर केला जातो. त्याचा आरोग्यावर दुर्गमी परिणाम होतो. हे टाळायचं असेल, आपलं आणि आपल्या कुटुंबाला निरोगी पाहण्यासठी सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही. याचा विचार करून शाळेतील अध्यापनाबरोबरच बंगल्याच्या टेरेसवर वाफे तयार करून व कुंड्यांमधून भाजीपाल्याची लागवड करण्याचा यशस्वी प्रयोग वाई येथील यशवंतनगरमधील गणेश सोसायटातील वसंत नारायण चावरे या माध्यमिक शिक्षकाने यांनी केला आहे़ डिसेंबर २००१ मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात टेरेस गार्डनचे मॉडेल पाहिले़ त्यापासून बंगल्याच्या बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत व गच्चीवर फुलांच्या झाडांबरोबरच पालेभाज्या पिकविण्याची कल्पना सुचली. घराच्या ४० बाय १८ लांबी रुंदीच्या गच्चीवर सहा बाय तीनचे वाफे तयार केले़ साधारण तीन वीटांचा उभा थर तयार केला़ स्लॅबपर्यंत पाणी पोहचू नये म्हणून त्याखाली प्लास्टिकचा कागद टाकला व वाफ्यात साधी माती भरली, सेंद्रिय खतांचाच वापर केला जातो़जूनच्या शेवटच्या आठवड्यात वेलवर्गीय भाज्यांची लागवड केली जाते़ पाऊस असल्याने फारसे पाणी घालावे लागले नाही़ यथावकाश चांगले वेल तयार होतात. काकडी, दोडका, घोसाळी, घेवडा यासारख्या भाज्या चांगल्याप्रकारे बहरल्या आहेत़ वाफ्यांची संख्या वाढली़ मेथी, चाकवत, तांबडे पांढरे मुळे, वांगी, कोबी, फ्लॉवर, मिरची, कोथिंबीर, तोंडली, पालक, आले, भेंडी आदी पालेभाज्या व फळभाज्यांचे उत्पादन सध्या घेत आहेत़ सकाळ संध्याकाळ केवळ अर्धा तास पाणी देण्यासाठी वेळ द्यावा लागतो़ यामुळे पंधरा वर्षे ताज्या व सेंद्रिय भाज्या खाल्ल्याचा आनंद मिळत आहे़ सध्या टेरेसवर सात वाफे व कुंड्या आहेत़. परिसरातील महिला व पुरूष बाग बघण्यास येतात़ --पांडुरंग भिलारेमहागाईच्या दिवसांत प्रत्येकाने आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जागेप्रमाणे सेंद्रिय शेती केल्यास आपल्या गरजा भागतात. एक छंद जोपासला जातो तसेच पर्यावरणालाही मदत होते. संपूर्ण भाजी हा सेंद्रिय खतांचा वापर केल्याने आरोग्यदायी आहे़ - वसंत चावरे