शहरं
Join us  
Trending Stories
1
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
2
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
3
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
4
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
5
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
6
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
7
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
8
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
9
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
10
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
11
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
12
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
13
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
15
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
16
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
17
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
18
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
19
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
20
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?

विजय दिवस हा अभिमानास्पद समारोह

By admin | Published: December 16, 2015 12:06 AM

शिवाजीराव देशमुख : कऱ्हाडला ‘जीवन गौरव यशवंत पुरस्कार’ प्रदान सोहळा उत्साहात

कऱ्हाड : ‘भारतीय सैन्यदलाच्या बांगला मुक्ती संग्रामातील देदीप्यमान विजयाप्रीत्यर्थ कऱ्हाडला प्रत्येक वर्षी विजय दिवस साजरा केला जातो. संपूर्ण देशाला अभिमान वाटावा असा हा ‘विजय दिवस’ म्हणून ओळखला जातो. यादिवशी भारतीय सैन्यदलातील तिन्ही दलातील सैनिकांनी देदीप्यमान कामगिरी केली होती, त्याच्याच प्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. कऱ्हाडला साजरा केला जाणार विजय दिवस हा देशातल्या प्रत्येक नागरिकाने साजरा केला पाहिजे,’ असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांनी केले.कऱ्हाड येथे विजय दिवस समारोह समितीच्या वतीने आयोजित ‘जीवन गौरव यशवंत पुरस्कार’ प्रदान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मर्चंट समूहाचे अध्यक्ष सत्यनारायण मिणीयार, शिवाजी विद्यापीठ कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, पद्मश्री चंद्रकांत बोर्डे, मेजर जनरल मुखर्जी, कर्नल संभाजीराव पाटील, पुष्पलता पाटील, नगराध्यक्षा अ‍ॅड. विद्याराणी साळुंखे, गुलाबराव पोळ, मुख्याधिकारी प्रशांत रोडे आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते माजी सभापती शिवाजीराव देशमुख व मर्चंट समूहाचे अध्यक्ष सत्यनारायण मिणीयार यांना ‘जीवन गौरव यशवंत पुरस्कारा’चे वितरण करण्यात आले. तसेच सातारा तालुक्यातील पोगरवाडी येथील शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या आई कालिंदी घोरपडे यांना वीरमाता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.माजी सभापती देशमुख म्हणाले, ‘देशाच्या त्यागासाठी आपले सर्वस्व प्रदान करणे ही साधी गोष्ट नाही. या देशातील तरुणांना पोलीस हा एकच शब्द माहिती आहे. त्यामुळे त्यांच्यात सैन्यदलाच्या कार्याबाबत उर्जा निर्माण करणे गरजेचे आहे. आज देशासाठी प्राण देणारे अनेक वीर आहेत. आज माजी सैनिकांसाठी सरकारने कायदे केले आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. सैनिकांना सोयी सुविधा देण्यामध्ये महाराष्ट्राचा खूप खाली क्रमांक लागतो.’चंद्रकांत बोर्डे म्हणाले, ‘कऱ्हाडकरांचे मैदान हे शौर्यवीरांचे मैदान आहे. अशा शौर्यवीरांना मी अभिवादन करतो. हा पुरस्कार माझ्या जीवनातील एक महत्वाचा असा पुरस्कार आहे.’यावेळी कर्नल संभाजीराव पाटील व कु लगुरु डॉ. देवानंद शिंदे, गुलाबराव पोळ यांनी मनोगत व्यक्त केले.विजय दिवस समारोह समितीचे सचिव अ‍ॅड. संभाजीराव मोहिते यांनी प्रास्ताविक केले.(प्रतिनिधी)