शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
2
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
3
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
4
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
5
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल
6
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
7
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
8
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
9
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
10
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
11
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
12
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
13
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
14
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
15
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
16
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
17
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
19
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
20
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत

गावोगावी एल्गार... जय मल्हार!

By admin | Published: March 13, 2017 10:53 PM

मल्हार क्रांतीसाठी रणरागिणीही सज्ज : धनगर समाजाच्या बैठका अन् भेटींचा धडाका; दहिवडीतील मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात

सातारा : धनगर समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी दहिवडी येथे दि. १६ रोजी मल्हार क्रांतीच्या झेंड्याखाली महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात महिलांचा सहभाग वाढावा, यासाठी माता अहिल्यादेवी रणरागिणी सेना कार्यरत झाली आहे. या सेनेच्या माध्यमातून माण तालुक्यातील विविध गावे, वाडी-वस्त्यांवर बैठका घेण्यात येत असून, त्याद्वारे महिलांना मोर्चात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.बैठकांमध्ये सहभागी होणाऱ्या गाव अणि वाडी-वस्तीतील महिला दि. १६ च्या मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत. आजअखेर आरक्षण मागणीसाठीचे २० हजारांच्या आसपास अर्ज माण तालुक्यातील धनगर बांधवांनी भरल्याची माहिती संयोजकांनी दिली. ‘ना कोणत्या नेत्याचा, ना कोणत्या पक्षाचा, मोर्चा फक्त धनगर समाजाचा’ अशा घोषणा देत धनगर बांधव सक्रिय झाल्याने निघणाऱ्या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.बारामती येथील धनगर समाजाच्या मोर्चादरम्यान तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यास १५ दिवसांत आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाचा फडणवीस यांना विसर पडला आहे. दिलेल्या आश्वासनाचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्मरण करून देण्यासाठी मल्हार क्रांतीच्या झेंड्याखाली दहिवडी येथे १६ मार्च रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चात आपलाही सहभाग असावा, यासाठी महिला आक्रमक झाल्या असून, माता अहिल्यादेवी रणरागिणी सेनेच्या माध्यमातून महिलांनी गावे आणि वाडी-वस्त्यांवर बैठकांचा धडाका लावला आहे. बैठकांदरम्यान गाव आणि वाडी-वस्तीतील महिला चूल बंद ठेवत दि. १६ रोजी मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत. ‘ना कोणत्या नेत्याचा ना कोणत्या पक्षाचा मोर्चा फक्त धनगरांचा’ या संकल्पनेला महिला वर्गातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.‘आता नाय तर कधीच नाय’ असे बोलून दाखवत महिला मोर्चासाठी आक्रमक झाल्या आहेत. मोर्चात सहभागी होण्यासाठी घरातील व इतर कामे अगोदरच आटोपून घेण्यात सध्या महिलावर्ग गुंतला असल्याचे चित्र माण तालुक्याच्या विविध गावे आणि वाडी-वस्तीत दिसून येत आहे. (प्रतिनिधी)