शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

मतदारांना उबदार ब्लँकेट, खाद्य तेलाचे डबे...!

By admin | Published: November 09, 2016 1:15 AM

आचारसंहितेचे पथक कागदावरच : प्रभाग सहा आणि सातमध्येच नगराध्यक्षपदाचे वेध

वडूज : नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी ओबीसी आरक्षण असल्याने काही प्रभागांत या पदासाठी उमेदवारांची चढाओढ असली तरी खरी लढत प्रभाग सहा आणि सातमध्येच संभाव्य नगराध्यक्षपदासाठी आत्तापासूनच रस्सीखेच सुरू आहे. राजकारणातील सर्व आयुुधे या प्रभागात वापरली जाणार हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही. या प्रभागातील मतदारांची दिवाळी बऱ्यापैकी गोड गेली असली तरी अजून तरी मतदारांच्या वरचा प्रलोभनाचा वर्षाव काही थांबेना. थंडीचे प्रमाण वाढल्याने या प्रभागातील मतदारांसाठी उबदार ब्लँकेट आणि खाद्य तेलाचे डबेसुद्धा वाटप होत असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. तालुक्याचे मुख्यालय म्हणून वडूज शहराची ओळख असली तरी राज्याला हीच नगरी हुतात्म्यांची भूमी म्हणूनच परिचित आहे. सध्या या नगरीत निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने मतदार खूश करण्यासाठी वेगवेगळे प्रकार अंमलात येत आहेत. यातील एक भाग म्हणून ऐन दिवाळीत ठराविक उमेदवारांकडून मतदारांना कपडे ,भाऊबीज स्वरूपात रोख रक्कमेसह मिठाईचे बॉक्स घरपोच झाले असल्याची चर्चा ताजी असतानाच काही प्रभागांत उबदार ब्लँकेट अन् खाद्य तेलाचे डबेसुद्धा उमेदवारांकडून चिठ्ठी देऊन काही दुकानांतून दिले जात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. लोकशाहीमधील ‘मतदार राजा’ हा निवडणुकी पुरताच केंद्रबिंदू असतो. याची प्रचिती पुन्हा एकदा वडूज नगरपंचायत निवडणुकी दरम्यान असल्याचे या निमित्ताने स्पष्ट होत आहे. मतदार जनजागृतीमुळे म्हणा किंवा संभाव्य उमेदवारांमुळे मतदार संख्येत वाढ झाली असून, शहराची भौगोलिक रचना ही बदलत आहे. शहराच्या बाहेर ही लोकवस्तीत वाढ होऊन भविष्यात नगरपंचायत हद्दवाढ ही अटळ आहे. वडूज नगरपंचायतमुळे या परिसराचा विकास झपाट्याने होईल यात शंका नाही. मात्र, लोकशाहीतील निवडणुकीला अशा प्रलोभनामुळे विकासकामांना खीळ बसेल, अशी सुप्त भीतीही जाणकारांमधून जाणवते. या निवडणुकीत विक्रमी अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक तुल्यबळ होणार असेच चित्र असून, नगरीचा विकासात्मक अजेंडा कोण राबवितो याकडे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकी दरम्यान जाहीरनामे आणि वचननामे निघतीलच याकडे जागृत मतदारांचे लक्ष केंद्रित करणे याकडे उमेदवारांचा कल जादा राहणार आहे. मात्र, मतदारांना वेगवेगळ्या प्रलोभनामुळे आकर्षित करण्याचे प्रकार काही उमेदवारांना घातकी ही ठरू शकते. ऐन दिवाळीत काही उमेदवारांकडून मतदारांना दाखविली जाणारी आमिषे संभाव्य निवडणुकीला तडा जाणारी असली तरी या बाबीकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष का? असा प्रश्न ही पुढे येत आहे. यासंदर्भात संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याच्या चर्चा वडूज नगरीत सुरू आहेत. तर यासाठी असणारे पथक कागदावरच असल्याचे दिसून येते. शुक्रवार, दि. ११ रोजी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असल्यामुळे या घटनेकडे पथकाचे दुर्लक्ष असेल, असा अंदाज काही जाणकरांमधून व्यक्त होत आहे. सर्वच निवडणुकी दरम्यान वडूज शहराचे वातावरण हे खेळीमेळीचे असते. हा इतिहास संपूर्ण तालुक्याला ज्ञात आहे. मात्र, निवडणुकीपूर्वीच वडूज नगरीत प्रलोभनांचा वर्षाव होत असल्याने मतदार द्विधा मन:स्थितीत आहे. नगरीचा विकास आणि ठोस विचार करून रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना या अशा आर्थिकदृष्ट्या तगड्या उमेदवारांना शह देण्यासाठी आता नेकमे काय करायचे? हा यक्ष प्रश्न पडला आहे. (प्रतिनिधी) पारदर्शक निवडणुकीची अपेक्षा या नगरीला प्रथम हुतात्म्यांची भूमी म्हणून ओळखले जाते त्याचे कारण ही तसेच आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या ठिकाणी ९ सप्टेंबर १९४२ रोजी तालुक्यातील शूरवीरांनी हौतात्म्य पत्करले होते. त्याचीची आठवण म्हणून या नगरीला प्रसंगी ‘हुतात्मा नगरी’ असे संबोधले जाते. लोकशाही अंमलात येण्यासाठी याच तालुक्यातील काही शूरांनी आपल्या प्राणाची आहुती देशासाठी अर्पीत केली होती. याची जाणीव आजच्या पिढीला नसणे ही शोकांतिका ठरत आहे. या हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये यासाठी सर्वच स्तरावर आजअखेर प्रयत्न वडूज नगरीमध्ये विविध उपक्रमांमुळे होत असल्याचे दिसते. त्यामुळे या सर्व बाबींची जाण ठेवून स्वच्छ व पारदर्शक निवडणुका व्हाव्यात, अशी माफक अपेक्षा ही जाणकार मतदारांकडून होत आहे.