शहरं
Join us  
Trending Stories
1
हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने
2
"...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती"; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा
3
ही 'सुपरहॉट' मॉडेल नक्की आहे तरी कोण? 'टीम इंडिया'शी आहे थेट कनेक्शन, पाहा Photos
4
"भारतात मुस्लिमांवर अत्याचार होतायत", इराणच्या सर्वोच्च नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य; परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्टच सुनावलं
5
'हा' देश मुस्लिमांना देश सोडण्यासाठी देणार लाखो रुपये, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
6
मावस भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहीण प्रसूत; वाई तालुक्यातील धक्कादायक घटना
7
VIDEO : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
8
वंदे भारतची नागपूरला तिसरी दिमाखदार भेट; सिकंदराबादकडे रवाना; ३ तासांत गाठले बल्लारशाह
9
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
10
"राहुल गांधींचे शिक्षक..."; भगवंत मान यांचं काँग्रेस नेत्याच्या शिक्षणावर भाष्य करत मोठं विधान
11
"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?
12
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
13
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
14
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
15
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
16
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
17
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
18
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
19
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?
20
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा

सातारा जिल्ह्यात पावसाळ्यातही अनेक गावात पाणीटंचाई; २३ गावे, ११३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा 

By नितीन काळेल | Published: July 17, 2024 7:28 PM

माण तालुक्यात सर्वाधिक टंचाई; खटाव, काेरेगाव, वाई, खंडाळ्यातही पाणीपुरवठा 

सातारा : जिल्ह्यात आतापर्यंत बहुतांशी ठिकाणी चांगला पाऊस झाला असलातरी काही भागात हुलकावणीही आहे. त्यामुळे पावसाळा सुरू असलातरी अजूनही जिल्ह्यातील २३ गावे आणि ११३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यातील सर्वाधिक गावे आणि वाड्या या माण तालुक्यात आहेत. तर वाई, कोरेगाव आणि खंडाळा तालुक्यातही टँकरने पाणीपुरवठा होत आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी कमी पर्जन्यमान झाले होते. त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झालेली.परिणामी गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासूनच काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरूवात झाली. तर यावर्षीच्या उन्हाळ्यात टंचाईची स्थिती गडद झाली. त्यामुळे २०० हून अधिक गावे आणि ७१६ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत होता. पण, जून महिन्याच्या सुरूवातीलाच मान्सूनचा पाऊस दाखल झाला. तसेच बहुतांशी ठिकाणी चांगले पर्जन्यमान झाले. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी होत गेली. तरीही जिल्ह्यातील काही भागात अजूनही आवश्यक तेवढा पाऊस झालेला नाही. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अजूनही २३ गावे आणि ११३ वाड्यांसाठी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

माण तालुक्यात टंचाईची दाहकता अधिक होती. पण, गेल्या महिन्यात चांगला पाऊस झाल्याने टँकरची संख्या कमी झाली आहे. सध्या १७ गावे आणि ११२ वाड्यांसाठी १४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यावर ४२ हजारांवर नागरिकांची तहान अवलंबून आहे. तालुक्यातील मोही, डंगिरेवाडी, शेवरी, राणंद, वरकुटे म्हसवड, कारखेल, संभूखेड, हवालदारवाडी, खडकी, पळशी, पिंपरी, जाशी, भालवडी, मार्डी, पर्यंती, इंजबाव आणि वाकी गावांसह वाडीवस्त्यांवर टँकर सुरू आहे. खटाव तालुक्यात टंचाई कमी झाली आहे. सध्या ३ गावे आणि एका वाडीसाठी २ टँकर सुरू आहेत. यावर २ हजार नागरिक आणि ९९६ पशुधन अवलंबून आहे. शिंदेवाडी, नवलेवाडी आणि गारळेवाडी येथे टंचाई आहे.कोरेगाव तालुक्यात भाडळे येथेच टंचाई आहे. गावातील ३ हजार २७८ नागरिक आणि ३ हजार १४२ पशुधन टॅंकरवर अवलंबून आहे. खंडाळा तालुक्यातही एकाच गावात पाण्याची भीषण स्थिती आहे. निंबोडीतील २२६ ग्रामस्थ आणि ३५१ पशुधनासाठी टँकर सुरू आहे. वाई तालुक्यातही आनंदपूर येथे टंचाई आहे. याठिकाणीही टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. इतर तालुक्यातील टँकर बंद झाले आहेत.

४८ हजार नागरिकांसाठी २० टँकर सुरूजिल्ह्यात सध्या अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या २० टँकरद्वारे सुमारे ४८ हजार नागरिक आणि ४ हजार ६७४ पशुधनाला पाणीपुरवठा होत आहे. त्याचबरोबर टंचाई निवारणासाठी ११ विहिरी आणि ३ बोअरवेलचेही अधिग्रहण करण्यात आलेले आहे. माण तालुक्यात एक विहीर आणि ३ बोअरवेल अधिग्रहीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसWaterपाणीdroughtदुष्काळ