शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

सातारा जिल्ह्यात पाणी टंचाईची स्थिती भयावह; एक लाख लोकांची तहान टॅंकरवर

By नितीन काळेल | Published: November 24, 2023 6:44 PM

उन्हाळ्यात टंचाई निवारणासाठी सुरू झालेल्या टॅंकरची चाके थांबेनात

सातारा : जिल्ह्यात उन्हाळ्यात टंचाई निवारणासाठी सुरू झालेल्या टॅंकरची चाके जून-जुलैमध्ये थांबतात. पण, यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने जिल्ह्यातील ५ तालुक्यातील सुमारे १ लाख नागरिक आणि ६९ हजार पशुधनाला टॅंकरच्या पाण्याचा आधार आहे. सध्या हिवाळ्यातच ६७ गावे आणि २६५ वाड्या तहानल्या असल्यातरी आगामी काळात टॅंकरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.जिल्ह्यात मागील तीन वर्षांत चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे उन्हाळ्यातील टंचाई सोडलीतर जुलै महिना उजाडताच टॅंकर बंद व्हायचे. यंदा मात्र, पावसाने घात केला. त्यामुळे टंचाईची स्थिती कायम आहे. विशेषत: करुन माण तालुक्यात भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. मागील सहा महिन्यांपासून टॅंकरवरच अनेक गावांची तहान अवलंबून आहे.माण तालुक्यात १०५ गावे आहेत. त्यातील ३१ गावे आणि २२८ वाड्यांना टॅंकरच्या पाण्याचा आधार आहे. यासाठी ३५ टॅंकर सुरू असून त्यावर ४८ हाजर नागरिक आणि ५३ हजार जनावरांची तहान अवलंबून आहे. पांगरी, वडगाव, पाचवड, मोगराळे, बिजवडी, अनभुलेवाडी, राजवडी, मोही, थदाळे, डंगिरेवाडी, वावरहिरे, हस्तनपूर, भाटकी, खडकी, ढाकणी, धुळदेव, कारखेल, वरकुटे - म्हसवड, संभूखेड, वाकी, रांजणी, हवालदारवाडी, पळशी, पिंपरी, भालवडी, खुटबाव, पर्यंती, मार्डी, इंजबाव, वारुगड, परकंदी, महिमानगड, उकिर्डे, पांढरवाडी, सुरुपखानवाडी, विरळी, कुरणेवाडी या गावांसह वाड्यावस्त्यांवर टॅंकर सुरू आहे.

खटाव तालुक्यातीलही ६ गावे आणि ९ वाड्यांसाठी ३ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मांजरवाडी, नवलेवाडी, मांडवे, गोसाव्याचीवाडी, धारपुडी येथील सुमारे ५ हजार नागरिक आणि २ हजारांहून अधिक पशुधनाला टॅंकरचाच आधार आहे. तर फलटण तालुक्यात अजुनही १० गावे आणि २८ वाड्यांसाठी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. सासवड, दुधेबावी, वडले, मिरगाव, आरडगाव, आंदरुड आदी गावांतील १२ हजार नागरिक आणि ११ हजार पशुधन टॅंकरवर अवलंबून आहे.कोरेगाव तालुक्यात तर १९ गावांतील ३१ हजार नागरिक आणि अडीच हजार पशुधनाला टॅंकरचा आधार आहे. यासाठी १४ टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. चवणेश्वर, होलेवाडी, विखळे, फडतरवाडी, जाधववाडी, होसेवाडी, गुजरवाडी, अनभुलेवाडी, नायगाव, नांदवळ, पिंपोडे बुद्रुक येथे टॅंकर सुरू आहे. वाई तालुक्यातीलही एका गावातील १२०० नागरिक आणि २८९ जनावरांना टॅंकरचा आधार आहे.

जिल्ह्यात ६१ टॅंकर सुरू..जिल्ह्यातील माण तालुक्यात टंचाईची स्थिती भयावह आहे. त्यात आणखी वाढ होत जाणार आहे. सध्या जिल्ह्यात ६१ टॅंकरद्वारे लोकांना आणि पशुधनाला पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये शासकीय ११ आणि खासगी ५० टॅंकर आहेत. जानेवारीनंतर टंचाईग्रस्त गावे, वाड्यावस्त्यांची संख्या वाढण्याचा अंदाज आहे.

विहिरी अन् बोअरवेलचेही अधिग्रहण..टंचाईग्रस्त गावातील नागरिकांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच विहिरी आणि बोअरवलेचेही पाणी उपलब्ध केले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात १७ विहिरी आणि ३५ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. माणमध्ये ५ विहिरी, १० बोअरवेलचे अधिग्रहण झाले आहे. खटाव तालुक्यात ३ विहिरी, २१ बोअरवेल अधिग्रहीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीdroughtदुष्काळ