शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

सातारा जिल्ह्यात फेब्रुवारीतच पाणी टंचाई; 'या' तालुक्यात टँकर सुरू  

By नितीन काळेल | Updated: February 21, 2025 18:32 IST

टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार असल्याने प्रशासनाला नियोजन करावे लागणार

सातारा : जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यातच टंचाई सुरू झाली असून माण तालुक्यातील सहा गावांसह वाड्यावस्त्यांना टॅंकर सुरू झाले आहेत. या टॅंकरवर १० हजारांहून अधिक लोकांची तहान अवलंबून आहे. तर लवकरच टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार असल्याने प्रशासनाला नियोजन करावे लागणार आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी वार्षिक सरासरीच्या अधिक पर्जन्यमान झाले होते. पण, माण तालुक्यातील काही भागात पाऊस कमी झाला होता. यामुळे पाऊस कमी झालेल्या भागात टॅंकर यंदा लवकर सुरू करावे लागतील असा अंदाज होता. हा अंदाज खरा ठरला आहे. कारण, यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच टंचाई निवारणासाठी टॅंकर सुरू करावे लागले आहेत. माण तालुक्यात यंदा लवकर टंचाई परिस्थिती उद्भवलीय. मागील चार दिवसांपासून माणमधील सहा गावांना आणि वाड्यावस्त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यातील मोही, धुळदेव, वरकुटे म्हसवड, कारखेल, हवालदारवाडी, जाशी या गावांना सध्या टॅंकर सुरू आहेत. माणमधील आणखीही काही गावांनी टॅंकरची मागणी केलेली आहे. त्यामुळे माण तालुक्यात टॅंकरची संख्या वाढणार आहे.

६७ वाड्यांना ही झळ..माण तालुक्यात ६ गावे टंचाईग्रस्त आहेत. तसेच त्या अंतर्गत ६७ वाड्यांना ही टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यातील सध्या १० हजार १३२ नागरिकांना टॅंकरच्या पाण्याचा आधार आहे.

९ हजार पशुधन ही बाधित..माणमध्ये पाणी टंचाईने नागरिक बाधित आहेत. तसेच पशुधनालाही पाणी मिळणे अवघड झालेले आहे. सध्या टंचाईग्रस्त गावातील ९ हजार ७० पशुधनाला टॅंकरच्या पाण्याचा आधार आहे.

८ टॅंकर सुरू..जिल्ह्यात गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या मध्यावर टंचाई निवारणासाठी टॅंकर सुरू झाले होते. यंदा मात्र, फेब्रुवारीतच सुरूवात झाली आहे. माणमध्ये सध्या ८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. हे सर्व टॅंकर शासकीय आहेत. या टॅंकरना दररोज २९ खेपा मंजूर आहेत. तसेच टंचाईच्या गावात ३ विहिरी आणि एका बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीTemperatureतापमान