शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

..अन् निघाले कर्नाटकात प्रचाराला; अजित पवारांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सरकारवर डागली तोफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 18:32 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर बोलण्याचे टाळतात. इकडून तिकडून चिठ्ठी आली की चिठ्ठीवर बोलले जाते.

साहिल शहाकोरेगाव : ‘राज्यात सत्तेवर आलेल्या महायुती सरकारला कोणी विचारानासे झाले आहे. कोकणातील बारसू रिफायनरीचा प्रश्न चिघळला असताना सरकार दुर्लक्ष करत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य आता कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारात उतरले आहेत. अरे महाराष्ट्रात तुम्हाला कोण ओळखत नाही, अन् कर्नाटकात कोण ओळखेल?, असा जोरदार टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला.कोरेगाव येथे सोमवारी विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवस अभीष्टचिंतन सोहळा व कोरेगाव बाजार समिती निवडणुकीच्या विजयी सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, संचालक सत्यजितसिंह पाटणकर, प्रदीप विधाते उपस्थित होते.अजित पवार म्हणाले, ‘उंब्रजमध्ये एका व्यक्तीचा चक्क मनगटापासून हात वेगळा करण्याचे धारिष्ट केले जाते. पोलिस यंत्रणा बघत राहते, हे बरोबर नाही. कायद्याचे राज्य राहिले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार व्यवस्थित चालवत नाहीत. जाहीर सभा, मेळावे घेताना मुद्देसूद बोलत नाहीत. सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर बोलण्याचे टाळतात. इकडून तिकडून चिठ्ठी आली की चिठ्ठीवर बोलले जाते. पुन्हा त्यांच्या कारभारावर टीका टिपणी झाली की गावाकडे दोन ते तीन दिवस येऊन राहतात.’राज्यात टीका टिपणी व मुख्यमंत्र्यांची शेती या विषयावर चर्चा होऊ लागली की मग फायलींचा निपटारा करण्यासाठी गावी गेल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगितले जाते. तीन दिवसात ६५ फायलींचा निपटारा केल्याचे जाहीर केले जाते. आम्ही १९९९ पासून सत्तेत आहोत. सत्तेची कधी मस्ती केली नाही. आम्ही दोन तासांत ६५ फायलींचा निपटारा करत होतो.’आमदार महेश शिंदे यांचा नामोल्लेख टाळत ‘२००७ मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत एक तरुण उमेदवार म्हणून त्यांना संधी देण्याचे काम केले. मात्र, संधीचे सोने करण्याऐवजी राख करण्याकडे काही जणांचा कल असतो, तसे काही घडले. येथील लोकप्रतिनिधी माझ्या आणि खासदार शरद पवार यांच्या नावाने शिव्या घालण्याचे काम करतात. शिव्या घातल्या म्हणजे सभा जिंकली, असे त्यांना वाटते. आमदार शशिकांत शिंदे यांच्यासाठी बाजार समिती निवडणूक ही कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील परिवर्तनाची नांदी ठरणार आहे,’ असेही अजित पवार म्हणाले.शशिकांत शिंदे म्हणाले, ‘आम्ही पालकमंत्री होतो. व्यासपीठावर बसलेल्या आमदारांनी पालकमंत्रीपद भूषविले आहे. त्यांनी कधी विरोधाला विरोध केला नाही. खुनशी राजकारण केले नाही. विरोधकांच्या धनशक्तीचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीतील वजीर असून, बुद्धिबळाच्या खेळामध्ये वजीर हा भल्याभल्यांना चितपट करतो. अगदी तुमच्या राजाला देखील सपशेल चेकमेट करेल.’आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचा मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. त्यानंतर कोरेगाव, खटाव व जावली महाबळेश्वर शेती उत्पन्न बाजार समितीसह कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ, कोरेगाव तालुका खादी ग्रामोद्योग संस्थेच्या संचालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तालुकाध्यक्ष भास्कर कदम यांनी स्वागत केले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव महाडिक यांनी प्रास्ताविक केले.

साखर कारखानदारीवर भाष्यअजित पवार हे भलत्याच मूडमध्ये होते. त्यांनी भाषणात अनेकांच्या दांड्या गुल केल्या. जनतेला अपेक्षित कारभार करण्याच्या सूचना शशिकांत शिंदे यांना केली, तर आमदार मकरंद पाटील व नितीन पाटील यांच्याविषयी म्हणाले, ‘खंडाळा आणि किसन वीर साखर कारखान्यात पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी घाण केली होती. ती काढताना या बंधूंची दमछाक होत आहे. सहकारी संस्था व्यवस्थित चालवाव्या लागतात. दोघे भाऊ आता चांगलेच वाकले असून, खासदार शरद पवार व माझ्याकडे कारखान्याच्या विषयात येत असतात.’

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस