शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
2
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
3
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत
4
...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका
5
खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक
6
अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश
7
आता GPay युझर्सना मिळणार Gold Loan; 'या' कंपनीसह झाला करार, पाहा डिटेल्स
8
"असं केलं, तर महाराष्ट्रात आरक्षणाचा वाद राहणार नाही", शरद पवारांनी काय सुचवला मार्ग?
9
शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला
10
MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक
11
मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा'; शरद पवारांनी केंद्राचे केले अभिनंदन, म्हणाले...
12
'गोलीगत' सूरजसाठी सुप्रिया सुळे मैदानात! बिग बॉसचा महाविजेता करण्यासाठी बारामतीकरांना केलं आवाहन
13
करामती Rashid Khan 'ते' वचन विसरला! क्रिकेटरनं ३ भावांसह एकाच मांडवात उरकलं लग्न
14
मोदी सरकारची नवी स्कीम, १ कोटी तरुणांना महिन्याला ₹५००० मिळणार; कधी, केव्हा, कसा कराल अर्ज?
15
मराठी भाषेला अभिजात दर्जा, राज ठाकरेंनी केलं स्वागत; या निर्णयाचा फायदा सांगितला
16
Bigg Boss 18: बॉलिवूड सुंदरी घेणार घरात एन्ट्री, ९० च्या दशकातील ही 'सेन्सेशनल क्वीन' कोण?
17
इस्त्रायलची मोठी कारवाई! बेरुतही स्फोटांनी हादरला, हिजबुल्लाहचा नवा चीफ सफीद्दीन टारगेटवर
18
संपादकीय: इराणने का उडी घेतली? पडसाद अमेरिकेतील निवडणुकीत
19
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक
20
सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ

जिसकी ताकद बडी.. उसका ‘तिकीट’ फिक्स!

By admin | Published: January 24, 2017 11:34 PM

चुरस वाढली : निवडून येण्याच्या निकषाबाबत सर्वच पक्षनेते ठाम

 

सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या आगामी निवडणुकीचा जोरदार धुरळा उडाला आहे. राष्ट्रवादी, काँगे्रस, भाजप, शिवसेना या प्रमुख पक्षांकडे निवडणूक इच्छिणाऱ्या उमेदवारांची संख्या मोठी असली तरी चुरस वाढली असताना निवडून येण्याचा निकष लक्षात घेऊनच उमेदवारी देण्याचा अजेंडा सर्वच पक्षांतील नेतेमंडळींनी राबविला आहे. त्यामुळे ‘जिसकी ताकद बडी...उसका तिकीट फिक्स!,’ असेच धोरण सर्वच पक्षांत पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाभर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितींमध्ये वर्चस्व असणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाने सर्वप्रथम आघाडी घेत इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. या पक्षाकडून लढण्यासाठी ७५० उमेदवार इच्छुक आहेत. सुरुवातीला हा आकडा मोठा वाटत होता. त्यामुळे बंडखोरीचे दुखणे राष्ट्रवादीलाच जास्त झळ पोहोचवेल, असे चित्र होते. पण उमेदवारी मागणाऱ्यांची हीच गर्दी भाजप व शिवसेनेतही आहे. शिवसेनेने काही दिवसांपूर्वी ७१५ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. भाजपनेही तालुका पातळीवर मुलाखती घेतल्या होत्या. भाजप येत्या २५ जानेवारी रोजी अंतिम यादी जाहीर करणार आहे. साहजिकच, उमेदवारी मागणाऱ्यांची मोठी गर्दी सर्वच पक्षांकडे पाहायला मिळते. या उमेदवाऱ्या देताना स्थानिक राजकारणाचा विचार केला जातो. गावपातळीवर आर्थिक, सामाजिक व राजकीय या सर्व बाबींनी जो सक्षम असतो, त्यालाच उमेदवारी दिली जाते. मागील निवडणुकांचा इतिहास पाहता राष्ट्रवादी विरोधात काँगे्रस असे दुतर्फी युद्ध होत होते. भाजप, शिवसेना एखाद्या दुसऱ्या जागी यशस्वी झाली होती. मात्र, यंदाची निवडणूक वेगळी आहे. राज्यातील आघाडी सरकार गेल्याने राष्ट्रवादी व काँगे्रस यांच्या व्यतिरिक्त भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना हे पक्षही आक्रमक झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात शिरकाव करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता आणणे, बंधनकारक असल्याने केंद्र व राज्यात सत्तेवर असणाऱ्या सत्ताधारी महायुतीनेही जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. या निवडणुकीत ठकास-महाठक उमेदवार देण्याची तयारी सर्वच राजकीय पक्षांची केली असल्याचे चित्र दिसत आहे. (प्रतिनिधी)