शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

हमीभावाने सोयाबीन खरेदीचा निर्णय, फायदा होणार ?; शेतकऱ्यांमध्ये साशंकता 

By नितीन काळेल | Published: September 09, 2024 6:48 PM

तर क्विंटलला ३०० रुपये तरी जादा मिळणार 

सातारा : सोयाबीनला कमी दर मिळत असल्याने केंद्र शासनाने राज्यात हमीभावाने खरेदीला मान्यता दिली आहे. यामुळे सध्याच्या दरानुसार ३०० रुपये तरी क्विंटलला जादा मिळतील. याचा लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल. परंतु, मागील अनुभव पाहता नियमामुळे आणि सक्षम यंत्रणा नसल्याने शेतकऱ्यांचा खरंच फायदा होणार का? याबाबत साशंकता आहे.राज्यात मागील काही वर्षांत सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. सातारा जिल्ह्यात तर यावर्षी ९६ हजार हेक्टरवर सोयाबीन आहे. पण वर्षभरात क्विंटलचा दर साडेचार हजार रुपयांदरम्यानच राहिला. यामुळे शेतकऱ्यांवर घरात सोयाबीन ठेवण्याची वेळ आली. सध्या खरिपातील सोयाबीन काढणीची वेळ आली तरी हमीभावाएवढाही दर मिळत नाही. त्यामुळे केंद्र शासनाने हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी मान्यता दिली आहे.

सोयाबीन उत्पादकांना मदत व्हावी आणि बाजारभाव पडल्याने नुकसान होऊ नये, यासाठी खरेदी केंद्रे सुरू होणार आहे. पण याचा फायदा शेतकऱ्यांना होणार का? याविषयी साशंकता आहे. अशा केंद्रांमुळे निराशा होत आहे. शासकीय यंत्रणा कमकुवत ठरत आहे. केंद्रावर सोयाबीन नेल्यास दर्जा नाही, घाण-माती आहे, ग्रेडमध्ये बसत नाही, अशी कारणे सांगून हमीभावही टाळला जातो, असे शेतकरी सांगतात.

  • जिल्ह्यात सोयाबीन क्षेत्र - ९६ हजार हेक्टर
  • सध्या मिळणारा क्विंटलचा दर - सरासरी ४५०० ते ४६००
  • हमीभाव - ४८९२

केंद्र शासनाने हमीभावाने सोयाबीन खरेदीचा निर्णय घेतला तरी केंद्रांवर व्यापारीधार्जिणे धोरण असते. नियम आणि विविध कारणे सांगून दर मिळत नाही. यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीन कोठेही विकले आणि पक्की पावती आणली तर हमीभावाएवढा दर मिळण्यासाठी वरील फरकाची रक्कम द्यावी. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी