शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

निवडणुकीत गुंतलेले नेते दुष्काळाकडे पाहणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 22:18 IST

खटाव - माणमध्ये १०१ गावांना १०९ टँकरद्वारे पाणी

शेखर जाधव/वडूज : खटाव - माण तालुक्यातील जनावरांसह माणसांच्या पिण्याच्या पाण्याची भीषण कमतरता जाणवू लागली आहे. सद्यस्थितीत पेयजल टंचाई निवारणार्थ १०१ गावांना १०९ टँकरद्वारे पाण्याचे वाटप सुरु आहे. तर टँकर व गावांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यामुळे संबंधित प्रशासनाला पाणी उपलब्ध करण्यासाठी पर्यायी व्यवस्था उभी करणे महाकठीण बनत आहे. पण, निवडणुकीच्या प्रचारात गुंतलेल्या नेत्यांना या परिस्थितीकडे पाहण्यास वेळ नाही.

अपुऱ्या पर्जन्यवृष्टीमुळे खटाव - माण तालुक्यात यावर्षी पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची चणचण प्रामुख्याने जाणवू लागली आहे. त्यातच सद्यस्थितीत उरमोडी, जिहे-कटापूर व तारळी पाणी साठ्याचे प्रमाण कमी आहे. खटाव - माणला वरदायिनी ठरणाऱ्या जिहे-कटापूर सिंचन योजनेचे पाणी येरळा नदी व माणगंगेला प्रवाहित केले असते तर हे पाण्याचे भीषण संकट उद्भवले नसते, असे जाणकारांमधून मत व्यक्त होत आहे. दोन्ही तालुक्यातील सिंचन योजनेद्वारे येणारे पाणी याबाबत दुजाभाव झाल्याच्या चर्चा खटाव तालुक्यात सुरु आहेत. शेतीसाठी व जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी खटाव तालुका पाणी संघर्ष समितीने आवाज उठवून प्रशासनाला वेठीस धरले होते. या आंदोलनाचे फलित म्हणून उशिरा का होईना खटाव तालुक्यात अत्यल्प पाणी सोडण्यात आले.पाण्याअभावी शेतीपिके करपून गेली. तर सध्या जनावरे व माणसांच्या पाण्यासाठी दोन्ही तालुक्यांतील जनतेची भटकंती सुरु आहे.

खटाव तालुक्यातील ६८ हजार लोकांना पाणीबाणीखटाव तालुक्यातील ४१ गावे आणि १०७ वाड्या-वस्त्यांमध्ये ६७ हजार ९६४ बाधित लोकसंख्या व १२ हजार ८९२ बाधित पशुधन असल्याने २९ खासगी टँकर व दोन शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. यामध्ये मांजरवाडी , गोसाव्याचीवाडी, मांडवे, पेडगाव, गोपूज, सातेवाडी, नवलेवाडी, मोळ, राजापूर, रणसिंगवाडी, रेवलकरवाडी, पांढरवाडी, हिंगणे, तडवळे, एनकूळ, डांभेवाडी, कणसेवाडी, धारपुडी, गादेवाडी, दरुज, खटाव, गारवडी, आवळे पठार, जाखणगाव, औंध, भोसरे, लोणी, कोकराळे, अंभेरी, शिंदेवाडी, कानकात्रे, ढोकळवाडी, कलेढोण, जायगाव, कामथी, उंबरमळे, शिंदेवाडी कटगुण, कातळगेवाडी, धोंडेवाडी, पळसगाव, दातेवाडी, अनफळे, पडळ अशा गावांमध्ये दैनंदिन ६७ टँकर खेपा सुरू आहेत. तर यासाठी १९ विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत .

माण तालुक्यात १ लाख लोकसंख्येला पाणीटंचाईमाण तालुक्यात १ लाख ८ हजार ८७५ बाधित लोकसंख्या व १ लाख ६२५० बाधित पशुधन आहे. एकूण ६० गावे आणि ३७० वाड्या-वस्त्यांना ७८ टँकर द्वारे १५१ दैनंदिन टँकर खेपामधून पाणी वाटप करण्यात येत आहे. तर यासाठी २६ विहिरी आणि इंधन विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. दोन्ही तालुक्यातील उन्हाचा पारा ४० शी ओलांडत चालला असून, पाण्याची पातळी मृत साठ्याच्याही खाली गेली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस दुष्काळाचे सावट गडद होत चालले आहे.

जिल्ह्यातील पाणी साठ्याचे सुयोग्य नियोजन केले असते तर ही वेळ खटाव - माण तालुक्यावर आलीच नसती, अशी टीका खटाव तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येत आहे. पाण्यासाठी दाहीदिशा फिरणारी जनता तर लोकसभेच्या प्रचारासाठी स्वहित जोपासत मेळावे घेणारे राजकीय नेते असे विदारक चित्र सध्या खटाव - माण तालुक्यात दिसून येत आहे .

दुष्काळाचे गडद सावट....राजकीय नेत्यांचे दुर्लक्षखटाव व माण तालुक्यात १०१ गावे आणि ४७७ वाड्यांमधील १ लाख ७६ हजार ८३९ बाधित लोकसंख्या व १ लाख १९ हजार १८२ बाधित पशुधनासाठी १०९ टँकरद्वारे दैनदिन २४४ खेपांमधून पाणी वाटप करण्यात येत आहे. तर दोन्ही तालुक्यांत एकूण ४५ विहिरी आणि इंधन विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे खटाव - माण तालुक्यावर दुष्काळाचे सावट गडद होत चालले आहे.

टॅग्स :satara-pcसाताराdroughtदुष्काळ