शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

जेवणावळींमुळे मिळतेय महिलांना रोजगाराची संधी

By admin | Published: November 09, 2016 1:22 AM

सातारा नगरपालिका : स्वयंपाक करण्यापासून वाढण्यापर्यंत बचत गटांची लगबग

  सातारा : निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीला आत्ताशी सुरुवात झाली असली तरीही यंदाच्या निवडणुकीत महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध होऊ लागल्याचे चित्र दिसत आहे. प्रभागातील नेते मंडळींच्या घरात दिवसेंदिवस वाढता राबता असलेल्या कार्यकर्त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचे नियोजन करण्याचा ठेका महिला बचत गटांना मिळत असल्यामुळे या निवडणुकीत बचत गटांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. सातारा नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने यंदा फारच लवकर धुरळा उडवला आहे. सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी यांच्याबरोबरच भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीत शड्डू ठोकल्याने ही निवडणूक रंगतदार होणार हे वेगळे सांगायला नको. मनोमिलनाच्या यशस्वी दशकानंतर दोन्ही आघाड्यांनी थाटलेली स्वतंत्र चूल यंदा अनेकांना रोजगार मिळवून देत आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत डझनाहून अधिक बिनविरोध नगरसेवक झाल्याने कार्यकर्त्यांना जपणं आणि त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची सोय करणं ही डोकेदुखी कोणालाच नव्हती. यावेळी मात्र चित्र पूर्णपणे बदलले आहे. शहराने बिनविरोध हटावचा नारा दिल्याने एकेका वॉर्डात परस्परांविरोधात उभे ठाकलेल्या उमेदवारांना प्रत्येक कार्यकर्ता आता महत्त्वाचा वाटू लागला आहे. म्हणूनच दिवसभर कार्यकर्त्यांच्या घोळक्यात राहणाऱ्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना जेवायलाही घरी न सोडण्याचा जणू चंगच बांधला आहे. सकाळी नाष्ट्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत नेत्यांच्या पंगतीत बसूनच कार्यकर्ते फक्त झोपण्यासाठीच घरी जात असल्याचे चित्र विविध प्रभागांत पाहायला मिळत आहे. किरकोळ कार्यकर्त्यांचा वाढदिवस मात्र, ढाब्यांवर किंवा शहराबाहेर असलेल्या मोकळ्या जागेत जोरकसपणे सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या धामधुमीतच निवडणुकीचे फटाके फुटल्याने यंदा महिला बचत गटांकडे तारांबळीचे चित्र दिसत आहे. दिवाळीच्या फराळाची आॅर्डर पूर्ण होतेना होते तोवरच निवडणूक प्रचारात असलेल्या कार्यकर्त्यांच्या जेवणाच्या आॅर्डर बचत गटांना मिळू लागल्या आहेत. घरातील महिलांना स्वयंपाकात गुंतवण्यापेक्षा त्यांचा उपयोगी सक्रिय प्रचारात करून घेऊन मतदानाची संख्या वाढविण्याची नीती उमेदवारांनी आखली आहे. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये उमेदवारांच्या घरी भल्या सकाळपासून नाष्टा आणि रात्री उशिरा जेवण पोहोचविणाऱ्या गाड्यांचा राबता आहे. निवडणूक प्रचारासाठी कार्यकर्ते सकाळी सात वाजता येतात, त्यामुळे त्यांच्यासाठी सात वाजता चहा आणि नाष्टा दिला की नंतर दुपारचे जेवण दुपारी दीड वाजता. चहा चार वाजता आणि रात्रीचे जेवण अकरानंतर असे नियोजन केल्याचे दिसते. (प्रतिनिधी) सीसीटीव्हीमुळे हॉटेल नकोच! गेल्या काही वर्षांत शहरातील बहुतांश हॉटेलमध्ये सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. त्यामुळे हॉटेल आणि परिसरात मारामारीचे प्रमाण आटोक्यात आले आहे. मात्र, हेच सीसीटीव्ही आता नेत्यांची डोकेदुखी ठरत आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्रास मतदार आणि कार्यकर्त्यांना विशिष्ट हॉटेलचे पास दिले की झालं!, असे होते. आता मात्र सीसीटीव्हीमुळे नेत्यांनी हॉटेलवर फुली मारून घरीच रोजच्या रोज शाकाहार आणि मांसाहाराच्या पंगती उठविण्यास सुरुवात केली आहे. प्रचाराच्या पुढील टप्प्यात मात्र मतदारांना त्यांच्या परिसरातील तरुणांचे वाढदिवस साजरे करण्यासाठी प्रायोजकत्व देण्याचा मानस आहे. त्यामुळे हा खर्च आयोगाला दाखवण्याची डोकेदुखी असणार नाही, असे उमेदवारांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.