शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
5
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
6
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
7
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
8
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
9
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
10
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
11
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
12
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
13
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
14
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
15
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
16
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
17
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
18
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
19
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
20
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा

जिल्हा बँकेचे काम पाचनंतर चालते

By admin | Published: November 30, 2015 10:03 PM

जयकुमारांचा आरोप : व्यवस्थापकीय संचालकपदी दिलीप धरू यांना दिलेली मुदतवाढ नियमबाह्य

सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कारभार चुकीच्या पद्धतीने चालला असून, कार्यकारी समितीच सायंकाळी पाच वाजल्यानंतर सर्व निर्णय घेते. या निर्णयांना सभेत मान्यता देणारे संचालक नामधारी राहिले आहेत, असा आरोप आमदार जयकुमार गोरे यांनी केला. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप धरू यांना दिलेली मुदतवाढ नियमबाह्य असूनही त्यांच्या सहीने निर्णय होत असल्याची टीकाही त्यांनी केली. सुमारे सात महिन्यांपूर्वी जिल्हा बँकेचे संचालकपद लाभलेल्या आमदार गोरे यांनी येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी पत्रकार परिषद घेऊन बँकेच्या कारभारावर टीका केली. पदाधिकारी निवडीपासून आजवर जो कारभार आपण पाहिला, तो शंभर टक्के चुकीचा असल्याचे सांगून ते म्हणाले, ‘संचालकांना सभेच्या काही दिवस आधी संपूर्ण विषयपत्रिका अभ्यासासाठी मिळायला हवी, अशी माझी पहिल्यापासूनच मागणी आहे. तथापि, केवळ एक पानाची नोटीस दिली जाते आणि ऐनवेळी शंभर ते दीडशे पानांची विषयपुस्तिका समोर मंजुरीसाठी टाकली जाते. बँकेच्या विविध कामांसाठी उपसमित्या नेमल्या गेल्या आहेत; तथापि कार्यकारी समितीमार्फतच बँक चालविण्याचा घाट घातला गेला आहे. प्रत्येक निर्णयाला संचालक मंडळ जबाबदार असल्यामुळे हा कारभार मान्य नाही.’‘मंजुरीसाठी येणाऱ्या सर्व विषयांची माहिती संचालकांना आधी देणे आणि त्यांनी मंजुरी दिल्यानंतर अंमलबजावणी हीच कामाची योग्य पद्धत असते. मात्र, जिल्हा बँकेत कार्यकारी समितीच सर्व सूत्रे हलविते. या समितीच्या महिन्यात चार बैठका होतात. त्याचे इतिवृत्त संचालकांना त्यांच्या बैठकीपूर्वी पाठविले जात नाही. व्यवस्थापकीय संचालक दिलीप धरू यांना दिलेली मुदतवाढ बेकायदा असताना तेच निर्णय घेतात. मुदतवाढ देण्याचा बँकेला अधिकार आहे, असे काही संचालक म्हणतात; मग न्यायालयात जाण्याची गरज का उद्भवली,’ असा सवाल आमदार गोरे यांनी केला.आपली निवड झाल्यापासूनच या कार्यपद्धतीविरुद्ध लढाई सुरू केली असल्याचे सांगून ते म्हणाले, ‘मला जे विषय मान्य नाहीत, त्यांना मी विरोध दर्शविला. तरीही विरोधाची दखल घेण्याची मानसिकता बँकेत कुणाचीच नाही. इतिवृत्तात त्याचा उल्लेखही येत नाही. धरू यांच्या मुदतवाढीचा विषयही मी मांडला होता; मात्र ते इतिवृत्तात दिसत नाही. सायंकाळी पाचनंतर धरू सगळे निर्णय कार्यकारी समितीसमोर वाचतात आणि कोट्यवधींच्या निर्णयांना संचालक कसलीही माहिती नसताना मान्यता देतात. ही कार्यपद्धती नियमानुसार नाही.’ (प्रतिनिधी)राज्य बँकेलाही पुरस्कार मिळालेत की...‘जिल्हा बँकेला नाबार्डचा पुरस्कार मिळाला असतानाही त्ाुम्हाला बँकेची कार्यपद्धती चुकीची वाटते का,’ असे विचारले असता नाबार्डसह अनेक पुरस्कार राज्य सहकारी बँकेलाही मिळाले होते, हे गोरे यांनी निदर्शनास आणून दिले. ‘आज अजित पवारांसह राज्य बँकेच्या संचालकांकडून कोट्यवधींची वसुली केली जात आहे. जिल्हा बँकेच्या कारभारावर नाबार्डनेही आक्षेप नोंदविले आहेत,’ असे ते म्हणाले. धरूंची मुदतवाढ बेकायदा असल्याने आपण सहायक निबंधकांकडे आणि शासनाकडेही तक्रार केली असल्याची माहिती त्यांनी दिली.