शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

जग फिरून झाले, जरा देशही फिरून पाहा, राजू शेट्टींचा PM मोदींना खोचक सल्ला

By प्रमोद सुकरे | Published: November 12, 2022 8:18 PM

"३ महिने वेळ काढून भारत यात्रा करा खरी वस्तुस्थिती कळेल"

प्रमोद सुकरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कराड: राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रा ही चांगली बाब आहे. खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आता जवळजवळ सगळे जग फिरून झाले आहे. त्यांनी आता जरा जवळून देशही फिरून पहावा .म्हणजे त्यांना खरी वस्तूची समजेल अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी  केली. कराड येथे शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शेट्टी बोलत होते. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, उपाध्यक्ष दादासाहेब यादव, कराड तालुका अध्यक्ष रामचंद्र साळुंखे, प्रमोद जगदाळे, सांगली जिल्हा अध्यक्ष पोपट मोरे, प्रवक्ते अँड . संदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेट्टी म्हणाले, राजकारणाचा स्तर सध्या अत्यंत खालच्या पातळीवरती गेलेला आहे. ही बाब लोकांना न पटणारी आहे. चुकीची भाषा वापरणाऱ्यांना जनता योग्य वेळी त्यांची जागाही दाखवतील.

मध्यावधीची शक्यता वाटत नाही- राज्यात मध्यावधी निवडणुकीची शक्यता आहे का ?याबाबत विचारता शेट्टी म्हणाले ,हे सगळे सत्तेला लालसावलेले लोक आहेत. ते सत्तेचा पुरेपूर उपभोग घेतील. वाटल्यास त्यानंतर भांडतील. त्यामुळे मध्यावधी निवडणुकीची शक्यता वाटत नाही.

त्यांना उशिरा साक्षात्कार झाला काय?- सीबीआय ईडीच्या वापराबाबत खासदार शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर माध्यम प्रतिनिधींनी न्यायालयाने खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर करून ईडीवर ठपका ठेवला आहे. याकडे लक्ष वेधले असता, न्यायालय तीन महिने काय करत होते? त्यांना उशिरा साक्षात्कार झाला काय? असा सवालही  त्यांनी केला.

मी बारीकसारीक संघटनेकडे लक्ष देत नाही- सध्या रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत हे देखील ऊस दर प्रश्नी भलतेच आक्रमक झाले आहेत. त्याबाबत विचारताच शेट्टी म्हणाले, मी सध्या बारीक-सारीक संघटनेकडे लक्ष देत नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRaju Shettyराजू शेट्टी