शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
2
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
3
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
4
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
5
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
6
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
7
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
8
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
9
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
10
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
11
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
12
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
13
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
14
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
15
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
16
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
17
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
18
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
19
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
20
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली

टोल भरताच यमदूताचे दर्शन

By admin | Published: November 23, 2014 8:38 PM

आनेवाडीजवळ धोका : महामार्ग प्राधिकरण, ठेकेदाराचे दुर्लक्ष; वर्षापासून रेंगाळले पुलाचे काम

कुडाळ : भरमसाठ टोल वसुली करून वाहनचालकांचा खिसा कापणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित कंपनीने प्रवासी, वाहनचालकांच्या जीवाशी अक्षरश: खेळ मांडला आहे. मुळात हा चौपदरी रस्ता व्यवस्थित नसताना सहापदरी रस्ता करण्याचा घाट घातला आहे. मात्र, ठिकठिकाणी पुलांची, रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्याजवळच पुलाचे काम अर्धवट असल्यामुळे या ठिकाणी खंडाळ्यातील अपघाताची पुनरावृत्ती होण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. तरी तातडीने या पुलाचे काम पूर्ण व्हावे, अशी मागणी होत आहे.आनेवाडी हे जावळीचे प्रवेशद्वार ओह. वरील २० ते २५ गावांना जोडणाऱ्या या रस्त्याजवळ वर्षभरापासून पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक एकाच लेनवरून सुरू आहे. टोलनाक्यावर गर्दी होऊन ट्रॅफिक जाम झाले की आनेवाडीकडून आलेल्या वाहनांना मार्गच मिळत नाही. याच ठिकाणी रिक्षा थांबा, बस थांबा देखील आहे. या थांब्यावर वाई, पुण्याकडे जाणारे शेकडो प्रवासी एसटीची वाट पाहत उभे असतात. साताराकडून उताराने अनेक वाहने वेगाने येऊन ताबा सुटल्याने अनेकदा या ठिकाणी फसली आहेत. आतापर्यंत जीवित हानी झाली नसली तरीदेखील वाहतूक अशीच एकेरी राहिली तर खंडाळ्यात काही दिवसांपूर्वी घडलेल्या अपघाताची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही. तसेच याच ठिकाणी ठेकेदाराने महामार्गालगत मोठा खड्डा खणल्याने आजूबाजूच्या व्यावसायिकांचे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी महामार्गावर सुरू असलेल्या पुलांची कामे पूर्ण करण्याचे आदेश देऊनही कंत्राटदाराकडून या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. कासवाच्या गतीने सुरू असलेल्या या पुलाचे काम कोणतीही दुर्घटना होण्यापूर्वी महामार्ग प्राधिकरणाने पूर्ण करावे, अशी मागणी वाहनचालक, प्रवाशांमधून होत आहे. (प्रतिनिधी)नको हा टोलनाकाटोलनाक्यावर अनेकदा गाड्यांची दोन्ही बाजूला भली मोठी रांग लागते. त्यातच या अर्धवट पुलाचा अडथळा. सातारकडून रांग लागली की आनेवाडीच्या वरील गावांमधून येणाऱ्या वाहनांना तासन्तास महामार्ग मोकळा होण्याची वाट पाहावी लागते. कारण ज्या ठिकाणी हा रस्ता महामार्गाला मिळतो, तिथेच या पुलाचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने एकाच लेनवरून वाहतूक सुरू असते. त्यामुळे आनेवाडीकडून येणाऱ्या वाहनचालक व प्रवाशांवर ‘नको हा आनेवाडी टोलनाका’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. महामार्गालगत असलेल्या आनेवाडी फाट्यावर जवळपास वीस रिक्षा रात्रंदिवस उभ्या असतात. कधी-कधी मोठे सोळा चाकी ट्रेलर वेगात येतात. अशावेळी ते रिक्षावर येतात की काय अशी भीती वाटते. त्यामुळे आम्ही रिक्षास्टॉपवर उभ्या करून बाजूला बसण्यास सुरुवात केली आहे.- जीवन कर्पे,रिक्षाचालक, आनेवाडीआनेवाडी टोलनाक्याजवळच वर्षभरापासून पुलाचे काम सुरू असल्यामुळे एकाच लेनवरून सुरू असलेली वाहतूक अपघाताला निमंत्रण देत आहे.