शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच रेशन धान्य वाहतूक ठेकेदाराचे ३ कोटी थकीत, परशुराम उपरकर यांचा आरोप

By सुधीर राणे | Updated: June 24, 2024 15:51 IST

ऑनलाईल जमीन मोजणी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत जनतेची लूट 

कणकवली: लोकसभा निवडणूक आता झाल्यामुळे जनतेच्या प्रश्नांकडे सत्ताधारी मंडळी दुर्लक्ष करत आहेत. रेशन दुकानदारांकडे मोफत धान्यासाठी लोक जावून परत येत आहेत. कारण रेशन धान्य वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराचे सुमारे ३ कोटी रुपयांचे बिल शासनाकडे थकीत आहे. त्यामुळे रेशन दुकानावर धान्य उपलब्ध नाही. सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच ही स्थिती निर्माण झाली आहे असा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला. कणकवली येथील संपर्क कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते  बोलत होते. उपरकर म्हणाले, रेशन धान्य पुरवठादारांना गेल्या ३ महिन्यांपासून बिल मिळालेले नाही. याबाबत विचारणा केली असता जिल्हाधिकाऱ्यांनी ते बिल वरिष्ठ स्तरावर पाठवले आहे असे सांगितले. तर जिल्हा पुरवठा अधिकारी आपली बदली करून घेण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे त्यांना जनतेच्या समस्यांकडे पहायला वेळ नाही.  महत्त्वाच्या पदावर असलेली व्यक्ती कार्यालयात उशीरा येत असेल तर त्याला जबाबदार कोण आहे ?

राज्य शासनाने मोफत धान्याची घोषणा केली. मात्र, सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. अनेक मतदार हे मतांसाठी पैसे घेत असतात. त्यामुळे आता त्यांना धान्य मिळत नसले तरी राजकारण्यांना  बोलता येत नाही. त्यामुळे यापुढील काळात मतदारांनी मतांसाठी पैसे न घेता लोकशाही बळकट करावी. असे आवाहन उपरकर यांनी केले. भूमिअभिलेखकडे ऑनलाईन जमीन मोजणी अर्ज भरताना सर्व्हरडाऊन होणे, कागदपत्र फाईल उडून जाणे असे घडत आहे. भूमी अभिलेख विभागातील कारभार पारदर्शक  करण्यासाठी शासनाने  योजना आणली. मात्र, सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास होत आहे. पूर्वी चाकरमानी गावी आले की, एका दिवसात जमीन मोजणी अर्ज भरण्याचे काम होत होते.आता तो अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी ऑनलाईन केंद्रांकडून १ ते २ हजार रुपये घेतले जात आहेत. याबाबत भूमी अभिलेख संचालक निकम यांची आम्ही भेट घेतली. तेव्हा त्यांनीही जनतेची होणारी अडचण मान्य केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची लूट थांबविण्यासाठी कंत्राटी कर्मचारी भूमिअभिलेख कार्यालयात बसवावा. किंवा सेतू सुविधा केंद्राकडे अर्ज भरण्याचे काम द्यावे. त्याचा दर निश्चित करावा अशी मागणी केल्याचे  उपरकर यांनी सांगितले. सावंतवाडी प्रांत कार्यालयात अनेक विद्यार्थी आणि नागरिकांचे दाखल्यांसाठीचे १२७अर्ज पेंडींग आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कळवले आहे. पालक, विद्यार्थी कार्यालयात जात आहेत, मात्र त्याठिकाणी आर्थिक मागणी करणारे एजंट तयार झाले आहेत. यासगळ्या प्रकाराची चर्चा सध्या सुरू आहे असेही उपरकर म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गParshuram Upkarपरशुराम उपरकर