शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये भाजपला दिलासा, हिंदू मतदारांमध्ये उत्साह; ९ वाजेपर्यंत ११ टक्के मतदान
2
Pager Explosion : पेजरमध्ये बसवून घडवले स्फोट, ते PETN स्फोटक काय?
3
Ganesh Visarjan 2024 Live: 'लालबागचा राजा'चं विसर्जन; साश्रू नयनांनी भक्तांनी दिला निरोप
4
'बुलडोझर' कारवाईला सुप्रीम कोर्टाचा ब्रेक; आदेशात नेमकं काय म्हटलंय? जाणून घ्या
5
"मॅम नव्हे, माँ अमृता फडणवीस", मंगलप्रभात लोढा यांच्याकडून उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीचं कौतुक! 
6
"...याला म्हणतात मनाने मोठा असलेला माणूस", प्रसाद ओकने सांगितला मुख्यमंत्री शिंदेंचा 'तो' किस्सा
7
Video: लाईव्ह कॉन्सर्टमध्ये चाहतीला अश्रू अनावर, अरिजीत सिंहने काय केलं पाहा; होतंय कौतुक
8
अशी सुरू झाली होती सलमान-ऐश्वर्याची लव्हस्टोरी, सोमी अली म्हणाली- "नोकरांनी सांगितलं की..."
9
'शरद पवारांच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो तेव्हा...'; अशोक सराफ यांनी सांगितला मजेशीर किस्सा
10
केंद्राने कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्स शून्यावर आणला; पेट्रोल, डिझेलच्या किंमती कोसळणार?
11
Innomet Advanced Materials IPO: 'या' आयपीओचं जबरदस्त लिस्टिंग; बाजारात येताच १००% नफा, विकायलाही कोणी तयार नाही!
12
राज्याला महिला मुख्यमंत्री हव्या पण रश्मी ठाकरेंचं नाव नको; किशोरी पेडणेकर असं का बोलल्या?
13
EPFO Calculation: दर महिन्याला केवळ 'इतकं' योगदान, नंतर तुमच्या पीएफ खात्यात जमा होती ३ ते ५ कोटी; पाहा कॅलक्युलेशन
14
...तर २ टर्म मी केंद्रात मंत्री असतो; मुख्यमंत्रिपदावरून नाना पटोलेंचं थेट उत्तर
15
Video: आर्या जाधवची अमरावतीत रॅली, सादर केलं रॅप; चाहत्यांचा तुफान प्रतिसाद
16
IND vs BAN : 'रन बरसेगा..' किंग कोहली 'रन बरसे!' रैनाची 'विराट' भविष्यवाणी
17
"बिग बॉस मराठीचे चार सीझन गाजले नाहीत", केदार शिंदेंच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांची नाराजी, म्हणाले- "रितेशच्या जागी..."
18
"तुम्ही प्रश्न विचारू शकता, वाद घालू नका"; मणिपूरच्या प्रश्नावर अमित शाहांचा पत्रकाराला सल्ला
19
"दादांनी थांबवलं तरी भाजपाविरोधात निवडणूक लढणार"; अजित पवार गटातील नेत्याचा इशारा
20
नवाब मलिक यांच्या जावयाच्या कारचा भीषण अपघात; समीर खान गंभीर जखमी

भरपावसात आदित्य ठाकरेंचं भाषण, महायुती सरकारवर भ्रष्टाचाराचे केले आरोप, भाजपाला दिलं ओपन चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 2:44 PM

मालवण येथे आज महाविकास आघाडीने मोर्चाचे आयोजन केले होते, यावेळी ठाकरे समर्थ आणि राणे समर्थक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले.

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काही दिवसापूर्वी कोसळला. या प्रकरणी आज महाविकास आघाडीने मालवण येथे मोर्चा काढला आहे. यावेळी ठाकरे गट आणि राण समर्थक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले, यावेळी दोन्ही गट आक्रमक झाले होते, तसेच दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, दोन तासांनंतर किल्ल्यावरुन आदित्य ठाकरे बाहेर पडले. यानंतर त्यांनी मोर्चास्थळी भरपावसात भाषण केले. यावेळी त्यांनी भाजपासह महायुती सरकार टीका केली. 

"आधी त्यांना समजवा"... मालवण किल्ल्यावर जयंत पाटलांचा मध्यस्थीचा प्रयत्न, राणे - ठाकरे समर्थक मागे हटेनात!

मोर्चावेळी मालवणमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसातच आमदार आदित्य ठाकरे यांनी भाषणाला सुरूवात केली. " आपल्या मोर्चामध्ये काही चिंधीचोर आले,मी त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाही. आज बालिशपणा होत होता. हा भाजपचा भ्रष्टाचार आहे. इकडचे स्थानिक खासदार कसे जिंकूण आले आहेत आपल्याला माहिती आहे, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी खासदार नारायण राणे यांना लगावला. या ठिकाणी भ्रष्टाचार झाला असेल तर आपण तिथं गेलं पाहिजे. आपण या मातीतील लोक आहोत. ही परिस्थिती देशात आहे. दहा वर्षात भाजपाने जी काम केली आहेत, त्या कामाला गळती लागली आहे, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. 

"देशात कोणताही एक भाग सोडलेला नाही जिथे भाजपाने भ्रष्टाचार केलेला नाही. मुंबईची मेट्रो असो, मुंबई महापालिकेतील घोटाळे असो. अयोध्येमधील राम मंदिरातही गळती लागली आहे. या कामाची जगभराच जाहीरात केली. नवीन संसद भवनातही पाणी गळत आहे. दिल्ली विमानतळाचे छतही पडले, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

"मालवण येथील या पुतळ्याचे कॉन्ट्रक्ट भाजपाने मिंधे सरकारने कोणाला दिले होते.हे जगासमोर आलं पाहिजे. कोण होते हे आपटे? कोणताही अनुभव नसताना तुम्ही हे काम कसं दिलं. अमेरिकेतली एक पुतळा समुद्र किनारी १३८ वर्षे टीकला आहे. पण आपला हा पुतळा ८ महिन्यात कसा कोसळला? हे आपटे कोण आहेत कुठे आहेत हे आम्हाला कळालं पाहिजे. तो आपटे कुणाचा तरी मित्र आहे म्हणून त्यांना काम मिळालं. याची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे, असंही ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही चार वर्षापूर्वी संभाजीनगर येथील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज विमानतळ हे नाव दिलं आहे, पण मोदी सरकारने अजूनही या नावाला मान्यता दिलेली नाही. यांचा महाराष्ट्रातील या नावांचा विरोध का आहे? यांचा महाराष्ट्रद्वेष का आहे?, असा आरोपही ठाकरे यांनी केला. समोरुन अनेक अफजल येतील, ईडी, सीबीआय आणतील पण आम्ही झुकणार नाही हे सांगा, आम्ही लढायला तयार आहे, असं सांगत आदित्य ठाकरे यांनी चॅलेंज दिलं. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा