शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

आमदाराकडून ठेकेदारीच्या पैशातून अगरबत्ती, खडीसाखर : निलेश राणे यांची टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 17:35 IST

आमदार नाईक यांचा भाऊ रस्त्यांचे ठेके घेतो आणि त्याच ठेकेदारीच्या पैशातून आमदाराकडून जनतेला अगरबत्ती, खडीसाखर दिली जाते, अशी टिका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी केली.

ठळक मुद्देआमदाराकडून ठेकेदारीच्या पैशातून अगरबत्ती, खडीसाखर : निलेश राणे यांची टिका आडारी-निवे पर्यायी रस्त्याचा शुभारंभ

मालवण : कोळंब पूल धोकादायक स्थितीत असताना आमदार वैभव नाईक यांनी पयार्यी रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला नाही. गेल्या चार वर्षात कुडाळ-मालवण मतदारसंघाची बिकट अवस्था करून ठेवली असून जनतेला केवळ शब्द देणे हाच सत्ताधारी विकास समजत आहेत.

आमदार नाईक यांचा भाऊ रस्त्यांचे ठेके घेतो आणि त्याच ठेकेदारीच्या पैशातून आमदाराकडून जनतेला अगरबत्ती, खडीसाखर दिली जाते, अशी टिका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी केली.कोळंब पूल संघर्ष समितीच्या मागणीनुसार स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार नारायण राणे यांनी आडारी-निवे या पयार्यी मागार्साठी २५ लाखाचा निधी मंजूर केला. या रस्ता कामाचा शुभारंभ माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आडारी ढोलमवाडी येथे करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक तालुकाध्यक्ष मंदार केणी तर कृष्णानाथ तांडेल यांनी विचार मांडले. यावेळी राणे यांनी कोळंब पूल संघर्ष समितीचे कौतुक केले.यावेळी स्वाभिमानाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, कृष्णनाथ तांडेल, सभापती सोनाली कोदे, बाबा परब, नगरसेवक यतीन खोत, कोळंब सरपंच प्रतिमा भोजने, सन्नी कुडाळकर, राऊळ, सजेर्कोट सरपंच सौ. परुळेकर, विजय नेमळेकर, गोपीनाथ तांडेल, संदीप भोजने, मंदार लुडबे, सुर्यकांत फणसेकर, निखिल नेमळेकर, रामदास ढोलम, बबन मलये, हरिश्चंद्र ढोलम, हनुमंत ढोलम, मनोहर करंगुटकर, विशाल ढोलम, अनिल मलये, अरुण ढोलम, आत्माराम ढोलम यांच्यासह ग्रामस्थ व स्वाभिमान पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.निलेश राणे म्हणाले, आमदार नाईक यांच्यात पयार्यी मागार्ला निधी देण्याची क्षमता नसल्याने संघर्ष समितीला खासदार नारायण राणे यांनी २५ लाखाचा निधी मंजूर करून दिला. आमदार, खासदार यांनी सत्ताकाळात केलेली पाच विकासकामे जाहीर करावी. खासदार राणे आमदार असते तर कोळंब पुलाचे काम केव्हाच मार्गी लागले असते. }

खासदार विनायक राऊताना जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी वेळही नाही. खडी, डांबर हाच नाईकांचा व्यवसाय असून शासकीय रस्त्यांची कामे त्यांचा भाऊ करोडो रुपये कमावतो आणि त्याच पैशातून जनतेला अगरबत्ती, खडीसाखर वाटली जाते. जनतेला अपेक्षित असलेली विकासकामे होत नसल्याने सत्ताधा?्यांना जनता शिव्या घालू लागली आहे, असा टोला राणे यांनी लगावला.

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग