शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

मतदारांना धमकी देणाऱ्या नितेश राणेंविरोधात सर्वपक्षीयांनी एकत्र यावे!, मनसे नेत्याने केले आवाहन

By सुधीर राणे | Updated: December 13, 2022 16:02 IST

भाजपचा केवळ कागदावरच विकास 

कणकवली: भाजपचे काही नेते मतदारांवर दबाव आणणारी वक्तव्ये करीत आहेत. आमदार नितेश राणे हे तर मतदारांना थेट धमकी देत आहेत. या विरोधात सर्वपक्षीयांनी एकत्र येणे आवश्यक आहे. तसेच या निवडणुकीनंतर भाजप अर्थात राणे भाजप विरोधात सर्वांनी संघर्षासाठी उभे राहण्याची गरज आहे असे प्रतिपादन मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आज, मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.उपरकर म्हणाले, जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुका या लोकशाही पद्धतीने न होता तिथे दबावाचे राजकारण केले जात आहे. नांदगाव येथील प्रचार सभेत आमदार नितेश राणे यांनी आपल्या विचाराचा सरपंच न दिल्यास निधी मिळणार नाही अशी थेट धमकीच दिली आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तसे राजकारण करण्याचे ठरवले आहे काय ? जिल्हातील भाजप वगळून  इतर ग्रामपंचायतींना निधी देणार नाहीत का? तसेच जिल्ह्यातील भाजपच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये  आतापर्यंत त्यांनी किती निधी दिला ? हे प्रथम जाहीर करावे. भाजपचा केवळ कागदावरच विकास मुळात नितेश राणे यांना माहीतच नाही की, केंद्र आणि राज्य शासनाचा निधी हा थेट ग्रामपंचायतीला मिळतो. भाजपच्या ताब्यातील ग्रामपंचायतींचा आतापर्यंत किती विकास झाला ? हे पाहिले तर त्या गावांमध्ये साधा रस्ता नाही, वीज नाही अशी परिस्थिती आहे. भाजपचा केवळ कागदावरच विकास झालेला आहे. ज्या गावात भाजपची सत्ता आहे. त्या गावातील दवाखान्यात डॉक्टर नाहीत, रेशनवर धान्य नाही, याकडे दुर्लक्ष करून नितेश राणे थेट निवडणुकीत जनतेला धमकी देत फिरत आहेत हे योग्य नाही.केसरकर मंत्री झाल्यापासून दहशतवाद संपला का?शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे यापूर्वी सिंधुदुर्गातील राणेंच्या दहशतवादावरच राजकारण करून सगळ्या निवडणुका जिंकून आले आहेत. आता केसरकर हे शिंदे गटात गेल्यानंतर त्यांना जिल्ह्यातला हा दहशतवाद संपल्याचा साक्षात्कार झाला आहे. त्यामुळे त्यांनी नितेश राणेंच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. केसरकर मंत्री झाल्यापासून जिल्ह्यातला दहशतवाद संपला का ? ते त्यांनी एकदा जाहीर करावे.

दहशतवादाच्या नावावर आपली संपूर्ण राजकीय कारकीर्द त्यांनी घालवली. विकास मात्र झाला नाही.  ते शिक्षणमंत्री झाल्या पासून शाळा इमारतीच्या दुरूस्तीसाठी  किती निधी मिळाला? किंवा त्यांनी केलेले जिल्हातील एक तरी काम जनतेला सांगावे असे आव्हानही उपरकर यांनी दिले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकNitesh Raneनीतेश राणे MNSमनसेParshuram Upkarपरशुराम उपरकर